शहरं
Join us  
Trending Stories
1
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
2
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
3
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
4
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
5
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
6
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
7
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
8
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
9
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
10
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
11
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
14
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
15
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
16
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
17
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
18
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
19
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
20
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

मोहफुलाला कृषी उत्पादन म्हणून मान्यता द्यावी

By admin | Updated: December 21, 2014 23:02 IST

मोहफुलाला छत्तीसगड व मध्य प्रदेश राज्याप्रमाणे वनविभाग व महसूल विभागाच्या नियंत्रणातून मुक्त करण्यात यावे आणि कृषी उत्पादन म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे.

गोंदिया : मोहफुलाला छत्तीसगड व मध्य प्रदेश राज्याप्रमाणे वनविभाग व महसूल विभागाच्या नियंत्रणातून मुक्त करण्यात यावे आणि कृषी उत्पादन म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. यासाठी भाजपच्या शिष्टमडळाने राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना १८ डिसेंबर रोजी नागपूर येथील वनभवनात मागणीचे निवेदन देऊन चर्चा केली.
यावेळी शिष्टमंडळात भाजप जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, आमदार संजय पुराम, माजी आमदार केशवराव मानकर, मोहफूल संघर्ष समितीचे नंदकिशोर असाटी, जयंत शुक्ला आदी पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात, विदर्भात मोठ्या प्रमाणात मोहफुलाचे उत्पादन होते. पूर्व विदर्भातील आदिवासी जनतेला मोहफूल संकलनापासून काही काळ रोजगारही उपलब्ध होतो. मात्र शासनाने मोहफुलाला वनोपज उत्पादन म्हणून मंजूरी न दिल्याने मोहफूल संकलन, संग्रह, खरेदी-विक्री, वाहतूक आदी बाबींवर मर्यादा व निर्बंध येत आहेत. परिणामी मोठ्या प्रमाणात मोहफूल उत्पादन विदर्भात होत असले तरी त्याचा लाभ आदिवासी व शेतकरी यांच्यासह व्यवसायाकरिता होत नाही. राज्यातील एकूण वनसंपदेपैकी मोहफुलाचे उत्पादन १० टक्के वनांमध्ये तर ९० टक्के शेतजमिनीमध्ये होते. असे असतानाही, मोहफुलाला कृषी उपज मान्यता न देता वनोपज उत्पादन म्हणून शासनाने मान्यता दिली आहे.
फेब्रुवारी ते सप्टेंबर या काळात मोहफुलावर वनविभाग, महसूल विभाग व पोलीस विभागाचे नियंत्रण राहत असून या फळावर रॉयल्टी व टी.पी. लागत असल्याने परवानाधारक व्यापारी मोहफुलाची खरेदी करतो. मात्र मोहफूल गोळा करून विक्री करणाऱ्या आदिवासी बांधवांना त्याचा मोबदला अत्यल्प मिळतो. तसेच मोहफुलावर प्रति क्विंटल १०० रुपये लागणारी रॉयल्टी भरून किंवा न भरताही मोहफूल शेजारील छत्तीसगड व मध्य प्रदेश राज्यात व्यापाऱ्यांकडून विकला जातो. त्यामुळे राज्याच्या महसूलाचे नुकसान होते.
त्यामुळे मोहफुलावरील वनविभाग, महसूल विभाग व पोलीस विभागाचे नियंत्रण काढून त्याला कृषी उपज उत्पादनाचा दर्जा मिळाल्यास मोहफूल गोळा करून विक्री करणाऱ्या आदिवासी व शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल आणि राज्य शासनाच्या महसूलातही वाढ होईल. त्यामुळे मोहफुलाला वनविभाग व महसूल विभागाच्या नियंत्रणातून मुक्त करण्यात यावे आणि मोहफुलाला कृषी उत्पादन म्हणून मान्यता देण्यात यावे असे नमूद आहे.
निवेदन देताना, भाजप पदाधिकाऱ्यांसह मोहफुल संघर्ष समितीचे सिताराम अग्रवाल, व्दारकाप्रसाद अग्रवाल, विजेंद्र अग्रवाल, सोमेश गुप्ता, विरेंद्र जैन, दौलत अग्रवाल, दिनेश असाटी, विनोद खंडेलवाल, पंकज सोनवाने आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.