शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयांना गांधीजींचा विसर

By admin | Updated: January 31, 2015 23:23 IST

राष्ट्रीय थोर व्यक्तिंचा जयंती व पुण्यतिथी उत्सव तसेच राष्ट्रीय दिन सार्वजनिक सुटीच्या दिवशी किंवा महिन्याच्या दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवार व रविवारी आल्यास त्यादिवशीच साजरे करावेत

देवरी : राष्ट्रीय थोर व्यक्तिंचा जयंती व पुण्यतिथी उत्सव तसेच राष्ट्रीय दिन सार्वजनिक सुटीच्या दिवशी किंवा महिन्याच्या दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवार व रविवारी आल्यास त्यादिवशीच साजरे करावेत असे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव प्र.प्र. गोसावी यांनी काढले आहे. मात्र शासकीय कार्यालयांत विपरीत स्थिती दिसून येत आहे. त्याचे असे की, ३० जानेवारी महात्मा गांधी पुण्यतिथी असून सुद्धा शहरातील ग्रामपंचायत सोडून अन्य सर्व कार्यालयांत पुण्यतिथी कार्यक्रम घेण्यात आलाच नसल्याचे दिसून आले. यातून कार्यालय प्रमुख व कर्मचाऱ्यांना शासकीय आदेश व गांधीजींचा विसर पडला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच कृष्णदास चोपकर व सचिव आचले यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसोबत महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिपप्रज्वलन करुन पुण्यतिथी साजरी केली. एकंदर ग्रामपंचायतने शासकीय आदेशाला मान देत राष्ट्रपित्यांना अभिवादन करून मानवंदना दिली. परंतु शासकीय सेवेत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मात्र शासन आदेशच काय राष्ट्रपित्यांचाही भान राहिला नसल्याचे मुर्त उदाहरण शहरात बघावयास मिळाले. येथील उपविभागीय कार्यालय, पंचायत समिती, आदिवासी प्रकल्प कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा कार्यालयात महात्मा गांधींचा फोटो नेहमी प्रमाणे भिंतीवर टांगून होता. कार्यालयात अधिकारी हजर नव्हते. विशेष म्हणजे कार्मचाऱ्यांना विचारणा केली असता महात्मा गांधींची पुण्यतिथी होती याबाबत त्यांनाही माहिती नसल्याचे कळले. सामान्य प्रशासन विभागाने जयंती व पुण्यतिथी उत्सव साजरे त्याच दिवशी साजरा करण्याचे आदेश काढले आहे. शासनाच्या या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावनी व्हावी यासाठी पत्रकाची प्रत राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालतील विभाग प्रमुखांना पाठविण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर वर्ष २०१५ मध्ये येणाऱ्या राष्ट्रीय पुरुषांचा जयंती व पुण्यतिथी उत्सव तसेच राष्ट्रीय सणांच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक या परिपत्रकासोबत दिले असून सदर कार्यक्रम कोणत्या पद्धतीने साजरे करावेत याबाबतच्या सुचनाही त्यात देण्यात आल्या आहेत. चालू वर्षातील सुमारे २५ कार्यक्रमांची यादी या परिपत्रकासोबत आहे. असे असतानाही अधिकारी व कर्मचारी या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करीत आहेत. शासकीय आदेश असून सुद्धा शहरातील सरकारी कार्यालयांत महात्मा गांधींची पुण्यतिथी साजरी करण्यात आली नाही ही गंभीर बाब आहे. अशात शासनाच्या आदेशाची पायमल्लीच झाल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)