लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी ११ ते २९ फेब्रुवारी या १९ दिवसात पुढच्या वर्षासाठी अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. यात गोंदिया जिल्ह्यातील ९०३ जागांसाठी ३ हजार ६५८ अर्ज आले आहेत. त्या मोफत प्रवेशाची सोडत आॅनलाईन पध्दतीने १७ मार्च रोजी काढण्यात आली.हजारो पालक आपल्या पाल्यांना या २५ टक्के प्रवेशात क्रमांक लागावा यासाठी धडपडत आहेत. ११ ते २८ फेब्रुवारी या दरम्यान जिल्ह्यात ९०३ जागेसाठी ३ हजार ६५८ अर्ज करण्यात आले आहेत. २५ टक्के मोफत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी ११ ते २९ फेब्रुवारी २०२० या दरम्यान पालकांनी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्या अर्जाची सोडत १७ मार्च रोजी ऑनलाईन पध्दतीने झाली.जिल्ह्यातील १४० शाळांनी यासाठी नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश मिळणार आहे. आमगाव तालुक्यातील ११ शाळांमध्ये ८७ जागेसाठी ४०६ अर्ज आले आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १३ शाळांमधील ९१ जागेसाठी २४५ अर्ज, देवरी तालुक्यातील १० शाळांमधील ५५ जागेसाठी १६१ अर्ज, गोंदिया तालुक्यातील ५७ शाळांमधील ३५६ जागेसाठी १ हजार ८२६ अर्ज करण्यात आले आहेत.गोरेगाव तालुक्यातील १५ शाळांमधील ७४ जागेसाठी २९८ अर्ज, सडक-अर्जुनी तालुक्यातील १० शाळांमधील ४५ जागेसाठी १४५ अर्ज, सालेकसा तालुक्यातील ५ शाळांमधील ४४ जागेसाठी ११८ अर्ज, तिरोडा तालुक्यातील १९ शाळांमधील १५१ जागेसाठी ४५९ अर्ज करण्यात आले आहेत. एकूण १४० शाळांमधील ९०३ जागेसाठी ३ हजार ६५८ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यांची लॉटरी आॅनलाईन पध्दतीने काढण्यात आली.गुरुवारी (दि.१९) रोजी दुपारनंतर ज्या पाल्यांचे नंबर लागले त्यांच्या पालकांच्या मोबाईलवर दुपारनंतर मॅसेज जाणार आहेत. पोर्टलवर लिस्ट सुध्दा टाकली जाणार आहे. त्यात प्रतीक्षा यादी देखील सोबतच लावली जाणार आहे.कागदपत्रांचे व्हेरिफीकेशन ३१ मार्चनंतरपालकांनी सोडतीच्या एसएमएस वरच अवलंबून राहू नये. गुरूवारी दुपारनंतर अप्लीकेशनवर जाऊन सविस्तर माहिती घ्यावी. आपल्या पाल्यांला लॉटरी लागली की नाही हे पाहावे.ज्यांना लॉटरी लागली त्यांनी संबधीत शाळेत जाऊन कागदपत्रांची पडताळणी लगेच करायची असते. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने आरटीईच्या कागदपत्रांची पडताळणी ३१ मार्चनंतरच संबधीत शाळांत करण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
आरटीईच्या ९०३ प्रवेशासाठी झाली ऑनलाईन सोडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 6:00 AM
हजारो पालक आपल्या पाल्यांना या २५ टक्के प्रवेशात क्रमांक लागावा यासाठी धडपडत आहेत. ११ ते २८ फेब्रुवारी या दरम्यान जिल्ह्यात ९०३ जागेसाठी ३ हजार ६५८ अर्ज करण्यात आले आहेत. २५ टक्के मोफत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी ११ ते २९ फेब्रुवारी २०२० या दरम्यान पालकांनी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन नोंदणी केली आहे.
ठळक मुद्देआज दुपारनंतर पालकांना मॅसेज : कोरोनामुळे ३१ मार्चनंतरच होणार व्हेरीफिकेशन