शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

शासनाने लाख खरेदी केंद्र उघडावे

By admin | Published: May 23, 2015 1:47 AM

राज्याच्या पूर्व दिशेच्या टोकावर असलेल्या गोंदिया-भंडारा जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून लाख उत्पादन होत आहे.

उत्पादनात वाढ : लाख उत्पादक शेतकऱ्यांची मागणीगोंदिया : राज्याच्या पूर्व दिशेच्या टोकावर असलेल्या गोंदिया-भंडारा जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून लाख उत्पादन होत आहे. यात वाढ व्हावी म्हणून तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी सतत प्रशिक्षण आयोजित केले होते. तसेच बियाणे वितरितही झाल्याने क्षेत्रात लाख उत्पादन वाढले. परंतु लाख खरेदी केंद्राअभावी शेतकरी अडचणीत येत आहेत.लाख उत्पादनाला योग्य मूल्य मिळावे यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी प्रयत्न करून तत्कालीन यूपीए सरकारमध्ये लाखेस न्यूनतम समर्थन मूल्य घोषित करून दिले. हे समर्थन मूल्य देशातील नऊ राज्यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल आदी ठिकाणी घोषित करण्यात आले आहे. सध्याच्या एनडीएस शासनानेसुद्धा लाखेचे महत्त्व समझून सदर न्यूनतम समर्थन मूल्य लागू ठेवले आहे. परंतु कोणत्याही प्रांतात अद्याप खरेदी केंद्र उघडण्यात आले नाही, हे मोठेच दुर्भाग्यपूर्ण आहे. महाराष्ट्रसुद्धा केंद्र शासनाद्वारे घोषित सदर नऊ राज्यांच्या सूचिमध्ये आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यात व संपूर्ण देशात जेथे लाख उत्पादन होते, ही शेतकऱ्यांची आर्थिक पर्यायी व्यवस्था आहे. लाखेचे उत्पादन प्रामुख्याने आदिवासी तथा मागासलेल्या भागात होते. लाख उत्पादनासाठी अधिक पाण्याची गरज भासत नाही. तसेच लाख शेती सुगमतेने होते. बाजारात मागील वर्षी लाखेचा दर ३०० रूपये प्रति किलो होते. परंतु यावर्षी लाख ७० ते ७५ रूपये प्रति किलो दराने खुल्या बाजारात विक्री होत आहे. परंतु केंद्र शासनाने याचे समर्थन मूल्य पलास लाख २३० रूपये प्रति किलो तर कुसुमी लाख ३२० रूपये प्रति किलोच्या दराने घोषित केले आहे. महाराष्ट्र शासनाला याचे आदेशही देण्यात आले आहे. परंतु महाराष्ट्र शासनाने लाख खरेदीसाठी आतापर्यंत केंद्र उघडले नाही. तसेच खरेदीची प्रक्रियासुद्धा सुरू केली नाही. त्यामुळे गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील शेतकरी व आदिवासी यांना मोठेच नुकसान सहन करावे लागत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शासनाने त्वरित लाख खरेदी केंद्र उघडावे व शेतकऱ्यांना लाभ द्यावे, अशी मागणी किसान लाख कृषी उपज सहकारी संस्थेचे अध्यक्ष देवेंद्रनाथ चौबे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)