शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विकासासाठी मानसिकतेत बदल आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:03 IST

कृषी विकासाच्या बाबतीत गोंदिया जिल्हा अजूनही खूप मागे आहे. शेतकऱ्यांच्या पारंपरिक मानसिकतेमुळे शेतीचा विकास पाहिजे त्या गतीने होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकीकडे कृषी क्षेत्रात पीक पध्दतीमध्ये बदल व सुधार करण्यासाठी सर्व सामान्य शेतकºयांचा मानसिकतेत बदल घडवून आणणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देआधुनिक तंत्रज्ञानाची मदत : कमी पाण्याच्या पिकांची लागवड करा

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : कृषी विकासाच्या बाबतीत गोंदिया जिल्हा अजूनही खूप मागे आहे. शेतकऱ्यांच्या पारंपरिक मानसिकतेमुळे शेतीचा विकास पाहिजे त्या गतीने होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकीकडे कृषी क्षेत्रात पीक पध्दतीमध्ये बदल व सुधार करण्यासाठी सर्व सामान्य शेतकऱ्यांचा मानसिकतेत बदल घडवून आणणे आवश्यक आहे. शासन, प्रशासन आणि जबाबदार लोकप्रतिनिधी यांनी त्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण निर्माण करण्याची गरज आहे. तरच कृषी विकासाला गती मिळू शकते.१ जुलै महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचा जन्मदिन असून त्यांची जयंती राज्यात कृषी दिन म्हणून साजरी करण्यात येते. वसंतराव नाईक यांना हरित क्रांतीचे शिल्पकार मानले जाते. त्यांनी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाची स्थापना करुन शेतकरी व्यवसायात भर टाकण्यात मोठी कामगिरी बजावली. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नवनवीन प्रयोग केले. वसंतराव नाईकांनी जगाचा निरोप घेवून ३९ वर्षाचा कालावधी लोटला. मात्र त्यांचे कृषी क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य अजुनही लोकांच्या स्मरणात आहेत. शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी कृषी क्षेत्राची समग्र हरितक्रांती घडवून आली का? आज ८० ते ९० टक्के शेतकरी पारंपारिक पीक पध्दतीवर अवलंबून असून कृषी क्षेत्रात खूप मागे आहे. यातच गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी तर आपल्या नशीबाला दोष देत शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाच वापर पीक पध्दतीत बदल करण्यासंदर्भात फार मागे आहे.त्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. त्यासाठी शासन, प्रशासन आणि शेतकरी वर्गात योग्य व नि:स्वार्थ समन्वय साधण्याची गरज आहे. यात सर्वप्रथम शासनाने आपले मताचे राजकारण बाजूला ठेवून शेतकरी वर्ग कायम सुखी जीवन कसा जगेल. या दिशेने धोरणे तयार करुन त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.शासन आणि प्रशासनाने सुध्दा शेतकरी विषयक धोरण आणि निर्णयांची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास शेतकऱ्यांच्या स्थितीत नक्कीच बदल घडून येवू शकतो. शेतकरी वर्गाने आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन यशस्वी प्रयोगांची कॉपी करुन शेती करण्याची गरज आहे. तसेच बाजारपेठेचा कानोसा घेत शेतकºयांनी पिकांची लागवड केल्यास निश्चित मदत होईल.तालुक्याची ४४ टक्के जमीन कृषी उपयोगीसालेकसा तालुक्यातीचे एकूण क्षेत्रफळ ४४ हजार ६४५ हेक्टर एवढे असून त्यापैकी १९ हजार ८९४ हेक्टर जमीन लागवडीसाठी उपयोगात आणली जाते. त्यामध्ये खरीप हंगामात १६ हजार ७५१ हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाते. रबी हंगामात ३ हजार १३५ हेक्टर जमिनीवर विविध प्रकारची पिके घेण्यात येतात. अर्थात फक्त १५ टक्के जमीन रबी हंगामात उपयोगात असून ८५ टक्के शेती पुढील खरीप हंगामापर्यंत पडीक राहते. या पडीक जमिनीची उपयोग करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.पिकांचा पॅटर्न बदलण्याची गरजशेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना बगल देत बाजारपेठेचा अंदाज घेत इतर पिकांची लागवड करण्याची गरज आहे. हवामानात बदल होत असल्याने त्याचा सर्वाधिक परिणाम शेतीवर होत आहे. परिणामी उत्पादनात सुद्धा घट होत असून शेती करणे म्हणजे तोट्याचा सौदा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांची लागवड न करता इतर पिकांची लागवड करण्याची गरज आहे. तरच शेतीतील उत्पन्न वाढविणे शेतकऱ्यांना शक्य होईल.थेट शेतकºयांच्या बांधावरव्हॅलेंटाईन डे, फ्रेन्डशिप डे, असे विविध डे मधून प्रेमभाव व कृतज्ञता व्यक्त केली जाते. कृषीप्रधान देशात व जगाचा पोशिंदा समजल्या जाणाºया शेतकºयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृषी दिनी थेट शेतकºयांच्या बांधावर हा उपक्रम वसंतराव नाईक मानव विकास संशोधन संस्थतर्फे राबविण्यात येत आहे. या उपक्रमातंर्गत शेतकºयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी थेट बांधावर जाऊन शेतकºयांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचे स्वागत केले जाणार आहे.

टॅग्स :agricultureशेती