शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईच्या ९०३ प्रवेशासाठी झाली ऑनलाईन सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 06:00 IST

हजारो पालक आपल्या पाल्यांना या २५ टक्के प्रवेशात क्रमांक लागावा यासाठी धडपडत आहेत. ११ ते २८ फेब्रुवारी या दरम्यान जिल्ह्यात ९०३ जागेसाठी ३ हजार ६५८ अर्ज करण्यात आले आहेत. २५ टक्के मोफत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी ११ ते २९ फेब्रुवारी २०२० या दरम्यान पालकांनी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन नोंदणी केली आहे.

ठळक मुद्देआज दुपारनंतर पालकांना मॅसेज : कोरोनामुळे ३१ मार्चनंतरच होणार व्हेरीफिकेशन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी ११ ते २९ फेब्रुवारी या १९ दिवसात पुढच्या वर्षासाठी अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. यात गोंदिया जिल्ह्यातील ९०३ जागांसाठी ३ हजार ६५८ अर्ज आले आहेत. त्या मोफत प्रवेशाची सोडत आॅनलाईन पध्दतीने १७ मार्च रोजी काढण्यात आली.हजारो पालक आपल्या पाल्यांना या २५ टक्के प्रवेशात क्रमांक लागावा यासाठी धडपडत आहेत. ११ ते २८ फेब्रुवारी या दरम्यान जिल्ह्यात ९०३ जागेसाठी ३ हजार ६५८ अर्ज करण्यात आले आहेत. २५ टक्के मोफत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी ११ ते २९ फेब्रुवारी २०२० या दरम्यान पालकांनी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्या अर्जाची सोडत १७ मार्च रोजी ऑनलाईन पध्दतीने झाली.जिल्ह्यातील १४० शाळांनी यासाठी नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश मिळणार आहे. आमगाव तालुक्यातील ११ शाळांमध्ये ८७ जागेसाठी ४०६ अर्ज आले आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १३ शाळांमधील ९१ जागेसाठी २४५ अर्ज, देवरी तालुक्यातील १० शाळांमधील ५५ जागेसाठी १६१ अर्ज, गोंदिया तालुक्यातील ५७ शाळांमधील ३५६ जागेसाठी १ हजार ८२६ अर्ज करण्यात आले आहेत.गोरेगाव तालुक्यातील १५ शाळांमधील ७४ जागेसाठी २९८ अर्ज, सडक-अर्जुनी तालुक्यातील १० शाळांमधील ४५ जागेसाठी १४५ अर्ज, सालेकसा तालुक्यातील ५ शाळांमधील ४४ जागेसाठी ११८ अर्ज, तिरोडा तालुक्यातील १९ शाळांमधील १५१ जागेसाठी ४५९ अर्ज करण्यात आले आहेत. एकूण १४० शाळांमधील ९०३ जागेसाठी ३ हजार ६५८ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यांची लॉटरी आॅनलाईन पध्दतीने काढण्यात आली.गुरुवारी (दि.१९) रोजी दुपारनंतर ज्या पाल्यांचे नंबर लागले त्यांच्या पालकांच्या मोबाईलवर दुपारनंतर मॅसेज जाणार आहेत. पोर्टलवर लिस्ट सुध्दा टाकली जाणार आहे. त्यात प्रतीक्षा यादी देखील सोबतच लावली जाणार आहे.कागदपत्रांचे व्हेरिफीकेशन ३१ मार्चनंतरपालकांनी सोडतीच्या एसएमएस वरच अवलंबून राहू नये. गुरूवारी दुपारनंतर अप्लीकेशनवर जाऊन सविस्तर माहिती घ्यावी. आपल्या पाल्यांला लॉटरी लागली की नाही हे पाहावे.ज्यांना लॉटरी लागली त्यांनी संबधीत शाळेत जाऊन कागदपत्रांची पडताळणी लगेच करायची असते. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने आरटीईच्या कागदपत्रांची पडताळणी ३१ मार्चनंतरच संबधीत शाळांत करण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Educationशिक्षण