शहरं
Join us  
Trending Stories
1
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
2
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
3
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
4
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
5
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
6
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
7
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
8
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
10
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
11
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
12
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
13
बीड महामार्ग भूसंपादन घोटाळा: तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक पोलिसांच्या ताब्यात
14
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
15
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
16
मार्कशीटमधील खाडाखोड कळली अन् बापाची सटकली; ९ वर्षांच्या मुलीला क्रूरपणे संपवलं, नंबर १ चा होता अट्टहास
17
रंगांचा खेळ! रेड, ग्रीन तर माहितीय पण फूड पॅकेजिंगवरील ब्लू, येलो मार्कचा नेमका अर्थ काय?
18
१०,००० किमी मारक क्षमता, अनेक बडे देश टप्प्यात, अग्नी-६ सुपर क्षेपणास्त्र तयार, भारत जगाला दाखवणार ताकद
19
तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
20
थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले...
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षतोडीला व्यावसायिकांचे प्रोत्साहन

By admin | Updated: December 22, 2014 22:50 IST

जल-वायू प्रदूषणामुळे सजीवांना जीवन जगणे कठीण होत आहे. याचे दुष्परिणाम सर्वत्र दिसून येत आहे. उपाययोजना म्हणून सर्वत्र वृक्षारोपण योजना कार्यान्वित करून कोट्यवधी रूपये खर्च केले जात आहेत,

रावणवाडी : जल-वायू प्रदूषणामुळे सजीवांना जीवन जगणे कठीण होत आहे. याचे दुष्परिणाम सर्वत्र दिसून येत आहे. उपाययोजना म्हणून सर्वत्र वृक्षारोपण योजना कार्यान्वित करून कोट्यवधी रूपये खर्च केले जात आहेत, मात्र ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीमुळे समस्या ‘जैसे थे’ आहे.
अवैध वृक्षतोड होवू नये यासाठी शासनाने कायद्यांची निर्मिती केली. मात्र त्यांची अंमलबजावणी करणारा विभाग निंद्रेत आहे. त्यामुळे व्यायसायीक कामासाठी अवैध वृक्षतोड होवून कायद्याची पायमल्ली होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखून ठेवण्यासाठी वृक्ष संवर्धनाची गरज लक्षात घेता वृक्ष तोडण्यास प्रतिबंध करणारा कायदा सध्या अस्तित्त्वात आहे. राज्य शासनाने १७ सप्टेंबर १९९२ च्या अद्यावत सूचीप्रमाणे अनेक जातीच्या वृक्षतोडीवर बंदी घातली आहे. वृक्ष स्वत:च्या मालकीचा असो किंवा दुसऱ्याच्या, परवानगीशिवाय वृक्ष तोडू शकणार नाही, अशी कायद्यात तरतूद आहे.
सद्यस्थितीत शेतजमिनी ओसाड पडून काही वृक्षांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. शेतकरी आपल्या शेतातील वृक्षांचा सांभाळ आपल्या आपल्या मुलाबाळांप्रमाणे करतात. मात्र व्यावसायीक त्या शेतकऱ्यांना आर्थिक प्रलोभने देवून त्यांच्या शेतातील उरलीसुरली वृक्षसंपदा नष्ट करीत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल धोक्यात आला आहे. एकीकडे वृक्षांच्या अवैध कत्तली केल्या जात आहेत, तर दुसरीकडे वनाधिकारी स्व:हितासाठी व आर्थिक स्वार्थापोटी कायद्याची अंमलबजावणी करीत नाही. त्यामुळे हिरव्या वृक्षांच्या कत्तलीत वाढ झाली आहे.
कोणत्याही प्रकारच्या वृक्ष तोडीबाबत विशिष्ट अटींवरच परवानगी देण्यात येते. याचे अधिकार संबंधित महसूल अधिकाऱ्यांना आहेत. आंबा, चिकू, कडूनिंब, वड आदी प्रजातींच्या वृक्षांना तोडण्याची परवानगी देण्याचे अधिकार वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना आहेत. मालकीच्या वृक्षांसाठी त्या शेतीचा सात-बारा व वृक्षतोडीच्या कारणांची वनपरिक्षेत्र अधिकारी शहानिशा करून विभागीय कार्यालयाला पाठवितात. नंतर सहायक वनरक्षक मोक्यावर येवून तपासणी करून वृक्षतोडीचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुपुर्द करतात. सदर माल किती आहे, तेवढाच परवाना दिला जातो. तोडलेल्या लाकडांवर हॅमरिंग करून माल वाहतुकीचा परवाना दिला जातो. मात्र व्यायसायीक लाकूड कंत्राटदार अवैध मार्गाचा अवलंब करून अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करून कायद्याची पायमल्ली करताना आढळतात.
हिरव्यागार वृक्षांची कत्तल करून ते ट्रकने व्यायसायिकाकडे पाठविले जातात. त्यामुळे शेत व जमिनी ओसाड होत असून कंत्राटदार मात्र मालामाल होत आहेत. याकडे संबंधित वनाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का? हा संशोधनाचा विषय आहे. वनाधिकारी व महसूल अधिकारी अतोनात वृक्षतोडीची परवानगी कशी देतात, असा संभ्रम नागरिकांत पसरला आहे. याकडे वरिष्ठ व सक्षम अधिकाऱ्यांनी लक्ष देवून या प्रकारावर आळा घालावा, अशी मागणी रावणवाडी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)