शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

धान उत्पादकांना बोनस द्या

By admin | Updated: February 3, 2015 22:58 IST

तालुक्यातील काँग्रेस कमिटीच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सोमवारी मोर्चा काढून निवेदने दिली.

गोरेगाव / सालेकसा : तालुक्यातील काँग्रेस कमिटीच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सोमवारी मोर्चा काढून निवेदने दिली.केंद्र व राज्यातील भाजपाप्रणित सरकारच्या निवडणूकपूर्व आश्वासनांची पूर्तता न करता जनतेची दिशाभूल करून फसवणूक केली आहे, असा आरोप करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केला.गोरेगावच्या ठाणा चौकातून सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यामध्ये काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष झामसिंग बघेले, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. नामदेव किरसान, जिल्हा महासचिव जगदिश येरोला, पी.जी. कटरे, तालुकाध्यक्ष डेमेंद्र रहांगडाले, राजेंद्र राठौड, जितेंद्र कटरे, शशीकांत भगत, मलेशाम येरोला, अरविंद फाये, ओमप्रकाश कटरे, महिला आघाडीचे तालुकाध्यक्ष ललिता फुंडे, सरपंच संजय आमदे, रामू हरिणखेडे, सी.टी. चौधरी, पेमेंद्र कटरे, विशाल शेंडे, विवेक मेंढे, संजय भगत यांच्यासह बहुसंख्य शेतकरी, बेरोजगार युवक व शेतमजूर प्रामुख्याने उपस्थित होते.मोर्चा तहसील कार्यालयात येऊन मान्यवरांनी भाजपा सरकारच्या आश्वासनांची व जनतेची फसवणूक करण्यात आली, हे आम्ही खपवून घेणार नाही, अशा घोषणा देत तहसीलदारांना कमिटीच्या वतीने आपल्या २० मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेस कमिटीच्या सर्व आघाड्यांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. सालेकसा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात संपूर्ण तालुक्यातील शेतकरी, बेरोजगार युवक, महिला, पुरूष, मजूर वर्ग हजारोच्या संख्येने सहभागी झाले. मोर्चात सहभागी झालेल्या लोकांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या. त्यामुळे तहसील कार्यालयाचे संपूर्ण परिसर दणाणले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा कटरे, सचिव यादवलाल बनोठे, तालुकाध्यक्ष अनिल फुंडे यांच्या नेतृत्वात माजी मंत्री भरत बहेकार यांच्या निवासस्थानावरून मोर्च्याची सुरूवात झाली. त्यानंतर बस स्थानक, पंचायत समिती चौक, को-आॅपरेटिव्ह बँक चौक, फॉरेस्ट आॅफीस समोरून सरळ तहसील कार्यालयाच्या विशाल प्रांगणात धडकला. मोर्च्यात सर्व शेतकरी, महिला व पुरूष पायी चालत गेले. तसेच ट्रॅक्टरधारक शेतकऱ्यांनी आपापल्या ट्रॅक्टरव्दारे काँग्रेसचे झेंडे घेवून ट्रॅक्टरसह मोर्च्यात सहभागी झाले. मागण्यांमध्ये प्रामुख्याने धानाला ५०० रूपये बोनस, वीज बिल माफ करणे, नवीन डिमांड दर कमी करणे, मनरेगाची कामे त्वरित सुरू करणे, शेती कामे मनरेगा अंतर्गत करावे, अन्न सुरक्षा कायदा अंमलात आणावे, गॅस पुरवठा धोरण पूर्ववत करावे, केरोसिन पुरवठा कायम ठेवावे, कृषी उत्पादनाच्या हमी भावात वाढ करणे, खताच्या किमती कमी करावे, शासनाने केलेल्या घोषणा प्रामाणिकपणे पूर्ण करावे, कर्ज वसुली मोहीम थांबविणे, भूमी अधिग्रहण कायदा रद्द करावे, बेरोजगार युवकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून द्यावे आदी मागण्यांचा समावेश होता. मोर्च्यात कैलाश अग्रवाल, सचिन बहेकार, मुन्ना शर्मा, देवचंद ढेकवार, मयाराम फुंडे, खेमराज साखरे व अनेक कार्यकर्ते सहभागी होते. (तालुका प्रतिनिधी/प्रतिनिधी)