शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

पीक विम्याचा लाभ किती शेतकऱ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 6:00 AM

जिल्ह्यातील ७० हजार ३१ शेतकऱ्यांनी एकूण ३९ हजार १२९ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला. यासाठी विमा कंपनीकडे प्रीमियम विमा कंपनीकडेभरला. ७० हजार शेतकऱ्यांनी प्रीमियमच्या रक्कमेपोटी २ कोटी ८३ लाख ८८ हजार रुपये विमा कंपनीकडे भरले. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई झाल्यास काही तरी नुकसान भरपाई मिळून मदत होईल,अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.

ठळक मुद्देकेवळ ४ हजार ३२७ शेतकऱ्यांचे पंचनामे पाठविले : परताव्यासाठी पुन्हा प्रतीक्षाच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत जिल्ह्यातील खरीप हंगामात ७० हजार ३१ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका जिल्ह्यातील धान पिकाला मोठ्या प्रमाणात बसला. शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील ४ हजार ३२७ शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तयार करुन विमा कंपनीकडे पाठविण्यात आले. मात्र पंचनाम्याच्या तुलनेत पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक असून ६५ हजार शेतकरी पीक विम्याचा लाभ मिळण्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी शेतकरी पिकांचा विमा काढतात. यासाठी शासनाने विविध जिल्ह्यात वेगवेगळ्या विमा कंपन्याची नियुक्ती केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील पीक विम्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीची नियुक्ती शासनाने केली आहे.यातंर्गत जिल्ह्यातील ७० हजार ३१ शेतकऱ्यांनी एकूण ३९ हजार १२९ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला. यासाठी विमा कंपनीकडे प्रीमियम विमा कंपनीकडेभरला. ७० हजार शेतकऱ्यांनी प्रीमियमच्या रक्कमेपोटी २ कोटी ८३ लाख ८८ हजार रुपये विमा कंपनीकडे भरले. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई झाल्यास काही तरी नुकसान भरपाई मिळून मदत होईल,अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. गेल्या खरीप हंगामात ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने याचा फटका धान पिकांना बसला.अनेक शेतकऱ्यांना हाती आलेले पीक गमवावे लागले. तर काही शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघाला नाही. शेतकऱ्यांची ओरड वाढल्यानंतर शासनाने परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन आर्थिक मदत जाहीर केली. यासाठी जिल्ह्यातील ९ हजार ७४२ शेतकरी पात्र ठरले होते. मात्र ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता त्यांना पीक विमा योजनेतंर्गत नुकसान भरपाई देण्याचे निर्देश शासनाने दिले.यातंर्गत पीक विमा कंपनीने जिल्ह्यातील एकूण ४ हजार ३२७ शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करुन परतावा मिळण्यासाठी पाठविल्याची माहिती आहे.मात्र पीक विमाधारक आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या तुलनेत विमा कंपनीकडे पाठविलेल्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे.त्यामुळे पीक विमा योजनेचा लाभ नेमका किती शेतकऱ्यांना मिळणारअसा प्रश्न निर्माण झाला आहे.तीन महिने लोटूनही परतावा नाहीज्या पीक विमाधारक शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसान झाले. त्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन विमा प्रतिनिधीने कंपनीकडे तीन महिन्यापूर्वीच पाठविले. मात्र अद्यापही विमा कंपनीकडून नुकसानीची रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. यासंदर्भात विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता पुन्हा महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी