शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
3
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
4
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
6
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
7
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
8
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
9
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
10
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
11
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
12
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
13
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
14
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
15
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
16
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
17
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
18
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
19
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
20
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टी अनुदानापासून शेतकरी अद्यापही वंचित

By admin | Updated: December 13, 2014 01:40 IST

गतवर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक घेता आले नाही. शेतकऱ्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागला.

मुंडीकोटा : गतवर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक घेता आले नाही. शेतकऱ्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागला. त्यामुळे शासनाने अतिवृष्टीच्या नुकसानीकरिता अनुदान जाहीर केले. अशावेळी अनेक शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली, पण काहींना दीड वर्षे लोटूनही अनुदानाची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
अतिवृष्टीचा अनुदान साझा तलाठ्यामार्फत तयार करुन संबंधित शेतकऱ्यांना बँक पासबुकांच्या झेरॉक्स, तसेच शेतकऱ्याची मृत्यू झाल्यास वारसान प्रमाणपत्र आदी कागदपत्रे पूर्ण करुन शेतकऱ्यांनी तलाठ्याकडे दिले. काही शेतकऱ्यांनी आपल्या नावाचे खाते क्रमांक तलाठी यांच्याकडे देण्यात आले. अशाच प्रकारे मुंडीकोटा परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे तलाठ्यांकडे दिली. या सर्व बाबीला तब्बल दीड वर्षाचा कालावधी लोटला. परंतु अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आजपर्यंत अनुदान जमा झाले नाही. शेतकरी याबाबत तहसील कार्यालय व तलाठ्यांकडे वारंवार विचारणा करीत आहेत. पण त्यांना बरोबर उत्तरे दिली जात नसल्याने शेतकरी चांगलेच वैतागले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने जे अनुदान मंजूर केले, तेही दीड वर्षापासून दिले नाही. शेतकरी वेळोवेळी बँकेत येवून खात्यात रक्कम जमा झाली काय? असा प्रश्न बँकेतील व्यवस्थापकांना विचारत असतात. पण अनुदान शासनाकडून आलेच नाही तर बँकेत कसे जमा होणार? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. तरी ज्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली नाही अशा शेतकऱ्यांनी वरिष्ठांनी चौकशी करुन त्वरित रक्कम बँकेत जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)