शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

२३ वर्ष लोटूनही धरणापासून सिंचन होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 21:48 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा बेवारटोला सिंचन प्रकल्प २३ वर्ष लोटूनही अद्यापही पूर्ण झाला नाही. परिणामी या प्रकल्पावर करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च सुध्दा व्यर्थ ठरत आहे. तर तालुक्यातील शेतकरी सुध्दा सिंचनापासून वंचित आहेत.

ठळक मुद्देबेवारटोला प्रकल्प अर्धवटच : हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित, प्रशासनाचे वेळकाढू धोरण

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा बेवारटोला सिंचन प्रकल्प २३ वर्ष लोटूनही अद्यापही पूर्ण झाला नाही. परिणामी या प्रकल्पावर करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च सुध्दा व्यर्थ ठरत आहे. तर तालुक्यातील शेतकरी सुध्दा सिंचनापासून वंचित आहेत.दीर्घ काळानंतर १९९५ मध्ये महाराष्ट्रात सत्तापालट होऊन प्रथमच भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन झाले होते. तत्कालीन पाटबंधारे मंत्री महादेवराव शिवणकर यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यात अनेक सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली. त्यात सालेकसा तालुक्याच्या बेवारटोला गावाजवळ मध्यम सिंचन प्रकल्प स्थापित करुन दरेकसा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला सुजलाम सुफलाम करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला. बेवारटोला प्रकल्पाला १ जानेवारी १९९६ ला मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली. यानंतर काही दिवसांनी या प्रकल्पाचे विधिवत भूमिपूजन करण्यात आले. प्रकल्पासाठी त्या वेळी ८७९.५५ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले होते. या प्रकल्पाचे भूमिपूजन करताना सदर सिंचन प्रकल्प तीन वर्षात पूर्ण होऊन दरेकसा परिसरातील शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळू शकेल अशी ग्वाही दिली होती. त्यामुळे आदिवासी भागातील शेतकºयांच्या मनात त्यावेळी मोठ्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. कामालाही वेगाने सुरुवात झाली होती. बेवारटोला आणि नवाटोला ही दोन गावे या धरणाच्या बुडीत क्षेत्रात आल्याने २३६ लोकांच्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेला सुध्दा सुरुवात झाली होती. ६४ कुटुंबाचे विचारपूर गावाजवळ स्थलांतरण करुन पुनर्वसन करण्यात आले. परंतु प्रकल्प निर्मितीला सुरुवात झाल्यानंतर म्हणजे १९९६ पासून आजपर्यंत जवळपास २३ वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटून ही शेतकºयांना सिंचनाची सुविधा प्राप्त झाली नाही.विद्यमान सरकारचेही वेळकाढू धोरणमागील पाच वर्षापासून राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असून खासदार आमदार सुद्धा भाजपचे आहे. गल्ली ते दिल्लीपर्यंत भाजपचे शासन असून सुद्धा हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने कोणतीच पाऊले उचलण्यात आले नाही. त्यामुळे मागील २३ वर्षांपासून शेतकरी सिंचनापासून वंचित आहे.रेल्वेच्या मंजुरीचा अडसरबेवारटोला जलाशयाचे काम ८० ते ९० टक्के पर्यंत पूर्ण झाले. जलसाठा संग्रहित होऊ लागला.परंतु पाण्याचे वितरण करणारे मुख्य दोन्ही कालवे अद्यापही अर्धवट आहेत.डावा कालवा काही प्रमाणात तयार झाला असला तरी उजवा कालवा चांदसूरज गावाजवळ रेल्वेच्या मंजुरीअभावी रखडला आहे.आघाडी शासनाचेही दुर्लक्ष१९९९ पर्यंत धरणाचे व कालव्याचे काम तर पूर्ण झालेच नाही. परंतु पाच वर्ष युतीचे शासन गेले आणि त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रावादी काँग्रेसचे आघाडीचे शासन आले. सतत १५ वर्ष काँग्रेस-राष्ट्रावादी काँग्रेसचे सरकार राहून या दरम्यान या क्षेत्रात आमदार सुद्धा बदलत गेले. कधी भाजप तर कधी काँग्रेसला संधी मिळाली.परंतु बेवारटोला प्रकल्पाची तांत्रिक अडचण दूर करुन धरणाचे काम पूर्ण करीत कालव्याच्या निर्मितीचे अडचण दूर करण्याचे काम झाले नाही.परिणामी शेतकरी सिंचनापासून वंचित राहिले.

टॅग्स :Waterपाणी