शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

एसएमएसद्वारे नागरिकांना मिळणार प्रकरणांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:57 PM

साहेब काम झाले का, आमचे प्रकरण मार्गी लागले का, यासाठी नागरिकांना बरेचदा वांरवार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. यामुळे त्यांचा वेळ वाया जातो शिवाय मानसिक त्रास सहन करावा लागतो. नागरिकांची पायपीट कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अपील प्रकरणाची माहिती आता संबंधिताना एसएमएसव्दारे मोबाईलवर दिली जाणार आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । पायपीट होणार कमी, जिल्हाधिकारी कार्यालयाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : साहेब काम झाले का, आमचे प्रकरण मार्गी लागले का, यासाठी नागरिकांना बरेचदा वांरवार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. यामुळे त्यांचा वेळ वाया जातो शिवाय मानसिक त्रास सहन करावा लागतो. नागरिकांची पायपीट कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अपील प्रकरणाची माहिती आता संबंधिताना एसएमएसव्दारे मोबाईलवर दिली जाणार आहे. त्यामुळे श्रम, वेळ आणि पैशाची बचत होण्यास मदत होणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु असलेल्या विविध अपील प्रकरणात वारंवार येणाºया नागरिकांच्या सुविधेसाठी तसेच प्रशासकीय कामात पारदर्शीता आणण्यासाठी व नागरिकांच्या पैसा आणि वेळेची बचत करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अपील प्रकरणात संबंधितांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे सुनावणीची दिनांक व वेळ याबाबतची पूर्व सूचना देण्यासाठी प्रायोगिक तत्वावर ही सुविधा सुरु केली. अनेकदा प्रशासकीय कामकाजाच्या व्यस्ततेमुळे किंवा महत्त्वाच्या कामांमुळे अपील प्रकरणाची सुनावणी होत नाही. त्यामुळे सुनावणीसाठी दूरवरुन येणाºया नागरिकांचा वेळ, प्रवास व पैशाचा अपव्यय होतो.तसेच काही कारणास्तव सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यास त्याची सूचना आणि दिनांक व वेळेची माहिती मोबाईलवर एसएमएसद्वारे संबंधितांना देण्यात येईल. त्यामुळे नागरिक ठरविलेल्या तारखेस वेळेत उपस्थित राहतील.अपिल प्रकरणात असलेल्या सर्व संबंधितांना या सुविधेमुळे लाभ होणार आहे. नागरिकांची होणारी पायपीट कमी होवून त्यांच्या वेळ आणि पैशाची बचत व्हावी या दृष्टीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.- डॉ.कादंबरी बलकवडे,जिल्हाधिकारी गोंदिया.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी