शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

शहरवासी व व्यापाऱ्यांना रान मोकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 05:00 IST

अनलॉक करताना शासनाने नियमांचे कठोरतेने पालन करावे लागणार असे स्पष्ट केले आहे. मात्र शहरातील चित्र बघता येथे कोरोना कधी आलाच नव्हता असे दिसून येत आहे. बाजारपेठेतील गर्दी नियमांना धुडकावून होत असून शहरवासी नियम पाळत नसतानाच व्यापारीही नियमांना बगल देत आपला व्यापार करीत असल्याचे दिसत आहे. एकंदर मागील वर्षी लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर तयार झालेली स्थिती आता पुन्हा दिसून येत आहे.

ठळक मुद्देनियम धुडकावून नागरिक रस्त्यावर : कडक अंमलबजावकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य शासनाने लॉकडाऊन शिथिल केले असून नागरिक तसेच व्यापारी वर्गाला मोठा दिलासा आहे. मात्र ही शिथिलता देताना नियमांची अंमलबजावणी करावी लागणार असे स्पष्ट आदेश दिले आहेत. मात्र शहरवासी व व्यापाऱ्यांना फक्त शिथिलताच लक्षात असून नियमांना धुडकावून एकच गर्दी होत आहे. अशात मात्र नियमांची अंमलबजावणी करवून घेण्याची जबाबदारी असलेल्या शासकीय यंत्रणेतील एकाही विभागाचे याकडे लक्ष नाही. परिणामी शहरवासी व व्यापाऱ्यांना रान मोकळे असून त्यांचा मनमर्जीपणा पुन्हा सुरू झाल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर आजही अंगावर काटे आणणारा आहे. या लाटेत कुणाचे काय हिरावून गेले याचा कुणीची अंदाज लावू शकत नाही. कोरोनाचा हा कहर कमी करण्यासाठी राज्यात शासनाला दुसऱ्यांदा लॉकडाऊन लावण्याची गरज पडली. आता दुसरी लाट ओसरत असून कोरोनाचा कहर कमी झालेल्या जिल्ह्यांना दिलासा देत राज्य शासनाने तेथील लॉकडाऊन शिथिल केले आहे. यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश असून जिल्ह्यात अनलॉक करण्यात आले आहे. मात्र अनलॉक करताच आता शहरवासी व व्यापारी गेलेले दिवस विसरून पुन्हा एकदा अतिरेक करताना दिसत आहेत. अनलॉक करताना शासनाने नियमांचे कठोरतेने पालन करावे लागणार असे स्पष्ट केले आहे. मात्र शहरातील चित्र बघता येथे कोरोना कधी आलाच नव्हता असे दिसून येत आहे. बाजारपेठेतील गर्दी नियमांना धुडकावून होत असून शहरवासी नियम पाळत नसतानाच व्यापारीही नियमांना बगल देत आपला व्यापार करीत असल्याचे दिसत आहे. एकंदर मागील वर्षी लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर तयार झालेली स्थिती आता पुन्हा दिसून येत आहे. असे असतानाही प्रशासनाच्या एकाही विभागाकडून यावर नजर ठेवली जात नसल्याची तेवढीच शोकांतीका आहे. शहरवासी व व्यापारी नियम तोडत असल्याने यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.  

ना मास्क - ना शारीरिक अंतराचे पालन - कोरोनाला दूर ठेवण्यासाठी नियमित मास्क लावणे व शारीरिक अंतराचे पालन करणे हेच सूत्र आहे. मात्र शहरातील आजची स्थिती बघता ना मास्क- ना शारीरिक अंतराचे पालन केले जात आहे. विशेष म्हणजे, सर्वसामान्य नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असतानाच व्यापारीही आपल्या दुकानांत या नियमांची अंमलबजावणी करवून घेताना दिसत नाही. यावर वेळीच आवर घालण्याची गरज आहे.नगर परिषदेचे पथक गायब - शहरातील बाजारपेठ तसेच प्रत्येकच भागात कोरोना विषयक नियमांची अंमलबजावणी व्हावी यासाठी नगर परिषदेने पथक तयार केले होते. हे पथक या सर्व बाबींवर नजर ठेवून होते व वेळी दंडात्मक कारवाई करीत होते. मात्र आता हे पथक गायब दिसेनासे झाले आहे. त्यांना पुन्हा एकदा एव्क्टीव्ह करण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार