शहरं
Join us  
Trending Stories
1
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
2
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
3
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
4
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
5
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
6
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
7
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
8
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
9
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
10
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
11
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
14
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
15
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
16
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
17
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
18
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
19
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
20
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

रक्तगट विलगीकरण भवनाचे बांधकाम थंडबस्त्यात

By admin | Updated: December 21, 2014 23:02 IST

बाई गंगाबाई महिला रूग्णालयातील ब्लॅड बँकेचे विस्तारित भवनासाठी शासनाने ३५ लाख रूपये मंजूर केले आहे. याला रक्तगट विलगीकरण भवन नाव देण्यात आले आहे. त्यासाठी तीन महिन्यांपूर्वीच

गोंदिया : बाई गंगाबाई महिला रूग्णालयातील ब्लॅड बँकेचे विस्तारित भवनासाठी शासनाने ३५ लाख रूपये मंजूर केले आहे. याला रक्तगट विलगीकरण भवन नाव देण्यात आले आहे. त्यासाठी तीन महिन्यांपूर्वीच सदर रक्कम मिळाली आहे. परंतु गंगाबाई महिला रूग्णालय व बांधकाम विभाग या दोघांच्या ढिसाळ कार्यप्रणालीमुळे बांधकाम अद्यापही थंडबस्त्यात आहे.
जवळपास तीन महिन्यांपूर्वीच बाई गंगाबाई महिला रूग्णालयाच्या ब्लड बँकेसाठी रक्तगट विलगीकरणाच्या नावावर शासनाने ३५ लाख रूपये मंजूर केले आहेत. सदर रक्कम बांधकाम विभागाच्या खात्यात जमे करण्यात आली आहे. याबाबत एक प्रस्ताव बनवून बाई गंगाबाई महिला रूग्णालयाच्या वतीने बांधकाम विभागास देण्यात आले आहे. परंतु बाई गंगाबाई महिला रूग्णालयाकडून ढिसाळपणा दाखविला जात आहे. दोन्हीकडून रक्तगट विलगीकरण भवन बांधकामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. या प्रकारांमुळे लवकर भवन बणून लोकसेवेसाठी उपलब्ध होईल, असे दिसून येत नाही.
बाई गंगाबाई महिला रूग्णालयाचा ब्लड बँक इमारतीच्या वरच्या माळ्यावर आहे. या इमारतीला लागूनच दुसऱ्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले तरच योग्य ठरेल. याचे कारण म्हणजे जिथे रक्ताचा साठा होतो, तिथेच रक्तगट विलगीकरणाची प्रक्रिया केली जाते.
ही इमारत जवळच असेल तर काम करणे सोपे होईल. कारण त्यासाठी वेगळ्या रक्त संक्रमण अधिकाऱ्याची नियुक्ती अशक्य आहे. एकच रक्त संक्रमण अधिकाऱ्याला दोन्ही काम सांभाळाले लागतील. यासाठी दोन्ही इमारती जवळ व एकदुसऱ्याशी लागून असणे गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेवून बीजीडब्ल्यू व्यवस्थापनाच्या वतीने जिथे रूग्णालयाच्या वरील माळ्यावर ब्लड बँक आहे, त्या जवळची जागा प्रस्थावित केली आहे.
या ठिकाणी आधीपासूनच सूर्याच्या किरणांद्वारे पाणी गरम करण्यासाठी मोठमोठ्या टाक्या ठेवण्यात आल्या आहेत. या टाक्या हटविण्याची प्रक्रिया आधी करणे गरजेचे आहे. या दिशेने आतापर्यंत रूग्णालय प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही.
थंडीच्या ऋतूत रूग्णालयात भरती रूग्णांसाठी गरम पाण्याची व्यवस्था असावी, या उद्देशाने सदर टाक्या तिथे स्थापित करण्यात आल्या. रूग्णालयात चौकशी करण्यात आल्यावर सांगण्यात आले की त्यांना गरम पाणी उपलब्ध होत नाही. अशी परिस्थिती दरवर्षी हिवाळ्यात असते. जेव्हा गरम पाणी उपलब्धच होत नाही तर टाक्या तेथे ठेवण्याचे काहीच औचित्य नाही. तसेच सदर टाक्या इतर दुसऱ्या ठिकाणीसुद्धा लावल्या जावू शकतात. (प्रतिनिधी)