शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शेतीचा जोडधंदा झाला उदरनिर्वाहाचे मुख्य साधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 5:00 AM

आमगाव तालुक्याच्या गोरठा येथील शेतकरी भूवन सिताराम पाथोडे यांनी गोंदियातील एका सामाजिक संस्थेत १७ वर्ष काम केले. त्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करणे परवडत नसल्याने त्यांनी ती नोकरी सन २०१२ ला सोडली. नोकर म्हणून काम करताना आमगाववरून रेल्वेने सकाळी गोंदियाला येणे परत रात्री उशीरापर्यंत घरी जाणे या रोजच्या प्रकाराने ते कंटाळले होते.

ठळक मुद्देदुसऱ्यांना देतो रोजगार : शेतकऱ्यांसमोर ठेवला आदर्श

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एका बहुउद्देशिय विकास संस्थेत तुटपुंज्या मानधनावर नोकरी करणाºया तरूणाने नोकरीचा नाद सोडून मालक होण्याचे स्वप्न बाळगले. परंतु ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरूवातीला शेतीचा आधार घेतला. शेतीला जोडधंदा म्हणून केलेल्या दुधाच्या व्यवसायातून त्याने आर्थिक प्रगती साधली. परिणामी नोकर म्हणून काम करण्यापेक्षा त्याने मालक म्हणून काम करणे पसंत केले.आमगाव तालुक्याच्या गोरठा येथील शेतकरी भूवन सिताराम पाथोडे यांनी गोंदियातील एका सामाजिक संस्थेत १७ वर्ष काम केले. त्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करणे परवडत नसल्याने त्यांनी ती नोकरी सन २०१२ ला सोडली. नोकर म्हणून काम करताना आमगाववरून रेल्वेने सकाळी गोंदियाला येणे परत रात्री उशीरापर्यंत घरी जाणे या रोजच्या प्रकाराने ते कंटाळले होते. शेवटी वडिलोपार्जीत शेतीत आपल्या शिक्षणाचा फायदा व्हावा, आपण नोकर म्हणून काम करण्यापेक्षा मालक म्हणून स्वत:च्याच शेतीत काम करण्याचा चंग बांधला.शेतीच्या कामाला सुरूवातही केली. परंतु महिन्याकाठी खिशात येणारे पैसे शेतीत दर महिन्याला मिळत नसल्याने ते थोडे निराश झाले. परंतु दररोज किंवा महिन्याकाठी तरी पैसे खिशात यावे यासाठी त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करण्याचे ठरविले. म्हशी घेऊन त्यांना शेतातून चारून घरी आणणे, त्यानंतर आमगाव येथे जावून दूध विकण्यास सुरूवात केली. भूवन पाथोडे यांच्याकडे आजघडीला पाच म्हशी व दोन गाई आहेत. ही सात दुभती जनावरे दिवसाकाठी ४० लीटर रूपये दूध देतात. जनावरांपासून काढलेल्या दूधात कसलीही भेसळ नाही. त्यामुळे एका लिटरमागे ४० रूपयाने दूध लोक सहज खरेदी करतात. यातून त्यांना १६०० रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. शेतीला जोडधंदा म्हणून पत्करलेल्या हा दूध व्यवसाय त्यांच्या उपजिवीकेचा मुख्य साधन झाला.शेतीचे उत्पन्न झाले बचत बँकपारंपरिक धानाच्या शेती बरोबरच भाजीपाल्याची शेती देखील ते करतात. यंदा त्यांनी २ किलो वजनाच्या मुळ्याचे त्यांनी आपल्या शेतीत उत्पादन घेतला. वांगी, टोमॅटो, कांदे असे विविध भाजीपाला ते शेतातून घेतात. सोबतच रब्बी व खरीप अशी दोन पिके ते सहा एकर शेतीतून घेत असतात. दुधातून येणाºया मिळकतीतून घर चालविणे व शेतीतून येणाºया पैश्यातून शेती खरेदी करणे, लग्नसमारंभ, मुलांचे शिक्षण व उर्वरीत पैसे बचत म्हणून बँकेत जमा करतात. शेतीच्या कामासाठी ते गावातीलच काही लोकांना रोजगारही देतात. नोकरीचा नाद सोडून स्वत: मालक बनण्याचे स्वप्न पाहणारे भुवन पाथोडे आज गावात आदर्श शेतकरी म्हणून ओळखल्या जात आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी