शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

तलाव खोलीकरणाच्या कामाला सुरु वात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 5:00 AM

कोरोनाच्या प्रादुर्भाव बघता गेल्या २२ मार्चपासून संचारबंदी राज्यात लागू करण्यात आली आहे. यामुळे सर्वच उद्योगधंदे ठप्प पडले होते. आता हळुवार सुरूवात होत आहे. मात्र ग्रामीण भागातील लोकांच्या रोजगारासाठीचा एकमेव आधार म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असून ही कामे बंद असल्याने ग्रामीण भागातील जनता अडचणीत आली आहे.

ठळक मुद्दे१३८६ मजुरांच्या हाताला काम : कुंभरे तलाव व मिरगी बोडीचे खोलीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जलसंधारण प्रकारातील ढेकलु कुंभरे तलावाच्या खोलीकरणाचे काम शुक्रवारी (दि.२९) तर मिरगी बोडी खोलीकरणाचे काम शनिवारी (दि.३०) सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या २ महिन्यांपासून हातावर हात मांडून बसलेल्या शेकडो मजुरांच्या हाताला मनरेगामुळे काम मिळाले आहे.कोरोनाच्या प्रादुर्भाव बघता गेल्या २२ मार्चपासून संचारबंदी राज्यात लागू करण्यात आली आहे. यामुळे सर्वच उद्योगधंदे ठप्प पडले होते. आता हळुवार सुरूवात होत आहे. मात्र ग्रामीण भागातील लोकांच्या रोजगारासाठीचा एकमेव आधार म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असून ही कामे बंद असल्याने ग्रामीण भागातील जनता अडचणीत आली आहे. कामे नसल्यामुळे ग्रामीण जनता हातावर हात देऊन घरी बसले होते. त्यामुळे ना-रोजी, ना-रोटी अशी हलाखीची अवस्था ग्रामीण भागातील मजुरांची झाली होती.अशा हलाखीच्या वेळी शुक्रवारी (दि.२९) नवेगावबांध येथे तलाव खोलीकरणाचे काम सुरू झाले. त्यामुळे मागील २ महिन्यांपासून बेरोजगार असलेल्या मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. या कामावर अकुशल चार लाख ६४ हजार तर कुशल १८ हजार ३७६ असे एकूण चार लाख ८३ हजार ३७९ रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या कामावर गावातील २१४ पुरुष तर ५२३ महिला असे एकूण ७३७ मजूर काम करीत आहेत. तर मिरगी बोडी खोलीकरण कामावर २४३ पुरुष व ४०६ महिला असे एकूण ६४९ मजूर आहेत.या कामावर अकुशल चार लाख ८७ हजार ४८५ रु पये तर कुशल पाच हजार ४२९ असे एकूण चार लाख ९२ हजार ९१४ रु पये खर्च करण्यात येणार आहेत. या दोन्ही कामांतून चार हजार ६२३ मनुष्य दिवस काम गावातील मजुरांना मिळणार आहे. या कामांवर गावातील एक हजार ३८६ मजुरांना काम मिळाले आहे असून त्यांना आर्थिक हातभार लागला आहे.एकाच कामावर जास्त गर्दी होऊ नये, यासाठी मनरेगा अंतर्गत तलाव खोलीकरणाच्या कामासह ३ कामे सुरू करण्यात आली आहे. तोंडावर रुमाल किंवा मास्क बांधूनच स्त्री-पुरु ष मजुरांनी कामावर यावे अशा सूचना दिलेल्या आहेत. सॅनिटायझर, हात धुण्याचे पाणी व प्राथमिक उपचाराची व्यवस्था कामावर करण्यात आली आहे. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जावे याची काळजी घेतली जात आहे.-विलीन बडोले , रोजगार सेवक, नवेगावबांध.

टॅग्स :Waterपाणी