शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

संप एसटी कर्मचाऱ्यांचा, पण झळ बसतेय विद्यार्थ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 16:24 IST

एसटी कर्मचाऱ्यांनी अद्यापही संप मागे घेतला नसल्याने याची सर्वाधिक झळ ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. विद्यार्थ्यांना नियमित खासगी वाहनाने प्रवास करणे शक्य नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागातील प्रवाशांना भुर्दंड कर्मचाऱ्यांच्या भुमिकेकडे लक्ष

गोंदिया : राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलनीकरण करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांना घेऊन एसटी कर्मचाऱ्यांनी मागील दीड महिन्यांपासून संप पुकारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी अद्यापही संप मागे घेतला नसल्याने याची सर्वाधिक झळ ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. विद्यार्थ्यांना नियमित खासगी वाहनाने प्रवास करणे शक्य नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांच्या नजरा एसटी कर्मचाऱ्यांचा संप केव्हा मागे घेतला जातो, याकडे लागल्या आहेत.

मागील दीड महिन्यापासून बस सेवा बंद असल्याने विद्यार्थ्याची गैरसोय होत आहे. विशेषतः खासगी प्रवासी वाहनधारकांनी प्रवास भाड्यात वाढ केली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे.

खासगी वाहनातून जीवघेणा प्रवास

एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता चांगलाच जिव्हारी लागत आहे. शहरात खरेदी करण्यासाठी किंवा मुलांना शाळेत जाण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिक मात्र भरडला जात आहे. अनेक पॅसेंजर रेल्वेगाड्या बंद असताना एसटीच्या संपाने सर्वसामान्यांचा प्रवासच बंद केला आहे. दैनंदिन प्रवास करणाऱ्यांनी खासगी प्रवासी वाहतुकीचा आसरा घेतला असला तरी ते परवडणारे नाही.

सर्वसामान्यांना भुर्दंड

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसत असून, ग्रामीण भागातील नागरिकांना विशेषत: गंभीर आजाराने ग्रस्त व्यक्ती अथवा वृद्धांना वैद्यकीय कामानिमित्त गोरेगाव, गोंदिया या शहराकडे जाण्यासाठी साधनच उपलब्ध नाही. त्यातच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. एकीकडे कर्मचारी तर दुसरीकडे राज्य शासन दोन्ही आपल्या अटीवर अडून आहेत. याचा भुर्दंड मात्र सर्वसामान्यांना सहन करावा लागत असून, त्यांची होरपळ होत आहे.

एसटीच्या संपाचा प्रभाव हा शैक्षणिक क्षेत्रावरही पडत आहे. तेव्हा शासन किंवा एसटी कर्मचारी यांनी एक पाऊल मागेपुढे करत यावर लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे.

- विलास कावळे, सामाजिक कार्यकर्ता

दुकानाचे साहित्य खरेदी करण्यासाठी नेहमी गोंदियाला ये-जा करावी लागते; मात्र एसटी बंद असल्याने खासगी वाहनाचा किंवा दुचाकीचा आसरा घ्यावा लागतो. एकीकडे इंधनाचे दर वाढले असताना खासगी प्रवासी वाहतुकीच्या भाड्यातही वाढ झाली आहे. त्यामुळे बजेट बिघडत आहे.

- विशाल बागडे

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीST Strikeएसटी संपagitationआंदोलनEducationशिक्षणRural Developmentग्रामीण विकास