शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

एक जॉबकार्डधारकाला २५० दिवस काम द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:51 AM

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता रोजगार हमी योजनेंतर्गत १०० दिवस कामांच्या ऐवजी २५० दिवस कामाची कालमर्यादा वाढविण्यात यावी,

ठळक मुद्देदिलीप बन्सोड : १०० दिवस कामाचा नियम स्थगित करा

लोकमत न्यूज नेटवर्ककाचेवानी : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता रोजगार हमी योजनेंतर्गत १०० दिवस कामांच्या ऐवजी २५० दिवस कामाची कालमर्यादा वाढविण्यात यावी, अशी मागणी माजी आ. दिलीप बन्सोड यांनी उपजिल्हाधिकारी (रोहयो) व तहसीलदार तिरोडा यांना निवेदन देवून केली आहे.निवेदनानुसार, शासनाने एका कुटुंबात एक जॉबकार्ड तयार केल्यास १०० दिवस काम उपलब्ध करून देण्यात येईल, अशी तरतूद केली. एका जॉबकार्डमध्ये पाच नावे असतील तर २० दिवसच काम एका कुटुंबाला मिळणार आहे. त्यामुळे त्या कुटुंबाने वर्षभर उदरनिर्वाह कसा करावा, अशी समस्या निर्माण झाली आहे.भारत सरकारने १०० दिवस प्रत्येक कुटुंबाला काम देण्याची योजना तयार केली. त्यासाठी कुटुंबाला जॉबकार्ड तयार करायला लावले. जॉबकार्ड तयार करायला लावले. जॉबकार्ड तयार करताना स्पष्ट निर्देश देण्यात आले नसल्याने लाभार्थी कुटुंबाने एकाच जॉबकार्डमध्ये अनेक नावे नोंदविले. त्यामुळे एक पंधरवाडा किंवा तीन आठवडे काम पूर्ण झाले की त्या मजुराला कामावरून बंद केले जात आहे, असेही माजी आ. बन्सोड यांनी सांगितले.गोंदिया व भंडारा जिल्ह्यात यावर्षी पावसाअभावी दुष्काळी परिस्थित आहे. शेतकरी व शेतमजुरांना कामे नाहीत. अशात त्यांनी काय करावे.वर्षभर परिवाराचे भरणपोषण व शैक्षणिक समस्या कशी सोडवावी. अशी समस्या आहे. त्यामुळे शासनाने एका जॉबकार्डवर कमीतकमी २०० किंवा २५० दिवस कामाची सीमा वाढवावी, अशी मागणी बन्सोड यांनी केली आहे.रोहयो राज्य शासनाचीनरेगा ही भारत सरकारची योजना असून यात १०० दिवस काम देण्याची हमी देण्यात आली आहे. मात्र रोहयो ही राज्य शासनाची योजना असून यात अशी कोणतीही अट नाही. राज्य शासनाने शेतकरी व मजुरांची गंभीर समस्या पाहून जिल्ह्यात रोहयोची कामे करून सरसकट प्रत्येक मजुराला काम मिळेल, अशी योजना तयार करावी, अशी मागणी बन्सोड यांनी केली आहे.अनेक कुटुंब कामावरून बंदवर्षभरात १०० दिवसांचे कामपूर्ण झाल्याचे सांगून अनेक मजूर कामावरून बंद करण्यात आले. त्यामुळे मजुरांना एप्रिल महिन्यापर्यंत काम मिळणार नाही, अशा परिस्थितीतून बाहेर कसे पडता येईल, याचा विचार शासनाने करावा. कुटुंबावर अन्याय होणार नाही, अशी उपाययोजना करावी.मजुरांसोबत उपोषणाचा इशाराकेंद्र शासनाने आपल्या १०० दिवसांच्या कामाच्या आदेशात किंवा योजनेत बदल करून आपातस्थितीत कामाचा कालावधी वाढविण्यात यावा. तसेच राज्य शासनाने रोहयोच्या कामात वाढ करून मजुरांची समस्या मार्गी लावावी. वर्षभर पुरेल अशी व्यवस्था भंडारा व गोंदिया दोन्ही जिल्ह्यांसाठी करावी, अन्यथा मजुरांसह आंदोलन करणार, असा इशारा निवेदनातून दिला आहे.

टॅग्स :jobनोकरी