शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

खरीपानंतर रब्बीकडूनही शेतकऱ्यांची निराशाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 12:50 AM

पर्यावरणातील बदलाचे परिणाम झपाट्याने शेतीवर होत आहे. निसर्गाचा समतोल ढासळल्याने पर्जन्यमानात सुद्धा दिवसेंदिवस घट होत असल्याने त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मागील वर्षी खरीप हंगामात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने खरीप हंगाम हातून गेला.

ठळक मुद्देमागील वर्षीच्या तुलनेत उत्पादनात ९० टक्के घट : धान खरेदीवर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पर्यावरणातील बदलाचे परिणाम झपाट्याने शेतीवर होत आहे. निसर्गाचा समतोल ढासळल्याने पर्जन्यमानात सुद्धा दिवसेंदिवस घट होत असल्याने त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मागील वर्षी खरीप हंगामात कमी प्रमाणात पाऊस झाल्याने खरीप हंगाम हातून गेला. त्यामुळे ही भरपाई रब्बी हंगामात भरुन काढू अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र यातही त्यांची निराशाच झाली.जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी धानाची ३० हजार हेक्टरवर लागवड केली जाते. मात्र मागील वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने व सिंचन प्रकल्पाचे पाणी रब्बी हंगामातील पिकांना देण्यास शासनाने मनाई केली होती. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी रब्बीची लागवड केली नाही.त्यामुळे रब्बी हंगामातील धानाच्या लागवड क्षेत्रात सुध्दा घट झाली. तर वातावरणातील बदलाचा सुद्धा उत्पादनावर परिणाम झाला. मागील वर्षी रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ५ जूनपर्यंत एकूण ५६ धान खरेदी केंद्रावरुन १ लाख ४६ हजार ७६२ क्विंटल धानाची खरेदी केली होती. तर यंदा केवळ १५ हजार ५०१ क्विंटल धानाची खरेदी केली आहे.मागील वर्षीच्या तुलनेत लागवड क्षेत्रात पाच हजार हेक्टरने घट झाली त्यामुळे उत्पादनात ४० हजार क्विंटलने घट ग्राह्य आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत निम्मे सुध्दा धानाचे उत्पादन झालेले नाही.धानाच्या उत्पादनात ९० टक्के घट झाली असून त्याचा फटका शेतकºयांना बसल्याने त्यांचे कंबरडे मोडले आहे.पिकांचा पॅर्टन बदलण्याची गरजजिल्ह्यातील शेतकरी अद्यापही पारंपरिक पिकांची लागवड करतात. एकाच प्रकारच्या पिकांच्या लागवडीमुळे जमिनीची पोषकता कमी होत चालली आहे. त्याचाच परिणाम उत्पादनावर होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांना बगल देत इतर कमी पाण्याच्या पिकांची लागवड करण्याची गरज असल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.चिंता कायमरब्बी हंगामातील उत्पादनानंतर हाती येणाऱ्या पैशातून जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामाची तयारी करतात. खते, बियाणे, मजुरांचा खर्च तसेच पेरणीपूर्व मशागतीच्या कामासाठी खर्च करतात. मात्र मागील वर्षी खरीपानंतर रब्बी हंगाम सुध्दा शेतकºयांच्या हातून गेल्याने खरीप हंगामात पैशाची जुळवाजुळव कुठून करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी