शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

गंभीर रुग्णही गृहविलगीकरणातच, तीन महिन्यात ८० हून अधिक रुग्णांचा घरातच मृत्यु !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:29 IST

गोंदिया : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. मार्चच्या अखेरीस कोरोनाबाधित रुग्ण आणि मृतांच्या संख्येतसुध्दा सातत्याने ...

गोंदिया : जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. मार्चच्या अखेरीस कोरोनाबाधित रुग्ण आणि मृतांच्या संख्येतसुध्दा सातत्याने वाढ होत आहे. एप्रिल महिन्यात तर भयावह स्थिती निर्माण झाली आहे. केवळ दहा ते बारा दिवसांच्या कालावधीत दीडशे रुग्णांचा शासकीय आणि खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तर बरेच रुग्ण आजाराची माहिती लपवून घरीच राहत असल्याने त्यांचा उपचारापूर्वीच घरीच मृत्यू होत असल्याचे चित्र आहे. मागील तीन महिन्याच्या कालावधीत जवळपास ८० हून अधिक रुग्णांचा घरीच मृत्यू झाला आहे. मात्र यापेक्षासुध्दा हा आकडा अधिक असण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली आहे. बरेच नागरिक भीतीपोटी टेस्ट करीत नसून आजार लपवीत आहेत. परिणामी अशा रुग्णांचा घरीच मृत्यू होत आहे. तर काही नागरिक कोरोनाने मृत्यू झाला असला तरी त्याची प्रशासनाला माहिती देत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला सुध्दा त्यांच्यापर्यंत वेळीच पोहचून उपचार करण्यास अडचण निर्माण होत आहे.

.........

१० टक्के मृत्यू घरातच

एप्रिल महिन्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णालयातसुध्दा बेड मिळणे कठीण झाले आहे. तर ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर आणि कोरोनावरील औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा सर्व वातावरणामुळे बरेच रुग्ण रुग्णालयात जाण्याऐवजी घरीच राहत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर वेळीच उपचार न झाल्याने घरीच मृत्यू होत असल्याचे चित्र आहे. एकूण मृत्यूपैकी जवळपास १५ टक्के मृत्यू हे घरीच होत आहेत. तीन महिन्यात जिल्ह्यात २२० बाधितांचा मृत्यू झाला आहे.

........

होम क्वारंटाईन रुग्णांची संख्या अधिक

जिल्ह्यात दररोज पाचशे ते सातशे कोरोना बाधित रुग्णांची भर पडत आहे. यामुळे शासकीय व खासगी रुग्णालयातसुध्दा बेड्स मिळणे कठीण झाले आहे. सौम्य आजाराच्या रुग्णांना घरीच गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. त्यामुळे गृहविलगीकरणात जवळपास ४ हजारावर रुग्ण आहेत.

.........

एकूण रुग्ण :

एकूण उपचार सुरू असलेले रुग्ण :

एकूण बरे झालेले रुग्ण :

गृहविलगीकरणात असलेले एकूण रुग्ण :

......

कारणे काय

कोरोनाबाबत अद्यापही नागरिकांमध्ये संभ्रमाचे आणि भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे बरेच जण कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतरही उपचारासाठी जात नाही. कोरोनाची माहिती लपवित घरीच थातूरमातूर उपचार करतात. त्यामुळे त्यांच्यापासून कुटुंबीयांनासुध्दा संसर्ग वाढत आहे. अशात गंभीर रुग्णांचा घरीच मृत्यू होत आहे. लक्षणे दिसताच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घेतल्यास अनेकांचे प्राण वाचविणे शक्य आहे.

.........

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेणे अथवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन कोरोनाची चाचणी करून घेणे आवश्यक आहे. मात्र बरेच रुग्ण याकडे दुर्लक्ष करीत असल्याने संसर्गात वाढ होत असून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे वेळीच सजग होत उपचार घेण्याची गरज आहे.

- डॉ. अमरिश मोहबे, जिल्हा शल्यचिकित्सक.