शहरं
Join us  
Trending Stories
1
१९७१ च्या युद्वावेळी भारतानं संधी गमावली?; करतारपूर साहिब उल्लेख करत मोदींचा मोठा डाव
2
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
3
बिल्डर 'बाळा'चा गरीब ड्रायव्हरला अडकविण्याचा प्रयत्न; म्हणतोय, मी नाही तो गाडी चालवत होता...
4
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
5
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
6
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
7
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या दरात अचानक मोठी घसरण? पटापट चेक करा आजचे दर
8
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर
9
बांग्लादेशी खासदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवणारी महिला अटकेत; मुंबई कनेक्शनही समोर
10
Sunrisers Hyderabad Predicted XI, IPL 2024 SRH vs RR: पराभवातून धडा घेत SRH संघात करणार एक महत्त्वाचा बदल; अनुभवी स्टार खेळाडूची होणार 'एन्ट्री'
11
दीपिकाचा प्रेग्नंसी ग्लो! हिरव्या वनपीसमध्ये दिसतेय खूपच सुंदर; Video व्हायरल
12
Arvind Kejriwal : "मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
13
Sankashti Chaturthi 2024: गणपतीची आरती झाल्यावर आपण जे कवन म्हणतो, ते कुठून आलं? वाचा!
14
घटस्फोटित पती-पत्नीच आमनेसामने, काय होणार?
15
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
16
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
17
पंतप्रधान मोदींना भेटून गोविंदाने सांगितली 'मन की बात', म्हणाला - "हा माझ्यासाठी सन्मान.."
18
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
19
'सिंघम ३'च्या सेटवरुन अजय देवगणचा फर्स्ट लूक समोर, जम्मू-काश्मीरमध्ये शूटिंग करतोय बाजीराव सिंघम
20
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!

बाबाटोलीतील ९० टक्के कुटुंबांकडे रेशनकार्डच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 11:57 PM

मागील चार दिवसांपासून लोकमतने बाबाटोली येथील लोकांच्या भौतिक सोयी सुविधांच्या समस्या उचलून धरल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती : अनेकदा उपाशीपोटी काढावी लागते रात्र

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : मागील चार दिवसांपासून लोकमतने बाबाटोली येथील लोकांच्या भौतिक सोयी सुविधांच्या समस्या उचलून धरल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे. तर बाबाटोलीत जीवन जगत असलेल्या फकीर समाजाला स्वातंत्र्याच्या ७१ वर्षानंतरही अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांसाठी येथील नागरिकांना प्रचंड संघर्ष करावा लागत असल्याची बाब पुढे आली आहे.शासन, प्रशासन लक्ष देत नसल्याने त्यांना आजही पोटाची खडगी भरण्यासाठी वणवण भटकावे लागते. कधी कधी त्यांना उपाशी पोटी रात्र काढावी लागते. लोकमत प्रतिनिधीने बाबाटोली येथील नागरिकांशी संवाद साधला असता येथील ५० स्थायी कुटुंबापैकी केवळ चार कुटुंबाकडे अंत्योदय योजनेचे रेशनकार्डच आहे. तर उर्वरित ९० टक्के कुटुंबांकडे रेशनकार्ड नाही. परिणामी त्यांना अन्नधान्य मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.बाबाटोलीतील महिला पुरुषांसह छोटी मुले एखादा देवदूत येईल आणि आपल्या सर्व समस्या दूर करेल अशी आशा बाळगून आहेत. आम्हाला स्वस्त धान्य दुकानातून दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ मिळावे,अशी अपेक्षा करीत योजनेचा लाभ सुरु करुन द्या हो साहेब अशी आर्त हाक देत होते. २० वर्षांपूर्वी पंतपधान अटबिहारी वाजपेयी यांनी गोरगरिबांसाठी अंत्योदय योजना सुरू केली.या योजनेतंर्गत दोन रुपये किलो गहू, तीन रुपये किलो तांदूळ मिळण्याची सोय प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात केली. त्यानंतर सर्वेक्षणानुसार पात्र लाभार्थ्यांची संख्या वाढत गेली.या योजनेमुळे उपाशी पोटी झोपणाऱ्या लोकांना दिलासा मिळाला होता. परंतू बाबाटोली येथे ३० वर्षापासून वास्तव्यास असलेल्या फकीर समाजाला याचा लाभ मिळाला नाही.जर आम्हाला तीन रुपये किलो तांदूळ मिळण्याचा लाभ देऊ शकत नसाल तर कमीत कमी ५ रुपये किलो तांदूळ योजनेचा लाभ तरी द्या, आम्ही आपल्या मुलांना पोटभर जेवायला देऊ शकू अशी विनंती बाबाटोलीतील नागरिक करीत होते. साधारणत: कोणत्याही कुटुंबाला रेशनकार्ड बनविण्यासाठी रहिवासी दाखला, घर टॅक्स पावती, आधार कार्ड, बँक खाते आणि शंभर रुपयाचे स्टँम्प पेपर तयार करुन तहसील कार्यालयात अर्जासह सादर केल्यास रेशनकार्ड तयार केले जाते.मात्र बाबाटोलीवासीयांना अद्यापही याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे दारिद्रयात जीवन जगून सुध्दा शासकीय योजनापासून वंचित राहावे लागत आहे.मागील तीन दशकांपासून आम्ही येथे राहत आहोत. जवळपास शंभर लोकांचे नाव मतदार यादीत आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी नेते आमच्यापर्यंत येतात मात्र अद्यापही रेशनकार्ड मिळवून देण्यासाठी कुणीच पुढाकार घेतला नाही.-काहारबी शाह, नागरिकरेशन कार्ड तयार केल्यास सर्वांना अंत्योदय योजनेत अन्नधान्य देण्यात येईल. त्यांनी यासाठी पुढाकार घेतल्यास रेशन कार्ड बनविण्यास आपण सहकार्य करू.-खेमराज साखरे,रेशन दुकानदार,सालेकसा