शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यासाठी संयुक्त पंचनामे ग्राह्य धरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 06:00 IST

पीक विमा कंपनीच्या धोरणानुसार ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेले शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरणार आहे. मात्र जे शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरतील त्यांना ती मिळण्यासाठी किमान तीन ते चार महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.विमा कंपन्याकडून अद्यापही नुकसानीचा संपूर्ण अहवाल पोहचला नसल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देनुकसानीचे पंचनामे करण्यास विलंब : आत्तापर्यंत ३३१५ पंचनामे, परतीच्या पावसाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचे सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी आणि महसूल विभागाला दिले. पीक विमा कंपनीने सुध्दा नुकसानीची सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले.मात्र पीक विमा कंपनीकडे अपुरी आहे.परिणामी पंचनामे करण्यास विलंब होत असल्याने कृषी आणि महसूल विभागाने संयुक्तपणे केलेले नुकसानीचे पंचनामे पीक विमा कंपनीने ग्राह्य धरणाचे निर्देश शासनाने दिले आहे.त्यामुळे पीक विमाधारक शेतकऱ्यांना अर्ज करण्यास जरी विलंब झाला असेल तरी त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळावी यासाठी जिल्ह्यातील ७० हजार ३० शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत एकूण ३९ हजार १२९ हेक्टरचा पीक विमा काढला. मात्र यंदा पीक परिस्थिती चांगली असताना आॅक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने त्यावर पाणी फेरले.परिणामी शेतकऱ्यांच्या तोंडचा घ्यास हिरावला गेला आहे. पावसामुळे १० हजार हेक्टरमधील धानपिकांचे ३३ टक्केच्यावर नुकसान झाले आहे. तसा अहवाल देखील कृषी आणि महसूल विभागाने शासनाकडे पाठविला आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्यांच्या धानपिकांचे नुकसान झाले असल्यास त्यांना ४८ तासांच्या आत विमा कंपनीकडे अर्ज अनिवार्य होते. अन्यथा ते शेतकरी मदतीस अपात्र ठरणार होते.अशी अट विमा कंपनीने लागू केली होती.मात्र जिल्ह्यातील ७० हजार पीक विमाधारक शेतकऱ्यांपैकी २६ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. तर इतर शेतकऱ्यांनी अर्ज केले नव्हते.त्यामुळे ते पीक विम्याच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. तर पीक विमा कंपनीकडे मनुष्यबळ कमी असल्याने आत्तापर्यंत केवळ ३३१५ शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. पंचनामे करण्यास विलंब होत असल्याने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई केव्हा मिळणार असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र शासनाने यावर तोडगा काढत कृषी आणि महसूल विभागाने पिकांचे नुकसानीचे केलेले पंचनामे विमा कंपन्यांनी नुकसान भरपाईसाठी ग्राह्य धरण्याच्या सूचना दिल्या आहे.त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला असून अर्ज न केलेले पीक विमाधारक शेतकरी सुध्दा नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरणार असल्याची माहिती विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.मदतीसाठी करावी लागणार प्रतीक्षापीक विमा कंपनीच्या धोरणानुसार ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेले शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरणार आहे. मात्र जे शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र ठरतील त्यांना ती मिळण्यासाठी किमान तीन ते चार महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.विमा कंपन्याकडून अद्यापही नुकसानीचा संपूर्ण अहवाल पोहचला नसल्याची माहिती आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेती