शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

परराज्यातून येणाऱ्यांची सखोल चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:00 IST

पालकमंत्री देशमुख म्हणाले, पूर्वी शहरी भागात असलेला हा संसर्ग आता या व्यक्तींमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळून कोणतीही सवलत देण्यात येणार नाही. कंटेन्मेंट झोन व इतर आवश्यक ठिकाणी पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवावा.

ठळक मुद्देअनिल देशमुख : कोरोना स्थितीबाबत घेतला आढावा, आरोग्य व पोलीस विभागाला दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्यांमुळे कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे खबरदारीचा उपाय आणि कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी बाहेरील राज्य आणि जिल्ह्यातून येणाºया नागरिकांची सखोल चौकशी करा. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, यासाठी आरोग्य आणि पोलीस विभागाने विशेष काळजी घ्यावी असे निर्देश राज्याचे गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी आज (दि.३) येथे दिले.जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात बुधवारी (दि.३) जिल्ह्यात कोरोना संसर्गाने उद्भवलेल्या परिस्थिती आणि कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी अधिकाऱ्यांना निर्देश देताना ते बोलत होते. बैठकीला आ. मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे व अपर जिल्हाधिकारी राजेश खवले उपस्थित होते.पालकमंत्री देशमुख म्हणाले, पूर्वी शहरी भागात असलेला हा संसर्ग आता या व्यक्तींमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळून कोणतीही सवलत देण्यात येणार नाही. कंटेन्मेंट झोन व इतर आवश्यक ठिकाणी पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवावा. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये.अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडावे. बाहेर पडताना सुरक्षित शारीरिक अंतर ठेवावे. नाक व तोंडाला मास्क लावावा. विषाणू नमुने तपासणीसाठी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लवकरच चाचणी प्रयोगशाळा सुरू होणार असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.गर्भवती महिलांची नियमित आरोग्य तपासणीकोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून क्षयरुग्ण व उच्च रक्तदाब रुग्णांची आणि गर्भवती महिलांची नियमित तपासणी करण्यात येत असल्याची माहिती डॉ.बलकवडे यांनी या वेळी दिली. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. विनायक रुखमोडे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हिंमत मेश्राम, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, राहुल खांडेभराड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मंगेश वानखेडे यांची उपस्थिती होती.४४ हजार नागरिक परराज्य आणि जिल्ह्यातून दाखलबाहेर जिल्ह्यातून आणि परराज्यातून जिल्ह्यात आतापर्यंत ४४ हजार नागरिक दाखल झाले आहेत. जिल्ह्यात सध्या स्थितीत १९ कोरोना क्रि याशील रुग्ण आहे. २३ कंटेन्मेंट झोन असून यामध्ये शहरी भागात तीन आणि ग्रामीण भागात वीस कंटेन्मेंट झोनचा समावेश आहे. जिल्ह्यातील ४८ व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. संस्थात्मक अलगीकरणात ३२०५ तर गृह अलगीकरणात २७०७ व्यक्ती आहेत. जिल्ह्यात १२ कोविड केअर सेंटर असून त्याची खाटांची क्षमता १२८६ इतकी आहे. सद्यस्थितीत या सेंटरमध्ये ३३७ व्यक्ती उपचार घेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAnil Deshmukhअनिल देशमुख