शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जुना जीर्ण उड्डाणपूल पाडण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 05:00 IST

गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण उड्डाणपुल मुदतबाह्य झाला असून तो वाहतुकीस धोकादायक असल्याचे पत्र रेल्वे विभागाने दोन वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. सहा महिन्यात जीर्ण उड्डाणपुल पाडण्यास सांगितले.मात्र जिल्हा प्रशासनाने केवळ या पुलावरील जड वाहतूक बंद केली. पण उड्डाणपुल पाडण्यासंबंधीचे पाऊल उचलण्यास तब्बल दोन वर्षांचा कालावधी लावला.

ठळक मुद्देरेल्वेची हिरवी झेंडी : महिनाभरात होणार प्रक्रिया सुरू,निविदा प्रक्रिया काढून एजन्सीला देणार काम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण उड्डाणपुल पाडण्याचा मार्ग अखेर दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मोकळा झाला आहे. रेल्वे विभागाने याला नुकतीच मंजुरी दिली असून येत्या महिनाभरात जुना जीर्ण उड्डाणपुल पाडण्याच्या प्रक्रियेला सुरूवात केली जाणार असल्याची माहिती आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण उड्डाणपुल मुदतबाह्य झाला असून तो वाहतुकीस धोकादायक असल्याचे पत्र रेल्वे विभागाने दोन वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. सहा महिन्यात जीर्ण उड्डाणपुल पाडण्यास सांगितले.मात्र जिल्हा प्रशासनाने केवळ या पुलावरील जड वाहतूक बंद केली. पण उड्डाणपुल पाडण्यासंबंधीचे पाऊल उचलण्यास तब्बल दोन वर्षांचा कालावधी लावला.जीर्ण पूल पाडण्याकरिता मागील तीन वर्षांपासून ऑफिस टू ऑफिसची प्रक्रिया सुरू आहे. कधी पूल पाडण्याचा प्रस्तावाची फाईल रेल्वेकडे तर कधी जिल्हाधिकारी कार्यालय आणि कधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रलंबित होती. जीर्ण उड्डाणपुल पाडण्याचा प्रश्न गंभीर असताना त्यासाठी तब्बल दोन वर्षांच्या कालावधी लावला. त्यामुळे अद्यापही प्रत्यक्षात उड्डाणपुल पाडण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली नाही. विशेष म्हणजे शासनाने जीर्ण उड्डाणपुल पाडण्यासाठी ६ कोटी ५० लाख रुपयांचा व नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी ८२ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. पूल पाडण्यासाठी एका एजन्सीची निवड करायची असून निविदा प्रक्रिया बोलावून हे काम करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे.जीर्ण उड्डाणपुलाचा काही भाग हा रेल्वे ट्रॅक परिसरात येत असल्याने यात रेल्वेची मंजुरी आणि मेगा ब्लाक घ्यावा लागणार आहे. जोपर्यंत रेल्वे या प्रस्तावाला ओके करीत नाही तोपर्यंत पूल पाडण्याची प्रक्रिया पुढे जाणे शक्य नव्हते. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून तीच प्रक्रिया सुरु आहे. आता रेल्वे पूल पाडण्याच्या प्रस्तावाला अंतीम मंजुरी दिली आहे. आ.विनोद अग्रवाल यांनी शासन स्तरावर मुद्दा लावून धरला होता.नागपूर येथील एजन्सीचा प्रस्तावजीर्ण उड्डाणपुल पाडण्यासाठी नागपूर येथील एका अनुभवी एजन्सींची निवड करण्यात आली असून त्या एजन्सीचा प्रस्ताव देखील आला असल्याची माहिती आहे. पुलाचा काही भाग हा रेल्वे ट्रॅक परिसरात असल्याने तो पाडताना सर्वच तांत्रिक गोष्टींचा विचार करावा लागणार आहे.त्यामुळे यास विलंब होत असल्याची माहिती आहे.जीर्ण उड्डाणपूल पाडण्यासाठी रेल्वे विभागाची आता अंतीम मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे इतर प्रक्रिया पूर्ण करुन उड्डाणपुल पाडण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.- मिथीलेश चव्हाण, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग.लोकमतने केला होता पाठपुरावाशहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या जीर्ण उड्डाणपुलाचा मुद्दा सर्वप्रथम लोकमतने २४ जुलै २०१८ रोजी लावून धरला होता. त्यानंतर याचा सातत्याने पाठपुरावा केला. याचीच दखल प्रशासनाने हा जड वाहतुकीस पूर्णपणे बंद केला. त्यानंतर पूल पाडण्याचा प्रश्नाकडे सुध्दा लक्ष वेधले होते. त्याची दखल हा प्रश्न मार्गी लावला आहे.

टॅग्स :railwayरेल्वे