शहरं
Join us  
Trending Stories
1
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
2
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
3
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
4
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
5
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
6
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
7
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
8
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
9
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
10
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
11
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
14
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
15
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
16
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
17
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
18
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
19
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
20
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

‘बीआरजीएफ’ची १२ कोटींची कामे वाऱ्यावर

By admin | Updated: December 22, 2014 22:48 IST

मागास क्षेत्राला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाकडून बीआरजीएफ (मागास क्षेत्र अनुदान निधी) योजनेअंतर्गत विशेष निधी दिला जातो. मात्र चालू आर्थिक वर्षात गोंदिया

४७७ कामे पडली ठप्प : केवळ प्रशासकीय मंजुरी, निधीच्या नावाने बोंबाबोंब
मनोज ताजने/सुजित येवले - गोंदिया
मागास क्षेत्राला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाकडून बीआरजीएफ (मागास क्षेत्र अनुदान निधी) योजनेअंतर्गत विशेष निधी दिला जातो. मात्र चालू आर्थिक वर्षात गोंदिया जिल्ह्याला या योजनेची एक कवडीही मिळालेली नाही. या वर्षाकरिता तब्बल १२ कोटी २१ लाख ३८ हजार रुपयांची कामे मंजूर करून ठेवली असली तरी अद्याप एकाही कामाला सुरूवात झालेली नसल्याची धक्कादायक माहिती आहे.
गोंदिया हा राज्याच्या पूर्व टोकावरील शेवटचा आणि नक्षलग्रस्त, आदीवासीबहुल जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्याची निवड ‘बीआरजीएफ’ योजनेसाठी झाली आहे. या जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणारे ना.प्रफुल्ल पटेल केंद्रीय मंत्री असताना त्यांनी कोट्यवधी रुपये या जिल्ह्यासाठी खेचून आणले होते. मात्र यावर्षी परिस्थिती अगदी विपरित आहे.
या योजनेअंतर्गत सन २०१४-१५ या आर्थिक वर्षाकरिता जिल्ह्याच्या आठही तालुक्यांसाठी तब्बल १२ कोटी २१ लाख ३८ हजार रुपयांची ४७७ कामे प्रस्तावित केली होती. ११ आॅक्टोबर २०१४ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्या प्रस्तावांना मंजुरीही देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात निधीचा पत्ताच नाही. यावर्षीचा निधी तर नाहीच, पण सन २०१३-१४ या आर्थिक वर्षातील कामांसाठी मंजूर असलेल्या निधीपैकीही दुसऱ्या टप्प्याचा २ कोटींचा निधीही अजून मिळालेला नाही.
या योजनेत शाळा खोली, कोंडवाडा, स्मशानघाट, कृषी गोदाम, नाल्या, रस्ते, आवारभिंत, अंगणवाडी आवार भिंत, समाज भवन, समाजमंदिर, सभामंडप, सार्वजनिक मुत्रीघर, विंधन विहीरी, दुकान गाळे, बाजार ओटे आदी कामे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र आर्थिक वर्ष संपण्यासाठी आता अवघे ३ महिने उरले असताना अद्याप एक दमडीही कशी मिळाली नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावरून मागास क्षेत्राच्या विकासकामांबाबत शासन किती गंभीर आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे.