शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
3
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
4
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
5
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
6
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
7
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
8
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
9
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
10
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
11
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
12
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
13
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
14
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
15
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
16
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
17
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
18
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
19
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
20
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

कृषी विकासासाठी मानसिकतेत बदल आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:03 IST

कृषी विकासाच्या बाबतीत गोंदिया जिल्हा अजूनही खूप मागे आहे. शेतकऱ्यांच्या पारंपरिक मानसिकतेमुळे शेतीचा विकास पाहिजे त्या गतीने होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकीकडे कृषी क्षेत्रात पीक पध्दतीमध्ये बदल व सुधार करण्यासाठी सर्व सामान्य शेतकºयांचा मानसिकतेत बदल घडवून आणणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देआधुनिक तंत्रज्ञानाची मदत : कमी पाण्याच्या पिकांची लागवड करा

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : कृषी विकासाच्या बाबतीत गोंदिया जिल्हा अजूनही खूप मागे आहे. शेतकऱ्यांच्या पारंपरिक मानसिकतेमुळे शेतीचा विकास पाहिजे त्या गतीने होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकीकडे कृषी क्षेत्रात पीक पध्दतीमध्ये बदल व सुधार करण्यासाठी सर्व सामान्य शेतकऱ्यांचा मानसिकतेत बदल घडवून आणणे आवश्यक आहे. शासन, प्रशासन आणि जबाबदार लोकप्रतिनिधी यांनी त्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण निर्माण करण्याची गरज आहे. तरच कृषी विकासाला गती मिळू शकते.१ जुलै महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचा जन्मदिन असून त्यांची जयंती राज्यात कृषी दिन म्हणून साजरी करण्यात येते. वसंतराव नाईक यांना हरित क्रांतीचे शिल्पकार मानले जाते. त्यांनी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाची स्थापना करुन शेतकरी व्यवसायात भर टाकण्यात मोठी कामगिरी बजावली. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नवनवीन प्रयोग केले. वसंतराव नाईकांनी जगाचा निरोप घेवून ३९ वर्षाचा कालावधी लोटला. मात्र त्यांचे कृषी क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य अजुनही लोकांच्या स्मरणात आहेत. शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी कृषी क्षेत्राची समग्र हरितक्रांती घडवून आली का? आज ८० ते ९० टक्के शेतकरी पारंपारिक पीक पध्दतीवर अवलंबून असून कृषी क्षेत्रात खूप मागे आहे. यातच गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी तर आपल्या नशीबाला दोष देत शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाच वापर पीक पध्दतीत बदल करण्यासंदर्भात फार मागे आहे.त्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. त्यासाठी शासन, प्रशासन आणि शेतकरी वर्गात योग्य व नि:स्वार्थ समन्वय साधण्याची गरज आहे. यात सर्वप्रथम शासनाने आपले मताचे राजकारण बाजूला ठेवून शेतकरी वर्ग कायम सुखी जीवन कसा जगेल. या दिशेने धोरणे तयार करुन त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.शासन आणि प्रशासनाने सुध्दा शेतकरी विषयक धोरण आणि निर्णयांची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास शेतकऱ्यांच्या स्थितीत नक्कीच बदल घडून येवू शकतो. शेतकरी वर्गाने आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन यशस्वी प्रयोगांची कॉपी करुन शेती करण्याची गरज आहे. तसेच बाजारपेठेचा कानोसा घेत शेतकºयांनी पिकांची लागवड केल्यास निश्चित मदत होईल.तालुक्याची ४४ टक्के जमीन कृषी उपयोगीसालेकसा तालुक्यातीचे एकूण क्षेत्रफळ ४४ हजार ६४५ हेक्टर एवढे असून त्यापैकी १९ हजार ८९४ हेक्टर जमीन लागवडीसाठी उपयोगात आणली जाते. त्यामध्ये खरीप हंगामात १६ हजार ७५१ हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाते. रबी हंगामात ३ हजार १३५ हेक्टर जमिनीवर विविध प्रकारची पिके घेण्यात येतात. अर्थात फक्त १५ टक्के जमीन रबी हंगामात उपयोगात असून ८५ टक्के शेती पुढील खरीप हंगामापर्यंत पडीक राहते. या पडीक जमिनीची उपयोग करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.पिकांचा पॅटर्न बदलण्याची गरजशेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना बगल देत बाजारपेठेचा अंदाज घेत इतर पिकांची लागवड करण्याची गरज आहे. हवामानात बदल होत असल्याने त्याचा सर्वाधिक परिणाम शेतीवर होत आहे. परिणामी उत्पादनात सुद्धा घट होत असून शेती करणे म्हणजे तोट्याचा सौदा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांची लागवड न करता इतर पिकांची लागवड करण्याची गरज आहे. तरच शेतीतील उत्पन्न वाढविणे शेतकऱ्यांना शक्य होईल.थेट शेतकºयांच्या बांधावरव्हॅलेंटाईन डे, फ्रेन्डशिप डे, असे विविध डे मधून प्रेमभाव व कृतज्ञता व्यक्त केली जाते. कृषीप्रधान देशात व जगाचा पोशिंदा समजल्या जाणाºया शेतकºयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृषी दिनी थेट शेतकºयांच्या बांधावर हा उपक्रम वसंतराव नाईक मानव विकास संशोधन संस्थतर्फे राबविण्यात येत आहे. या उपक्रमातंर्गत शेतकºयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी थेट बांधावर जाऊन शेतकºयांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचे स्वागत केले जाणार आहे.

टॅग्स :agricultureशेती