शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

संप एसटी कर्मचाऱ्यांचा, पण झळ बसतेय विद्यार्थ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 16:24 IST

एसटी कर्मचाऱ्यांनी अद्यापही संप मागे घेतला नसल्याने याची सर्वाधिक झळ ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. विद्यार्थ्यांना नियमित खासगी वाहनाने प्रवास करणे शक्य नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागातील प्रवाशांना भुर्दंड कर्मचाऱ्यांच्या भुमिकेकडे लक्ष

गोंदिया : राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलनीकरण करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांना घेऊन एसटी कर्मचाऱ्यांनी मागील दीड महिन्यांपासून संप पुकारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी अद्यापही संप मागे घेतला नसल्याने याची सर्वाधिक झळ ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. विद्यार्थ्यांना नियमित खासगी वाहनाने प्रवास करणे शक्य नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांच्या नजरा एसटी कर्मचाऱ्यांचा संप केव्हा मागे घेतला जातो, याकडे लागल्या आहेत.

मागील दीड महिन्यापासून बस सेवा बंद असल्याने विद्यार्थ्याची गैरसोय होत आहे. विशेषतः खासगी प्रवासी वाहनधारकांनी प्रवास भाड्यात वाढ केली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे.

खासगी वाहनातून जीवघेणा प्रवास

एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता चांगलाच जिव्हारी लागत आहे. शहरात खरेदी करण्यासाठी किंवा मुलांना शाळेत जाण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिक मात्र भरडला जात आहे. अनेक पॅसेंजर रेल्वेगाड्या बंद असताना एसटीच्या संपाने सर्वसामान्यांचा प्रवासच बंद केला आहे. दैनंदिन प्रवास करणाऱ्यांनी खासगी प्रवासी वाहतुकीचा आसरा घेतला असला तरी ते परवडणारे नाही.

सर्वसामान्यांना भुर्दंड

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसत असून, ग्रामीण भागातील नागरिकांना विशेषत: गंभीर आजाराने ग्रस्त व्यक्ती अथवा वृद्धांना वैद्यकीय कामानिमित्त गोरेगाव, गोंदिया या शहराकडे जाण्यासाठी साधनच उपलब्ध नाही. त्यातच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. एकीकडे कर्मचारी तर दुसरीकडे राज्य शासन दोन्ही आपल्या अटीवर अडून आहेत. याचा भुर्दंड मात्र सर्वसामान्यांना सहन करावा लागत असून, त्यांची होरपळ होत आहे.

एसटीच्या संपाचा प्रभाव हा शैक्षणिक क्षेत्रावरही पडत आहे. तेव्हा शासन किंवा एसटी कर्मचारी यांनी एक पाऊल मागेपुढे करत यावर लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे.

- विलास कावळे, सामाजिक कार्यकर्ता

दुकानाचे साहित्य खरेदी करण्यासाठी नेहमी गोंदियाला ये-जा करावी लागते; मात्र एसटी बंद असल्याने खासगी वाहनाचा किंवा दुचाकीचा आसरा घ्यावा लागतो. एकीकडे इंधनाचे दर वाढले असताना खासगी प्रवासी वाहतुकीच्या भाड्यातही वाढ झाली आहे. त्यामुळे बजेट बिघडत आहे.

- विशाल बागडे

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीST Strikeएसटी संपagitationआंदोलनEducationशिक्षणRural Developmentग्रामीण विकास