शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

धानाची उचल करुन खरेदीला त्वरित सुरुवात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 4:30 AM

गोंदिया : यंदा मे महिना अर्धा संपत आला तरी रब्बीतील धान खरेदी जिल्हा प्रशासनाने अद्यापही सुरु केली नाही. परिणामी ...

गोंदिया : यंदा मे महिना अर्धा संपत आला तरी रब्बीतील धान खरेदी जिल्हा प्रशासनाने अद्यापही सुरु केली नाही. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. धान खरेदीस अधिक विलंब झाल्यास शेतकरी व प्रशासन या दोघांची चिंता वाढून बिकट परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे विना विलंब धान खरेदी सुरु करण्यात यावी. यासाठी आ. मनोहर चंद्रिकापुरे व माजी आ. राजेंद्र जैन यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन काही आवश्यक उपाय सुचविले.

राईस मिलर्स आणि शासन यांच्या धानाच्या भरडाई दर आणि अपग्रेडेशनवरुन निर्माण झालेला तिढा सोडवून रब्बीतील धान खरेदीचा मार्ग खा. प्रफुल्ल पटेल यांनी यशस्वीपणे सोडविला. काेरोनामुळे राज्य सरकार आर्थिक संकटात असताना सुध्दा शेतकऱ्यांना खरीप हंगामात ७०० प्रति क्विंटल बोनस मिळवून दिला. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांची अडचण दूर झाली. मात्र यानंतरही आता जिल्हा प्रशासन, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाकडून धानाची उचल करण्यास विलंब केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची काळजी वाढत आहे. एकीकडे अवकाळी पावसाचे संकट, दुसरीकडे खरीप हंगामाची तयारी आणि रब्बीतील धानाची अद्यापही विक्री झाली नसल्याने या सर्वात शेतकऱ्यांची अधिक अडचण झाली आहे. त्यामुळे त्वरित धान खरेदीला सुरुवात करण्याची गरज आहे. जिल्हा प्रशासनाने अधिक विलंब न करता धानाची उचल होईपर्यंत भाड्याने खासगी गोदाम घेऊन धान खरेदी करावी. तसेच लवकरात लवकर धानाची उचल कशी करता येईल या दृष्टीने युद्धपातळीवर नियोजन करावे, राईस मिलर्सनी सुद्धा शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता त्वरित धानाची उचल करुन भरडाईस सुरुवात करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी राईस मिलर्स व जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ यांच्यासह समन्वय साधून खरेदी कशी त्वरित सुरु होईल या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे आ. मनोहर चंद्रिकापुरे व माजी आ. राजेंद्र जैन यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे कसलेही नुकसान होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरु राहील असे देखील स्पष्ट केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते.