शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

गंभीर रुग्णही गृहविलगीकरणातच, तीन महिन्यात ८० हून अधिक रुग्णांचा घरातच मृत्यु !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:29 IST

गोंदिया : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. मार्चच्या अखेरीस कोरोनाबाधित रुग्ण आणि मृतांच्या संख्येतसुध्दा सातत्याने ...

गोंदिया : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. मार्चच्या अखेरीस कोरोनाबाधित रुग्ण आणि मृतांच्या संख्येतसुध्दा सातत्याने वाढ होत आहे. एप्रिल महिन्यात तर भयावह स्थिती निर्माण झाली आहे. केवळ दहा ते बारा दिवसांच्या कालावधीत दीडशे रुग्णांचा शासकीय आणि खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर बरेच रुग्ण आजाराची माहिती लपवून घरीच राहत असल्याने त्यांचा उपचारापूर्वीच घरीच मृत्यू होत असल्याचे चित्र आहे. मागील तीन महिन्याच्या कालावधीत जवळपास ८० हून अधिक रुग्णांचा घरीच मृत्यू झाला आहे. मात्र यापेक्षासुध्दा हा आकडा अधिक असण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली आहे. बरेच नागरिक भीतीपोटी टेस्ट करीत नसून आजार लपवीत आहेत. परिणामी अशा रुग्णांचा घरीच मृत्यू होत आहे. तर काही नागरिक कोरोनाने मृत्यू झाला असला तरी त्याची प्रशासनाला माहिती देत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला सुध्दा त्यांच्यापर्यंत वेळीच पोहचून उपचार करण्यास अडचण निर्माण होत आहे.

.........

१० टक्के मृत्यू घरातच

एप्रिल महिन्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णालयातसुध्दा बेड मिळणे कठीण झाले आहे. तर ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर आणि कोरोनावरील औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा सर्व वातावरणामुळे बरेच रुग्ण रुग्णालयात जाण्याऐवजी घरीच राहत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर वेळीच उपचार न झाल्याने घरीच मृत्यू होत असल्याचे चित्र आहे. एकूण मृत्यूपैकी जवळपास १५ टक्के मृत्यू हे घरीच होत आहेत. तीन महिन्यात जिल्ह्यात २२० बाधितांचा मृत्यू झाला आहे.

........

होम क्वारंटाईन रुग्णांची संख्या अधिक

जिल्ह्यात दररोज पाचशे ते सातशे कोरोना बाधित रुग्णांची भर पडत आहे. यामुळे शासकीय व खासगी रुग्णालयातसुध्दा बेड्स मिळणे कठीण झाले आहे. सौम्य आजाराच्या रुग्णांना घरीच गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. त्यामुळे गृहविलगीकरणात जवळपास ४ हजारावर रुग्ण आहेत.

.........

एकूण रुग्ण :

एकूण उपचार सुरू असलेले रुग्ण :

एकूण बरे झालेले रुग्ण :

गृहविलगीकरणात असलेले एकूण रुग्ण :

......

कारणे काय

कोरोनाबाबत अद्यापही नागरिकांमध्ये संभ्रमाचे आणि भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे बरेच जण कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतरही उपचारासाठी जात नाही. कोरोनाची माहिती लपवित घरीच थातूरमातूर उपचार करतात. त्यामुळे त्यांच्यापासून कुटुंबीयांनासुध्दा संसर्ग वाढत आहे. अशात गंभीर रुग्णांचा घरीच मृत्यू होत आहे. लक्षणे दिसताच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घेतल्यास अनेकांचे प्राण वाचविणे शक्य आहे.

.........

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेणे अथवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन कोरोनाची चाचणी करून घेणे आवश्यक आहे. मात्र बरेच रुग्ण याकडे दुर्लक्ष करीत असल्याने संसर्गात वाढ होत असून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे वेळीच सजग होत उपचार घेण्याची गरज आहे.

- डॉ. अमरिश मोहबे, जिल्हा शल्यचिकित्सक.