शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

जिल्हा परिषदमध्ये निघतात प्रतिनियुक्तीचे नियमबाह्य आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 5:00 AM

जिल्हा परिषदेतील काही अधिकारी आपल्या सोयीने कामकाज करतात.त्यातच काहींच्या कार्यप्रणालीचा अंदाज नसताना त्या कर्मचाऱ्यांवर जि.प.मेहरबान आहे. माध्यमिक शाळामंधील काही मुख्याध्यापकांसह शिक्षकांना आपल्या सेवानिवृत्तीनंतरची रक्कम निव्वळ एका कर्मचाऱ्याच्या हव्यासापोटी एका खासगी कंपनीच्या विम्यात टाकावी लागली.

ठळक मुद्देहात ओले झाल्याची चर्चा : पदोन्नती होताच प्रतिनियुक्तीवर बोलाविले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आयएसओचे स्वप्न पाहणाऱ्या जिल्हा परिषदेचा कारभार मागील काही महिन्यांपासून पूर्णपणे ढिसाळ झाला आहे. मिनी मंत्रालयात काम करणारे अधिकारी आपल्या सोयीनुसार कर्मचाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नती व सोयीनुसार प्रतिनियुक्ती देत असल्याचे प्रकार उघडकी येत आहे. वर्षानुवर्षे जिल्हा परिषदेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला पदोन्नती देण्यात आली. परंतु लगेच त्याला पुन्हा प्रतिनियुक्तीवर जिल्हा परिषदेत पदस्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.जिल्हा परिषदेतील काही अधिकारी आपल्या सोयीने कामकाज करतात.त्यातच काहींच्या कार्यप्रणालीचा अंदाज नसताना त्या कर्मचाऱ्यांवर जि.प.मेहरबान आहे. माध्यमिक शाळामंधील काही मुख्याध्यापकांसह शिक्षकांना आपल्या सेवानिवृत्तीनंतरची रक्कम निव्वळ एका कर्मचाऱ्याच्या हव्यासापोटी एका खासगी कंपनीच्या विम्यात टाकावी लागली. तरीही त्या कर्मचाऱ्यावर माध्यमिक शिक्षण विभागाची नजर जात नाही. माध्यमिक शिक्षण विभागाचा मोह न सोडणाºया या कर्मचाऱ्याची पदोन्नती आमगाव पंचायत समितीमध्ये कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून झाली.मात्र तेथे एकही दिवस नोकरी न करता राजकीय दबाव आणून आणि शस्त्रक्रिया झाल्याचे कारण देत अनुकंपा तत्वावर लागलेला एक कर्मचारी माध्यमिक विभागातील एका विशिष्ट टेबलाशिवाय दुसºया कुठल्याच कार्यालयात जिथे बदली झाली तिथे काम केल्याचे दिसून येत नाही. त्यावर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी कसे मेहरबान आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यातही कार्यालयातून कार्यमुक्त न होता सरळ रूजू झालेल्या त्या कर्मचाºयाला आमगावचे खंडविकास अधिकाºयांची मुकसंमती आहे का असा प्रश्नही निर्माण झाला आहे. तो कर्मचारी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात वरिष्ठ सहायक पदावर असताना काय केले हे त्या विभागातील सर्वांनाच नव्हे तर खासगी माध्यमिक शाळांमधील सर्वच मुख्याध्यापक व शिक्षकांना ठाऊक आहे. जिल्हा परिषदेच्या सन २०१९ मध्ये झालेल्या प्रशासकीय बदल्यांमध्ये त्या कर्मचाºयाची देवरी येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागात बदली झाली. मात्र तो तिथेही थांबला नाही. त्याने तिथून प्रतिनियुक्तीसाठी राजकीय व प्रशासकीय दबाव तंत्राचा वापर करु न घेतला. २८ मे २०१९ रोजी बदली झालेला व्यक्ती देवरीला ६ जून रोजी रूजू होते.या काळात खूप आटापिटा केला आणि आपली बदली रद्द व्हावी म्हणून कसरत केली. परंतु यश न आल्याने शेवटी ११ सप्टेंबर २०१९ रोजी प्रतिनियुक्तीवर जिल्हा परिषदेत परत आणण्यात आले.दरम्यानच्या काळात हा कर्मचारी कधीही देवरीतील कार्यालयात वेळेवर पोचला नाही. अशा कर्मचाऱ्याला आता पदोन्नती मिळाली. पदोन्नतीमध्ये आमगाव पंचायत समिती मिळाली असली तरी आपली प्रतिनियुक्ती गोंदियात करून घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहेत.

टॅग्स :Socialसामाजिक