शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

कापूस परवडेना, सोयाबीनला भाव

By admin | Updated: November 6, 2014 22:59 IST

यंदाचा खरीप हंगाम धोक्याचा ठरणार असल्याचे शेतकऱ्यांचे भाकित खरे ठरत आहेत. कापसाला मिळणारा दर परवडणारा नाही, तर सोयाबीनला मिळणारा दर नाहीपेक्षा बरा असून सोयाबीनचे उत्पन्न कमी

शेतकऱ्यांची व्यथा : सोयाबीनचे उत्पन्न नसल्याने दरवाढ तोट्याचीचविजय माहुरे - घोराडयंदाचा खरीप हंगाम धोक्याचा ठरणार असल्याचे शेतकऱ्यांचे भाकित खरे ठरत आहेत. कापसाला मिळणारा दर परवडणारा नाही, तर सोयाबीनला मिळणारा दर नाहीपेक्षा बरा असून सोयाबीनचे उत्पन्न कमी असल्याने त्याचा उपायोग नसल्यागत आहे. कापूस शेतातून घरी येणे सुरू झाल्याने दर वाढीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. बाजारात कापूस ३ हजार ८०० ते ४ हजार रुपये क्विंटल प्रमाणे विकाचा लागत आहे. सीतदहीच्या उच्च प्रतिच्या कापसाला हा दर मिळत असल्याने शेवटी येणाऱ्या फरतडीचा दर काय असणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना आतापासून भेडसावत आहे. दुबार तिबार पेरणीने विलंब झाल्याने कापूस येण्यास विलंब झाला. त्यातच मर रोग व लाल्याच्या थैमानामुळे उत्पन्नात घट येणार हे निश्चित असताना खर्चापेक्षा कमी भावाने कापूस विकण्याची वेळ कापूस उत्पादकावर आली आहे. सोयाबीनला ३ हजार ५०० रुपयांच्यावर दर मिळत आहे. मात्र सोयाबीनचे उत्पन्न निघण्याचे संकेत नाही. शेतकऱ्यांनी एकरी एक क्विंटलचा उतारा मिळत आहे. सरासरी एकरी चार क्विंटलची उतारी येत आहे. यामुळे मिळणारा दर सोयाबीनकरिताही अत्यल्प ठरत आहे. उत्पन्न नसल्याने या वाढीव दराचा विशेष लाभ घेणे शेतकऱ्यांना शक्य नाही. अस्माणी व सुलतानी संकटाचा सामना कराव्या लागणाऱ्या शेतकऱ्यांना सतत तीन वर्षांपासून नापिकीचा सामना करावा लागत आहे. हे दृष्टचक्र कधी थांबणार याच प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना चांगले दिवस आले नाही तर शेती हा व्यवसाय तोट्याचाच ठरत राहणार आहे. कृषी प्रधान देशात शेतकऱ्याची व्यथा कायमच राहणार असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. नापिकी झाली असतांना महसूल विभागाची आणेवारी ५० पैशांच्यावर कशी राहते हे न उलगडणारे कोडे आहे. शासनाच्या मदतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना यातूनही काहीच मिळत नसल्याचे वास्तव आहे. पहिल्या दिवशी ३ हजार ९५० रुपयांचा दर देवळी येथील श्रीकृष्ण जीनिंग फॅक्टरीत भारतीय कापूस निगम (सीसीआय) च्या कापूस खरेदीला सुरुवात झाली. यात पहिल्या दिवशी ३ हजार ९५० रुपये क्विंटलचा दर मिळाला. खरेदीचा शुभारंभ कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप तायवाडे, मोहनलाल अग्रवाल व सीसीआयचे केंद्रप्रमुख पन्नालाल सिंग यांच्या हस्ते करण्यात आला. सर्वप्रथम शालीक येंडे व चेतन येंडे या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा नारळ-पान देवून सत्कार करून कापूस गाड्यांचे पूजन करण्यात आले. सीसीआयच्या खरेदीला सुरुवात होत असल्यामुळे तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाच्या भावाबाबत अपेक्षा उंचावल्या होत्या. ४ हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास कापसाचे भाव घुटमळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. यावेळी विनोद धिया छितरमल वर्मा, पप्पू टावरी, महेश अग्रवाल व माणक सुराणा यांची उपस्थिती होती.