शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 6:00 AM

तालुक्यातील एक हजार लोकवस्ती असलेल्या चिचगाव या गावाने चारही बाजूने ये-जा होणाऱ्या रस्त्यावर लाकडे आणि काटेरी फाद्यांनी रस्ता अडवित परिसरातील व लगतच्या गावांना गावबंदी केली आहे. सध्या सर्वत्र जिकडे तिकडे कोरोना आजाराची भीती आहेच. या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देदोन गावांनी घेतला निर्णय : रस्त्यावर लाकडे टाकून बंद केला मार्ग, प्रतिबंधात्मक उपाय योजना, दंडाची केली तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागात सुध्दा या आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गावकरी सुध्दा खबरदारी घेत आहे. याच पार्श्वभुमीवर तालुक्यातील चिचगाव आणि सटवा या दोन गावानी बुधवारी (दि.२५) गावबंदीचा निर्णय घेतला. १४ एप्रिलपर्यंत बाहेरील लोकांना या गावात येण्यास बंदी घालण्यात आली. तसेच बाहेरील कोणतेही वाहन गावात येऊ नये यासाठी रस्त्यावर लाकडे टाकून ठेवले आहे.तालुक्यातील एक हजार लोकवस्ती असलेल्या चिचगाव या गावाने चारही बाजूने ये-जा होणाऱ्या रस्त्यावर लाकडे आणि काटेरी फाद्यांनी रस्ता अडवित परिसरातील व लगतच्या गावांना गावबंदी केली आहे. सध्या सर्वत्र जिकडे तिकडे कोरोना आजाराची भीती आहेच.या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादिशेने चिचगाव येथील माजी सरपंच जितेंद्र कटरे यांनी गावातील युवकांना हाताशी घेउन कोरोनापासून गावकऱ्यांना कसे दूर ठेवता येईल याविषयी चर्चा केली. परिसरातील नागरिकांना गावबंदीकरून कोरोनावर अंकुश लावता येईल असा निर्णय घेण्यात आला. चिचगाव ते सिलेगाव, पूरगाव, सटवा, बघोली हे मुख्य रस्ते बंद करण्यात आले. चिचगाव या लहानशा गावातील गावबंदी सध्या तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.विशेष म्हणजे चिचगाव येथे कुणी बाहेरून न विचारता आला तर दीड हजार रुपये दंड ठोकण्याचा नियम तयार करण्यात आला आहे. तर गावातील कोणत्याही व्यक्तीला बाहेर निघताना गावकऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.या सामाजिक कार्यात चिचगाव येथील माजी सरपंच जितेंद्र कटरे, सुनील रहांगडाले, मोरेश्वर राणे, बालू खोब्रागडे, संतोष सोनवाने, कमलेश पारधी, संजय पंधरे, राजू पंधरे, विरेंद्र रहांगडाले, बालू बिसेन, दिपक बिसेन, राजेंद्र रहांगडाले, जितेंद्र पारधी, पिंटू उईके, तेजराम राणे, भय्यालाल मानकर, देवेंद्र भिमटे यांनी सहकार्य केले.दीड हजार रुपयांचा दंडचिचगाव येथील गावकऱ्यांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गावबंदी केली आहे. तसेच याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावी यासाठी गावात परवानगी न घेता येणाऱ्यास दीड हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या निर्णयाला गावकऱ्यांनी सुध्दा सहकार्य केले आहे.इतर गावांनी सुध्दा करावी अंमलबजावणीकोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेळीच दक्षता घेतली नाही तर मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते,असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित करताना सांगितले. तसेच १४ एप्रिलपर्यंत कुणीही घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन केले. याच पार्श्वभुमीवर काही गावकऱ्यांनी उपाय योजना केली आहे. चिचगाव व सटवा येथील गावकऱ्यांनी गावबंदीचा निर्णय घेतला आहे. असाच निर्णय इतर गावांनी घेऊन याची अंमलबजावणी करावी असा सूर आवळला जात आहे.सटवा गावातही गावबंदीकोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या जमावबंदीला साथ देत सटवा येथील गावकऱ्यांनी गावबंदीचा आदेश काढून गावाच्या सीमा बंद केल्या आहेत. सटवा गावात गावबंदी करण्यात आली आहे. या गाावतील नागरिकांनी गावाच्या सीमेवरील रस्त्यावर झाडे कापून आडवी टाकली आहेत.गावात कुणी बाहेरून न विचारता आला तर अडीच हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावातील कोणत्याही व्यक्तीला बाहेर निघताना गावकऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसgram panchayatग्राम पंचायत