शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

परराज्यातून येणाऱ्यांची सखोल चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 5:00 AM

पालकमंत्री देशमुख म्हणाले, पूर्वी शहरी भागात असलेला हा संसर्ग आता या व्यक्तींमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळून कोणतीही सवलत देण्यात येणार नाही. कंटेन्मेंट झोन व इतर आवश्यक ठिकाणी पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवावा.

ठळक मुद्देअनिल देशमुख : कोरोना स्थितीबाबत घेतला आढावा, आरोग्य व पोलीस विभागाला दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्यांमुळे कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे खबरदारीचा उपाय आणि कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी बाहेरील राज्य आणि जिल्ह्यातून येणाºया नागरिकांची सखोल चौकशी करा. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, यासाठी आरोग्य आणि पोलीस विभागाने विशेष काळजी घ्यावी असे निर्देश राज्याचे गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल देशमुख यांनी आज (दि.३) येथे दिले.जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात बुधवारी (दि.३) जिल्ह्यात कोरोना संसर्गाने उद्भवलेल्या परिस्थिती आणि कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी अधिकाऱ्यांना निर्देश देताना ते बोलत होते. बैठकीला आ. मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे व अपर जिल्हाधिकारी राजेश खवले उपस्थित होते.पालकमंत्री देशमुख म्हणाले, पूर्वी शहरी भागात असलेला हा संसर्ग आता या व्यक्तींमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळून कोणतीही सवलत देण्यात येणार नाही. कंटेन्मेंट झोन व इतर आवश्यक ठिकाणी पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवावा. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये.अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडावे. बाहेर पडताना सुरक्षित शारीरिक अंतर ठेवावे. नाक व तोंडाला मास्क लावावा. विषाणू नमुने तपासणीसाठी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लवकरच चाचणी प्रयोगशाळा सुरू होणार असल्याचे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.गर्भवती महिलांची नियमित आरोग्य तपासणीकोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून क्षयरुग्ण व उच्च रक्तदाब रुग्णांची आणि गर्भवती महिलांची नियमित तपासणी करण्यात येत असल्याची माहिती डॉ.बलकवडे यांनी या वेळी दिली. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. विनायक रुखमोडे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हिंमत मेश्राम, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, राहुल खांडेभराड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मंगेश वानखेडे यांची उपस्थिती होती.४४ हजार नागरिक परराज्य आणि जिल्ह्यातून दाखलबाहेर जिल्ह्यातून आणि परराज्यातून जिल्ह्यात आतापर्यंत ४४ हजार नागरिक दाखल झाले आहेत. जिल्ह्यात सध्या स्थितीत १९ कोरोना क्रि याशील रुग्ण आहे. २३ कंटेन्मेंट झोन असून यामध्ये शहरी भागात तीन आणि ग्रामीण भागात वीस कंटेन्मेंट झोनचा समावेश आहे. जिल्ह्यातील ४८ व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. संस्थात्मक अलगीकरणात ३२०५ तर गृह अलगीकरणात २७०७ व्यक्ती आहेत. जिल्ह्यात १२ कोविड केअर सेंटर असून त्याची खाटांची क्षमता १२८६ इतकी आहे. सद्यस्थितीत या सेंटरमध्ये ३३७ व्यक्ती उपचार घेत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAnil Deshmukhअनिल देशमुख