शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
3
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
4
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
5
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
6
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
7
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
8
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
9
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
10
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
11
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
12
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
13
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
14
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
15
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
16
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
17
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
18
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
19
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
20
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?

कोरोनाची दुसरी लाट ओसरली, पण निष्काळजीपणा नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:38 IST

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे. रुग्ण संख्या सुध्दा नियंत्रणात आली असून मात करणाऱ्यांची संख्या वाढली ...

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला आहे. रुग्ण संख्या सुध्दा नियंत्रणात आली असून मात करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १२३ वर आली आहे. एकंदरीत जिल्ह्यात आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. मात्र, लाट ओसरली म्हणून जिल्हावासीयांनी निष्काळजीपणा न बाळगता कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. तरच आपण कोरोनाला जिल्ह्यातून पूर्णपण हद्दपार करू शकतो.

सोमवारी (दि.१४) जिल्ह्यात ६६ बाधितांनी कोरोनावर मात केली तर ३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यात गोरेगाव, आमगाव, सालेकसा या तीन तालुक्यांत प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. १ जूनपासून सातत्याने कोरोना बाधितांची संख्या कमी होत असून मात करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. एकंदरीत बाधितांपेक्षा कोरोनावर मात करणारेच दुप्पट आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १८०५९४ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १५५५७७ नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत १८५१५३ नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी १६४२२४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४१०४७ कोरोना बाधित आढळले असून यापैकी ४०२२७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत १२३ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे. तर ६९७ बाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

,,,,

२२७६ नमुन्यांची चाचणी, पॉझिटिव्ह केवळ ३

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने सोमवारी एकूण २२७६ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी १२९८ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ९७८ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ३ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट ०.१३ आहे. एकंदरीत कोरोना विषाणूने जिल्ह्यात परतीचा प्रवास सुरू केल्याचे चित्र आहे.

........

रिकव्हरी रेट ९७.८६ टक्के

कोरोना बाधितांपेक्षा जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण दुप्पट आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याने कोरोनाचा रिकव्हरी रेट सर्वाधिक आहे. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९७.८६ टक्के असून तो राज्याच्या रिकव्हरी रेटपेक्षा २ टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळेच आता जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

........