शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
3
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
4
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
5
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
6
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
7
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
8
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
9
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
10
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
11
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
12
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
13
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
14
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
15
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
16
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
17
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
18
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
19
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
20
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु

कृषी विकासासाठी मानसिकतेत बदल आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:03 IST

कृषी विकासाच्या बाबतीत गोंदिया जिल्हा अजूनही खूप मागे आहे. शेतकऱ्यांच्या पारंपरिक मानसिकतेमुळे शेतीचा विकास पाहिजे त्या गतीने होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकीकडे कृषी क्षेत्रात पीक पध्दतीमध्ये बदल व सुधार करण्यासाठी सर्व सामान्य शेतकºयांचा मानसिकतेत बदल घडवून आणणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देआधुनिक तंत्रज्ञानाची मदत : कमी पाण्याच्या पिकांची लागवड करा

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : कृषी विकासाच्या बाबतीत गोंदिया जिल्हा अजूनही खूप मागे आहे. शेतकऱ्यांच्या पारंपरिक मानसिकतेमुळे शेतीचा विकास पाहिजे त्या गतीने होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकीकडे कृषी क्षेत्रात पीक पध्दतीमध्ये बदल व सुधार करण्यासाठी सर्व सामान्य शेतकऱ्यांचा मानसिकतेत बदल घडवून आणणे आवश्यक आहे. शासन, प्रशासन आणि जबाबदार लोकप्रतिनिधी यांनी त्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण निर्माण करण्याची गरज आहे. तरच कृषी विकासाला गती मिळू शकते.१ जुलै महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचा जन्मदिन असून त्यांची जयंती राज्यात कृषी दिन म्हणून साजरी करण्यात येते. वसंतराव नाईक यांना हरित क्रांतीचे शिल्पकार मानले जाते. त्यांनी डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाची स्थापना करुन शेतकरी व्यवसायात भर टाकण्यात मोठी कामगिरी बजावली. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नवनवीन प्रयोग केले. वसंतराव नाईकांनी जगाचा निरोप घेवून ३९ वर्षाचा कालावधी लोटला. मात्र त्यांचे कृषी क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य अजुनही लोकांच्या स्मरणात आहेत. शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी कृषी क्षेत्राची समग्र हरितक्रांती घडवून आली का? आज ८० ते ९० टक्के शेतकरी पारंपारिक पीक पध्दतीवर अवलंबून असून कृषी क्षेत्रात खूप मागे आहे. यातच गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी तर आपल्या नशीबाला दोष देत शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाच वापर पीक पध्दतीत बदल करण्यासंदर्भात फार मागे आहे.त्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. त्यासाठी शासन, प्रशासन आणि शेतकरी वर्गात योग्य व नि:स्वार्थ समन्वय साधण्याची गरज आहे. यात सर्वप्रथम शासनाने आपले मताचे राजकारण बाजूला ठेवून शेतकरी वर्ग कायम सुखी जीवन कसा जगेल. या दिशेने धोरणे तयार करुन त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.शासन आणि प्रशासनाने सुध्दा शेतकरी विषयक धोरण आणि निर्णयांची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास शेतकऱ्यांच्या स्थितीत नक्कीच बदल घडून येवू शकतो. शेतकरी वर्गाने आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन यशस्वी प्रयोगांची कॉपी करुन शेती करण्याची गरज आहे. तसेच बाजारपेठेचा कानोसा घेत शेतकºयांनी पिकांची लागवड केल्यास निश्चित मदत होईल.तालुक्याची ४४ टक्के जमीन कृषी उपयोगीसालेकसा तालुक्यातीचे एकूण क्षेत्रफळ ४४ हजार ६४५ हेक्टर एवढे असून त्यापैकी १९ हजार ८९४ हेक्टर जमीन लागवडीसाठी उपयोगात आणली जाते. त्यामध्ये खरीप हंगामात १६ हजार ७५१ हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाते. रबी हंगामात ३ हजार १३५ हेक्टर जमिनीवर विविध प्रकारची पिके घेण्यात येतात. अर्थात फक्त १५ टक्के जमीन रबी हंगामात उपयोगात असून ८५ टक्के शेती पुढील खरीप हंगामापर्यंत पडीक राहते. या पडीक जमिनीची उपयोग करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.पिकांचा पॅटर्न बदलण्याची गरजशेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना बगल देत बाजारपेठेचा अंदाज घेत इतर पिकांची लागवड करण्याची गरज आहे. हवामानात बदल होत असल्याने त्याचा सर्वाधिक परिणाम शेतीवर होत आहे. परिणामी उत्पादनात सुद्धा घट होत असून शेती करणे म्हणजे तोट्याचा सौदा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांची लागवड न करता इतर पिकांची लागवड करण्याची गरज आहे. तरच शेतीतील उत्पन्न वाढविणे शेतकऱ्यांना शक्य होईल.थेट शेतकºयांच्या बांधावरव्हॅलेंटाईन डे, फ्रेन्डशिप डे, असे विविध डे मधून प्रेमभाव व कृतज्ञता व्यक्त केली जाते. कृषीप्रधान देशात व जगाचा पोशिंदा समजल्या जाणाºया शेतकºयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कृषी दिनी थेट शेतकºयांच्या बांधावर हा उपक्रम वसंतराव नाईक मानव विकास संशोधन संस्थतर्फे राबविण्यात येत आहे. या उपक्रमातंर्गत शेतकºयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी थेट बांधावर जाऊन शेतकºयांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचे स्वागत केले जाणार आहे.

टॅग्स :agricultureशेती