शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

संप एसटी कर्मचाऱ्यांचा, पण झळ बसतेय विद्यार्थ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 16:24 IST

एसटी कर्मचाऱ्यांनी अद्यापही संप मागे घेतला नसल्याने याची सर्वाधिक झळ ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. विद्यार्थ्यांना नियमित खासगी वाहनाने प्रवास करणे शक्य नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागातील प्रवाशांना भुर्दंड कर्मचाऱ्यांच्या भुमिकेकडे लक्ष

गोंदिया : राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलनीकरण करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांना घेऊन एसटी कर्मचाऱ्यांनी मागील दीड महिन्यांपासून संप पुकारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी अद्यापही संप मागे घेतला नसल्याने याची सर्वाधिक झळ ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. विद्यार्थ्यांना नियमित खासगी वाहनाने प्रवास करणे शक्य नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांच्या नजरा एसटी कर्मचाऱ्यांचा संप केव्हा मागे घेतला जातो, याकडे लागल्या आहेत.

मागील दीड महिन्यापासून बस सेवा बंद असल्याने विद्यार्थ्याची गैरसोय होत आहे. विशेषतः खासगी प्रवासी वाहनधारकांनी प्रवास भाड्यात वाढ केली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे.

खासगी वाहनातून जीवघेणा प्रवास

एसटी कर्मचाऱ्यांचा संप आता चांगलाच जिव्हारी लागत आहे. शहरात खरेदी करण्यासाठी किंवा मुलांना शाळेत जाण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिक मात्र भरडला जात आहे. अनेक पॅसेंजर रेल्वेगाड्या बंद असताना एसटीच्या संपाने सर्वसामान्यांचा प्रवासच बंद केला आहे. दैनंदिन प्रवास करणाऱ्यांनी खासगी प्रवासी वाहतुकीचा आसरा घेतला असला तरी ते परवडणारे नाही.

सर्वसामान्यांना भुर्दंड

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसत असून, ग्रामीण भागातील नागरिकांना विशेषत: गंभीर आजाराने ग्रस्त व्यक्ती अथवा वृद्धांना वैद्यकीय कामानिमित्त गोरेगाव, गोंदिया या शहराकडे जाण्यासाठी साधनच उपलब्ध नाही. त्यातच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. एकीकडे कर्मचारी तर दुसरीकडे राज्य शासन दोन्ही आपल्या अटीवर अडून आहेत. याचा भुर्दंड मात्र सर्वसामान्यांना सहन करावा लागत असून, त्यांची होरपळ होत आहे.

एसटीच्या संपाचा प्रभाव हा शैक्षणिक क्षेत्रावरही पडत आहे. तेव्हा शासन किंवा एसटी कर्मचारी यांनी एक पाऊल मागेपुढे करत यावर लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे.

- विलास कावळे, सामाजिक कार्यकर्ता

दुकानाचे साहित्य खरेदी करण्यासाठी नेहमी गोंदियाला ये-जा करावी लागते; मात्र एसटी बंद असल्याने खासगी वाहनाचा किंवा दुचाकीचा आसरा घ्यावा लागतो. एकीकडे इंधनाचे दर वाढले असताना खासगी प्रवासी वाहतुकीच्या भाड्यातही वाढ झाली आहे. त्यामुळे बजेट बिघडत आहे.

- विशाल बागडे

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीST Strikeएसटी संपagitationआंदोलनEducationशिक्षणRural Developmentग्रामीण विकास