शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
4
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
5
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
6
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
7
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
8
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
9
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
10
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
11
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
12
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
13
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
14
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
15
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
16
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
17
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
18
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
19
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या राखीव जागेवर शहरी विद्यार्थ्यांचे झाले अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 05:00 IST

नगर परिषद व नगरपंचायत हे शहरी क्षेत्र असताना त्या क्षेत्रातील शाळांचे मुख्याध्यापक शाळा ग्रामीण भागात असल्याचे प्रमाणपत्र देत आहेत. तसेच प्रशासनाचा कणा असलेले महसूल विभागाचे तहसीलदार, मंडळ अधिकारी हे सुद्धा त्या प्रमाणपत्रांना प्रमाणित करीत असल्याची पालकांत चर्चा आहे. त्यामुळे प्रशासनाला ग्रामीण आणि शहरी फरक कळत नाही की, सर्व हेतुपुरस्सर केले जात आहे, हा संशोधनाचा विषय आहे. या अक्षम्य चुकीमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचा अधिकार हिरावून त्यांच्यावर अन्याय होत असल्याची ओरड आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी :  नवोदय विद्यालय निवड समितीद्वारे कोरोना काळात शासकीय नियमांचे पालन करीत नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ११ ऑगस्ट रोजी घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल २८ सप्टेंबर रोजी घोषित करण्यात आला. मात्र, या निकालानंतर भलतीच बाब पुढे आली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जागेवर शहरी भागातील विद्यार्थ्यांनी अतिक्रमण केल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे. नवोदय विद्यालयासाठी इयत्ता सहावीत निवड झालेल्या तात्पुरत्या निवड यादीचे निरीक्षण केले असता शहरी क्षेत्रातील फक्त एकच विद्यार्थ्याची निवड झाली आहे. म्हणजेच एकूण ८० जागांपैकी १ म्हणजे १.२५ टक्के विद्यार्थ्याची निवड झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा या दोन नगर परिषदा आणि गोरेगाव, देवरी, सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी, सालेकसा या नगरपंचायत शहर क्षेत्रात मोडतात. या क्षेत्रात अनेक नामांकित शाळा असून तेथील काही विद्यार्थ्यांची निवड  ‘ग्रामीण विद्यार्थी’ म्हणून केली आहे. याचाच अर्थ, या विद्यार्थ्यांनी नवोदय प्रवेश परीक्षेचे प्रवेश अर्ज करताना ग्रामीण विद्यार्थी अशी दिशाभूल करणारी माहिती दिली आहे.नगर परिषद व नगरपंचायत हे शहरी क्षेत्र असताना त्या क्षेत्रातील शाळांचे मुख्याध्यापक शाळा ग्रामीण भागात असल्याचे प्रमाणपत्र देत आहेत. तसेच प्रशासनाचा कणा असलेले महसूल विभागाचे तहसीलदार, मंडळ अधिकारी हे सुद्धा त्या प्रमाणपत्रांना प्रमाणित करीत असल्याची पालकांत चर्चा आहे. त्यामुळे प्रशासनाला ग्रामीण आणि शहरी फरक कळत नाही की, सर्व हेतुपुरस्सर केले जात आहे, हा संशोधनाचा विषय आहे. या अक्षम्य चुकीमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचा अधिकार हिरावून त्यांच्यावर अन्याय होत असल्याची ओरड आहे. 

पालक जाणार न्यायालयात nयापूर्वी नवोदय प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करताना शाळेकडून माहिती  प्रमाणित करूनच  माहिती अपलोड केली जायची; परंतु यावेळी कोरोनाच्या कारणामुळे सत्र २०२१-२२ मधील इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी अर्ज करताना विद्यार्थी-पालकांना शाळेकडून माहिती प्रमाणित करण्याची गरज नव्हती. त्यामुळे पालकांनी आपल्या सोयीनुसार शाळेचे ग्रामीण-शहरी क्षेत्र निवडल्याचे निदर्शनास येते. जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असतात, त्यांनी या बाबीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पालक रामगोपाल बाहेकर, तुलसीदास रामटेके, अरविंद कटारे व इतर पालकांनी केली आहे. अन्यथा न्याय मागणीसाठी न्यायालयात धाव घ्यावी लागेल, असे काही ग्रामीण भागातील पालकांनी सांगितले.

उद्देशालाच हरताळ nमाजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी १९८६ मध्ये ग्रामीण भागातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी म्हणून नवोदय विद्यालयाची सुरुवात केली ; परंतु २०२१-२२ च्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या यादीत ग्रामीण विद्यार्थ्यांना ७५ टक्के राखीव जागा उपलब्ध होऊ शकत नाही. हे, दुर्दैवच म्हणावे लागेल. ग्रामीण व शहरी क्षेत्रातील अनेक पालकांनी निवड यादीतील विद्यार्थ्यांचे कागदपत्रे व वास्तव तपासायला सुरुवात केली आहे. यामध्ये खोटी माहिती भरणाऱ्यांना निवड प्रक्रियेतून वगळावे, अशी मागणी केली आहे.शहरी विद्यार्थ्यांची ग्रामीण क्षेत्रातून निवड nनवोदय विद्यालय समितीच्या नवोदय प्रवेश नियमानुसार एखादा विद्यार्थी इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी या तीन सत्रांपैकी एक दिवस जरी शहरी भागातील शाळेत शिकला असेल तर, त्याची शहरी विद्यार्थी म्हणून गणना होते ; परंतु या निवड यादीतील काही विद्यार्थी नगर परिषद, नगरपंचायत क्षेत्रातील शाळेत शिकून सुद्धा त्यांची निवड ग्रामीण क्षेत्रातून केल्याचा पालकांचा आरोप आहे.  

 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा