शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉकडाऊन’मुळे वाजंत्री व्यावसायीकांवर उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:00 IST

वाजंत्री व्यावसायीकांना शासनाच्या योजनेतंर्गत मोफत अन्नधान्य देखील मिळत नाही. त्यामुळे त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ घेता येत नाही. सामाजिक न्याय विभागाच्या बजेटमध्ये १३ टक्के निधी मिळतो. यापैकी ६ टक्के राज्य शासनाच्या निधीचा समावेश असतो. यापैकी काही निधी वैयक्तीक लाभाच्या योजनांवर सुद्धा खर्च केला जातो. जिल्हा परिषदेला स्वत:च्या निधीतून २० टक्के निधी खर्च करण्याचे अधिकार आहे.

ठळक मुद्देप्रती कुटुंब १० हजारांची मदत द्या : जिल्हा परिषदने करावी मदत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देश आणि राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे याला प्रतिबंध लावण्यासाठी मागील २२ मार्चपासून देशभरात ‘लॉकडाऊन’ आणि संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे याचा सर्वाधिक फटका हातावर आणून पानावर खाणाऱ्यांना बसत आहे. तर विवाह समारंभांसह इतर सर्व कार्यक्रम रद्द केल्याने वाजंत्री व्यावसायीकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यंदा दिवाळीपूर्वी विवाहाचा मुहूर्त निघणे कोरोनामुळे कठीण आहे. त्यामुळे वाजंत्री व्यावसायीकांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.वाजंत्री व्यावसायीकांना शासनाच्या योजनेतंर्गत मोफत अन्नधान्य देखील मिळत नाही. त्यामुळे त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ घेता येत नाही. सामाजिक न्याय विभागाच्या बजेटमध्ये १३ टक्के निधी मिळतो. यापैकी ६ टक्के राज्य शासनाच्या निधीचा समावेश असतो. यापैकी काही निधी वैयक्तीक लाभाच्या योजनांवर सुद्धा खर्च केला जातो. जिल्हा परिषदेला स्वत:च्या निधीतून २० टक्के निधी खर्च करण्याचे अधिकार आहे. त्यामुळे ‘लॉकडाऊन’मुळे वाजंत्री व्यावसायीकांवर आलेले उपासमारीचे संकट लक्षात घेता जिल्हा परिषदेने स्वत:च्या निधीतून जिल्ह्यातील वाजंत्री व्यावसायीकांच्या कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत करावी. तसेच सामाजिक न्याय विभागाने सुद्धा यासाठी हातभार लावावा अशी मागणी माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी केली आहे.‘लॉकडाऊन’मुळे सर्व नियोजित विवाह सोहळे आणि इतर सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा वाजंत्री व्यावसायीकांचा व्यवसाय पूर्णपणे बुडाला आहे. कोरोनाचे संकट पुन्हा किती दिवस राहते हे अद्याप सांगता येणे कठीण आहे. त्यामुळे तोपर्यंत वाजंत्री व्यावसायीकांच्या कुटुंबीयांची परवड होवू नये यासाठी शासन आणि स्थानिक जिल्हा प्रशासनाने आर्थिक मदत केल्यास त्यांना मोठा आधार मिळू शकेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या