शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
MS धोनीनं टाकला 'कॅप्टन कूल' नावावर 'रुमाल'! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
5
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
6
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
7
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
8
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
9
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
10
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
11
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
12
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
13
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
14
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
15
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
16
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
17
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
18
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
19
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
20
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

२३ वर्ष लोटूनही धरणापासून सिंचन होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 21:48 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा बेवारटोला सिंचन प्रकल्प २३ वर्ष लोटूनही अद्यापही पूर्ण झाला नाही. परिणामी या प्रकल्पावर करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च सुध्दा व्यर्थ ठरत आहे. तर तालुक्यातील शेतकरी सुध्दा सिंचनापासून वंचित आहेत.

ठळक मुद्देबेवारटोला प्रकल्प अर्धवटच : हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित, प्रशासनाचे वेळकाढू धोरण

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा बेवारटोला सिंचन प्रकल्प २३ वर्ष लोटूनही अद्यापही पूर्ण झाला नाही. परिणामी या प्रकल्पावर करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च सुध्दा व्यर्थ ठरत आहे. तर तालुक्यातील शेतकरी सुध्दा सिंचनापासून वंचित आहेत.दीर्घ काळानंतर १९९५ मध्ये महाराष्ट्रात सत्तापालट होऊन प्रथमच भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन झाले होते. तत्कालीन पाटबंधारे मंत्री महादेवराव शिवणकर यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यात अनेक सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली. त्यात सालेकसा तालुक्याच्या बेवारटोला गावाजवळ मध्यम सिंचन प्रकल्प स्थापित करुन दरेकसा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला सुजलाम सुफलाम करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला. बेवारटोला प्रकल्पाला १ जानेवारी १९९६ ला मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली. यानंतर काही दिवसांनी या प्रकल्पाचे विधिवत भूमिपूजन करण्यात आले. प्रकल्पासाठी त्या वेळी ८७९.५५ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले होते. या प्रकल्पाचे भूमिपूजन करताना सदर सिंचन प्रकल्प तीन वर्षात पूर्ण होऊन दरेकसा परिसरातील शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळू शकेल अशी ग्वाही दिली होती. त्यामुळे आदिवासी भागातील शेतकºयांच्या मनात त्यावेळी मोठ्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. कामालाही वेगाने सुरुवात झाली होती. बेवारटोला आणि नवाटोला ही दोन गावे या धरणाच्या बुडीत क्षेत्रात आल्याने २३६ लोकांच्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेला सुध्दा सुरुवात झाली होती. ६४ कुटुंबाचे विचारपूर गावाजवळ स्थलांतरण करुन पुनर्वसन करण्यात आले. परंतु प्रकल्प निर्मितीला सुरुवात झाल्यानंतर म्हणजे १९९६ पासून आजपर्यंत जवळपास २३ वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटून ही शेतकºयांना सिंचनाची सुविधा प्राप्त झाली नाही.विद्यमान सरकारचेही वेळकाढू धोरणमागील पाच वर्षापासून राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असून खासदार आमदार सुद्धा भाजपचे आहे. गल्ली ते दिल्लीपर्यंत भाजपचे शासन असून सुद्धा हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने कोणतीच पाऊले उचलण्यात आले नाही. त्यामुळे मागील २३ वर्षांपासून शेतकरी सिंचनापासून वंचित आहे.रेल्वेच्या मंजुरीचा अडसरबेवारटोला जलाशयाचे काम ८० ते ९० टक्के पर्यंत पूर्ण झाले. जलसाठा संग्रहित होऊ लागला.परंतु पाण्याचे वितरण करणारे मुख्य दोन्ही कालवे अद्यापही अर्धवट आहेत.डावा कालवा काही प्रमाणात तयार झाला असला तरी उजवा कालवा चांदसूरज गावाजवळ रेल्वेच्या मंजुरीअभावी रखडला आहे.आघाडी शासनाचेही दुर्लक्ष१९९९ पर्यंत धरणाचे व कालव्याचे काम तर पूर्ण झालेच नाही. परंतु पाच वर्ष युतीचे शासन गेले आणि त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रावादी काँग्रेसचे आघाडीचे शासन आले. सतत १५ वर्ष काँग्रेस-राष्ट्रावादी काँग्रेसचे सरकार राहून या दरम्यान या क्षेत्रात आमदार सुद्धा बदलत गेले. कधी भाजप तर कधी काँग्रेसला संधी मिळाली.परंतु बेवारटोला प्रकल्पाची तांत्रिक अडचण दूर करुन धरणाचे काम पूर्ण करीत कालव्याच्या निर्मितीचे अडचण दूर करण्याचे काम झाले नाही.परिणामी शेतकरी सिंचनापासून वंचित राहिले.

टॅग्स :Waterपाणी