शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी धान पिकांवर किडरोगांचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:00 IST

जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी पिकांची सुध्दा लागवड केली जाते. यंदा जिल्ह्यातील ४० हजार हेक्टरवर रब्बी धानाची लागवड करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे ते शेतकरी सुध्दा धानाची लागवड करतात. यंदा सुरुवातीला रब्बी धान पिकाच्या वाढीसाठी अनुकुल वातावरण मिळाले. त्यामुळे धानाची चांगली वाढ झाली आहे. आता धान निसविण्याच्या स्थितीत असताना त्यावर विविध किडरोगांचे आक्रमण झाले आहे.

ठळक मुद्देहाती आलेले पीक गमाविण्याची वेळ : चार हजार हेक्टरमधील पिके बाधीत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ढगाळ व उष्ण दमट वातावरणाचा परिणाम रब्बी हंगामातील धान पिकांवर होत आहे. वातावरणातील बदलामुळे ४ हजार हेक्टरमधील धान पिकांवर करपा, मानमोडी या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे हाती आलेले धानपिके गमाविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे बळीराजा चिंतातूर आहे.जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी पिकांची सुध्दा लागवड केली जाते. यंदा जिल्ह्यातील ४० हजार हेक्टरवर रब्बी धानाची लागवड करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे ते शेतकरी सुध्दा धानाची लागवड करतात. यंदा सुरुवातीला रब्बी धान पिकाच्या वाढीसाठी अनुकुल वातावरण मिळाले. त्यामुळे धानाची चांगली वाढ झाली आहे. आता धान निसविण्याच्या स्थितीत असताना त्यावर विविध किडरोगांचे आक्रमण झाले आहे.परिणामी धानावर खोडकिडा, पेरवा, मानमोडी, पर्णकोस, करपा, लोंबीवरील ढेकण्या या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने धानाचे लोंब पांढरे पडत असून शेतकºयांना हाती आलेले पीक गमाविण्याची वेळ आली आहे. कृषी विभागाच्या मते बदलत्या वातावरणाचा सर्वाधिक धान पिकावर परिणाम होत आहे. ढगाळ आणि उष्णदमट वातावरण बुरशीजन्य रोगांच्या वाढीसाठी अनुकुल असते. त्यामुळे सध्या बुरशीेजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने धानाचे लोंब पांढरे पडत आहे. ४० हजार हेक्टरपैकी जवळपास ४ हजार हेक्टरमध्ये या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्या धान निसविण्याच्या स्थितीत आहे याच कालावधी करपा, मानमोडी, पेरवा, खोडकिडा या किडरोगांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने शेतकºयांना हाती आलेले पीक गमवावे तर लागणार नाही ना अशी चिंता सतावित आहेत. धानावरील किडरोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकरी विविध किटकनाशकांची फवारणी करीत आहेत. मात्र यानंतरही किडरोग आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे.सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव परिसराला फटकारब्बी हंगामातील धानाची सर्वाधिक लागवड ही अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी तालुक्यात आली आहे. मात्र या भागातील धान उत्पादक शेतकरी मागील पंधरा दिवसांपासून चिंतातूर आहे. ऐन धान निसविण्याच्या स्थितीत असताना त्यावर विविध किडरोगांचा प्रादुर्भाव झाल्याने त्यांना हाती आलेली पीक गमाविण्याची वेळ आली आहे. किटकनाशकांची फवारणी करुन सुध्दा किडरोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी सुध्दा यामुळे त्रस्त झाले आहे. किडरोगांचा प्रादुर्भाव पाहता शेतकºयांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणार की नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे.या धानावर कमी प्रादुर्भावइतर धानाच्या प्रजातींच्या तुलनेत सुमो,बाहुबली, १००१ या धानाच्या प्रजातीवर किडरोगांचा कमी प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. मागील वर्षी शेतकºयांनी अहिल्या प्रजातीच्या धानाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. त्यापासून चांगले उत्पादन मिळाल्याने शेतकºयांनी यंदा देखील मोठ्या प्रमाणावर याच धानाची लावगड केली.मात्र सध्या या धानावर किडरोगाचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे.त्यामुळे शेतकºयांनी धानपिकावरील रोगाला सुध्दा सध्या कोरोना हे नाव दिल्याची माहिती आहे.ढगाळ आणि उष्ण दमट वातावरणामुळे धानपिकावर किडरोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. जिल्ह्यातील ४० हजार हेक्टर क्षेत्रापैकी ४ हजार हेक्टरमधील पिके किडरोगामुळे बाधीत झाली आहे. किडरोगाचा प्रादुर्भाव अधिक असल्याने त्याच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्याचे अधिकार तालुका स्तरावर तहसीलदार आणि कृषी अधिकाºयांना सुध्दा आहे. तसेच शेतकºयांना मार्गदर्शन केले जात आहे.- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :agricultureशेती