शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

शहरात भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: April 30, 2017 00:53 IST

भरनियमन होत नसून नदीत मुबलक प्रमाणात पाणी आहे. असे असतानाही मात्र तिरोडावासी ेतहानलेलेच आहेत.

सहकारनगरवासी तहानलेले : महिन्याभरापासून नळाला पाण्याचा थेंब नाहीतिरोडा : भरनियमन होत नसून नदीत मुबलक प्रमाणात पाणी आहे. असे असतानाही मात्र तिरोडावासी ेतहानलेलेच आहेत. ३३ वर्षे जुनी पाईपलाईन असल्याने पाण्याचा दाब वाढल्यास पाईपलाईन फुटते व ती पुन्हा आपल्यालाच दुरुस्त करावी लागते. या भितीपोटी दाब न वाढविता पाणी देणे सुरू असल्याने शहराच्या कित्येक भागात पाण्याचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नाही. सहकार नगर सारख्या काही भागात तर नळाला मागील महिन्याभरापासून पाण्याचा थेंबही आलेला नाही. शहरात कोठेही सार्वजनिक नळ नाही. जेवढे पाणी देण्यात येते त्या पाण्याचे पैसे ग्राहक देतात. आता भारनियमन होत नाही, नदीला पाणीही भरपूर आहे. तरिही महराष्ट्र जीवन प्राधीकरण कडून अतिरीक्त काही तास पाणी का सोडले जात नाही हा संशोधनाच विषय आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता विजेचे बिल जास्त येते असे सांगण्यात येत आहे. त्यामानाने पाण्याच्या बिलातून पैसे वसूल होत नसल्याचे सांगण्यात येते. एकही सार्वजनिक नळ नसताना सर्व पाणी मिटरधारकांकडे ग्राहकांकडे जाते व रिडिंगनुसार बिल येते.दुसरीकडे सहकार नगरात दोन-तीन महिने पाण्याचा थेंबही न घेता मिनिमम चार्जच्या नावावर १५०-१६० रुपये दरमहा घेतले जाते. पाण्याचा थेंब नसताना बिलाचे पैसे का म्हणून भरावेत व याबाबत प्राधिकरणाने सखोल चौकशी करून ज्यांच्याकडे २-३ महिने पाणी देवू शकत नाही त्यांना पाण्याचे बिल पाठवू नये असेही नागरिक बोलत आहेत. अनेक तक्रारी करुन सुद्धा प्रशासन गाढ झोपेत आहे. अधिकारी आपल्या कार्यालयात कुलरच्या हवेत गारवा घेतात. जनप्रतिनिधी मस्त लग्नात खुश असून नवीन पाईपलाईन व नळ योजना येत असल्याचे नागरिकांना गाजर देत आहेत. सहकार नगरातील बाया, मुली, मुले कमीतकमी पिण्याचे पाणी मिळावे यासाठी शहीद मिश्रा वॉर्डातील काही ओळखीच्या ठिकाणी जावून पाणी आणतात. अशावेळेस तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावरील मुख्य चौक ओलांडावा लागतो. येथे वाहने भरधाव वेगाने धावत असतात. पाण्यासाठी जात असताना अपघात झाल्यास संतापाची लाट उसळेल. त्यावेळेस जनआंदोलनास प्रशासनाला सांभाळणे कठिण होईल ऐवढे मात्र खरे. सहकार नगर, संत कबीर वॉर्ड तसेच इतरही ठिकाणावरुन काही महिलांनी ‘घागर मोर्चा’ काढण्यासाठी कंबर कसली असून लवकरच याबाबत प्रशासनाला माहितीवजा कागदपत्रे व सुचना देण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. मागील काही दिवसापासून साई कॉलनी परिसरात दुषित व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याची तक्रार शहरवासीयांनी बोलून दाखविली. (तालुका प्रतिनिधी)जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीची गरजपाण्यासाठी हाहाकार माजलेला असताना टुल्लू पंप लावून पाणी खेचण्याचे प्रकार शहरात घडतात. अशात मात्र अन्य नागरिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे पाणी पुरवठा होत असताना त्या वेळेत भारनियमन करण्याची गरज आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीला आदेश देवून विशिष्ट काळासाठी भारनियमन करुन सर्वांना पिण्याचे पाणी मिळवून देतील एवढीच जनतेची अपेक्षा आहे.