शहरं
Join us  
Trending Stories
1
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
2
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
3
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
4
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
5
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
6
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
7
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
8
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
9
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
10
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
11
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
12
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
13
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
14
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
15
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
16
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
17
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
18
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
19
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
20
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्ण कालव्यांमुळे सिंचनाला फटका

By admin | Updated: December 15, 2014 22:57 IST

गेल्या १५ वर्षांपासून बेवारटोला प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. मात्र आतापर्यंत या प्रकल्पाच्या कालव्यांचे ५० टक्केसुद्धा काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे आतासुद्धा प्रकल्पाच्या जवळील

५० टक्केच काम : शेतीला पाणी मिळणे झाले दुरापास्त
सालेकसा : गेल्या १५ वर्षांपासून बेवारटोला प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. मात्र आतापर्यंत या प्रकल्पाच्या कालव्यांचे ५० टक्केसुद्धा काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे आतासुद्धा प्रकल्पाच्या जवळील शेतकऱ्यांना आपल्या शेतात सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे.
या प्रकल्पाला कार्यान्वित करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रकल्पाचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झालेले आहे. परंतु कालव्यांचे काम पूर्ण झाल्याशिवाय या प्रकल्पाचे काही औचित्य नाही. कालव्यांशिवाय शेतकऱ्यांच्या शेतात पाणी कधीही पोहोचू शकत नाही.
बेवारटोला जलाशयाचे मुख्य दोन कालवे आहेत. डाव्या कालव्याचे काम केवळ ४ किमीपर्यंत पूर्ण झाले आहे. मुंशीटोला (दलदलकुही) पर्यंतच हे काम करण्यात आले आहे. हा कालवा आतासुद्धा तुटक्याफुटल्या व अपूर्ण बांधकाम झालेल्या स्थितीत आहे. तरीसुद्धा या कालव्यातून जवळपास २०० एकर शेतजमिनीस सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.
उजव्या कालव्याचे काम चांदसूरज गावापर्यंत करण्यात आले आहे. यानंतरही याचे काम अपूर्णच आहे. या ठिकाणापर्यंत कालव्यासाठी जमीन खोदून अपूर्ण ठेवण्यात आले आहे. चांदसूरजच्या पुढे कालवा नेण्यासाठी रेल्वे लाईनच्या खाली अंडरग्राऊंड खोदकाम करावे लागणार आहे.
चांदसूरजच्या पुढे विचारपूर, ढुबरूटोला, कोपालगड, दल्लीटोला, मुरझाटोला, जमाकुडो, भर्रीटोला, ुतुरमुळीटोलापर्यंत हा कालवा जाणार आहे. या कालव्याचे जवळपास १० ते १२ किमी लांब काम आतापर्यंत सुरू होवू शकले नाही.
कालव्याच्या कामाचे सर्व्हेक्षण करून प्रस्ताव सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी दोन वर्षांपूर्वी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने काम आतापर्यंत सुरू होवू शकले नाही.
जवळपास १५ वर्षांपूर्वी युती सरकारच्या काळात या प्रकल्पाच्या बांधकामास मंजुरी मिळाली होती. त्यावेळी प्रकल्पाचा खर्च केवळ नऊ कोटी रूपये होती. परंतु आता याची किंमत ६८ कोटी रूपयांपर्यंत पोहोचली आहे. प्रकल्पाला जर पूर्ण करण्यात आले तर केपीटोला (पिपरिया) येथील कुआढास प्रकल्पालासुद्धा नवसंजीवनी मिळू शकेल. कुआढास प्रकल्पापासून जवळपास एक हजार हेक्टर कृषी क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध होवू शकेल.
बेवारटोला प्रकल्पापासून दर्रेकसा, जमाकुडो व टोयागोंदी पंचायतीच्या जवळपास एक हजार ४०० हेक्टर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना सिंचन सुविधेचा लाभ मिळू शकेल. (प्रतिनिधी)