कालीसरार धरणात ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:00 IST2020-07-23T05:00:00+5:302020-07-23T05:00:43+5:30

महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर असलेला बाघ जलाशय सिरपूर धरण म्हणून ओळखले जाते. या धरणाची पाणी साठवण क्षमता ५.५० टीएमसी असून यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने धरण अद्याप रिकामेच आहे. त्यामुळे जुनाच जलसाठा असून सध्या फक्त एक टीएमसीच्या जवळपास आहे.

Cooling in Kalisarar Dam | कालीसरार धरणात ठणठणाट

कालीसरार धरणात ठणठणाट

ठळक मुद्देपावसाचा खंड : शेतकऱ्यांची वाढली चिंता

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : लाखो शेतकऱ्यांच्या लाईफ लाईन मानल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील जलाशयाने उन्हाळ्यात तळ गाठले होते. तीच स्थिती आजही कायम आहे. सिरपूर आणि पुजारीटोला धरणात केवळ राखीव जलसाठा शिल्लक आहे. तर कालीसरार धरणात ठणठणाट आहे. अशात पुढे दमदार पाऊस झाला नाही तर शेतीला एक थेंब ही पाणी मिळणार नाही. परिणामी पावसाअभावी लाखो हेक्टर शेतीतील धानपिक धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर असलेला बाघ जलाशय सिरपूर धरण म्हणून ओळखले जाते. या धरणाची पाणी साठवण क्षमता ५.५० टीएमसी असून यंदा जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने धरण अद्याप रिकामेच आहे. त्यामुळे जुनाच जलसाठा असून सध्या फक्त एक टीएमसीच्या जवळपास आहे.
सध्या स्थितीत येथे फक्त २४ टक्के पाणी असून चालू परिस्थितीत रोवणी कामासाठी शेतीला पाणी दिले जात आहे. अवघ्या दोन-चार दिवसात येथे जलसाठा २० टक्यावर येणार असून त्यानंतर या जलाशयाचे पाणी सोडणे शक्य आहे. पुजारीटोला धरणाची संग्रहण क्षमता १.५० टीएमसी असून सध्या स्थितीत या धरणात फक्त ०.४ टीएमसी पाणीसाठा उरलेला आहे. अर्थात रिजर्व २० टक्के जलसाठा राहिलेला आहे. तर कालीसरार धरणात ठणठणाट आहे.

पर्जन्यमान फारच कमी
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी १३२७ मी.मी.पाऊस पडतो. अशात आतापर्यंत सालेकसा तालुक्यासह जिल्ह्यात ४०० ते ५०० मीमी पाऊस पडणे अपेक्षित होते. परंतु आतापर्यंत पावसाने येथे १०० मीमीची सरासरी सुद्धा गाठली नाही. त्यामुळे एकीकडे शेतीची कामे रखडली आहेत. तर जलाशय ही तहानलेले आहेत. तर पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

Web Title: Cooling in Kalisarar Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.