शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने अपेक्षाभंग केला

By admin | Updated: October 6, 2015 02:20 IST

केंद्र व राज्यातील भाजप सरकार हे स्वप्न दाखविणारे सरकार आहे. या सरकारने जनतेला खोटी

अर्जुनी-मोरगाव/सडक अर्जुनी : केंद्र व राज्यातील भाजप सरकार हे स्वप्न दाखविणारे सरकार आहे. या सरकारने जनतेला खोटी आश्वासने देऊन त्यांचा अपेक्षाभंग केला आहे. आमचे सरकार सत्तेवर असताना सर्वसामान्यांसाठी आपण शासनाशी भांडलो, आता तर विरोधात असतानाही जनता जनार्दनावर होणारा अन्याय खपवून घेणार नाही, असा इशारा लोकसेवा समितीचे अध्यक्ष आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दिला. अर्जुनी मोरगाव येथील पंचायत समिती पटांगणावर आयोजित नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. तत्पुर्वी दुर्गा चौक येथून प्रचार रॅली काढण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सावनेरचे आमदार सुनील केदार, माजी आमदार रामरतन राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, सदस्य गिरीश पालीवाल, अमर वऱ्हाडे, राधेलाल पटले, अर्जुन नागपुरे, पंचायत समिती उपसभापती आशा झिलपे, नितीन पुगलिया, राजेश नंदागवळी, किरण कांबळे, विशाखा साखरे, सुरेखा नाईक, रत्नदीप दहीवले, नानाजी मेश्राम, करुणा नांदगावे, डॉ. वल्लभदास भुतडा, विजय लाडे, एस.एम. नरुले उपस्थित होते. पुढे बोलताना आ. अग्रवाल यांनी, भाजपच्या ‘अच्छे दिन’ची खिल्ली उडवत नगर पंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसला कौल द्या, अर्जुनी मोरगाव शहराला नंबर एकचे शहर बनवू व एक आदर्श नगरपंचायत म्हणून पुढे आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. संचालन माजी जि.प. अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे यांनी केले. प्रास्ताविक मांडून आभार भागवत नाकाडे यांनी मानले. नगर पंचायत काँग्रेसच्या हातात द्याकेंद्राचा आणि राज्याचा विकास फक्त काँग्रेस पक्षच करु शकते. दुसऱ्या पक्षात फक्त आशवासेनच मिळतात, अशी टिका आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केली. येथील दुर्गा चौकात रविवारी (दि.४) नगर पंचायत निवडणुकीला घेऊन आयोजित कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे होते. तर प्रमुख मार्गदर्शक आमदार सुनिल केदार, माजी आमदार रामरतन राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, आरोग्य व शिक्षण सभापती पी.जी. कटरे, झामसिंग बघेले, जगदीश येरोला, रमेश अंबुले, रजा पटेल, नामदेव किरसान, अर्जुन नागपूरे, शेषराव गिऱ्हेपुंजे, रामलाल राऊत, राजेश नंदागवळी, जिल्हा परिषद सदस्य सरिता कापगते, राजू पटले, अनिल राजगिरे, जाकीर पटेल मंचावर उपस्थित होते.याप्रसंगी गिऱ्हेपुंजे यांनी, आतापर्यंत सरपंच व उपसरपंचांनी पाटीवर आपले नाव यावे यासाठीच राजकारण केले. यात गावाचा विकास झाला नाही. पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्त्याचे अतिक्रमण, नाल्या अशा अनेक समस्या सोडविण्यासाठी आपण नगर पंचायतमध्ये काँग्रेसला मतदान करुन पाठवा, आम्ही विकास करु, असे आवाहन केले. आमदार केदार यांनी, भाजपाच्या अच्छे दिन वर चांगलीच फिरकी घेतली. प्रास्ताविक राजू पटले यांनी मांडले. संचालन राजगिरे यांनी केले तर आभार शहीद पटेल यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)१८० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश४नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे १८० कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. यात नवीन नशिने, किशोर शहारे, सोमेश्वर सौंदरकर, प्रवीण शहारे, सुनील लंजे, रामदास सूर्यवंशी, पारेश्वर ठोंबरे, नंदिनी धकाते, पंचशीला मेश्राम, वंदना शहारे, यमू ब्राह्मणकर, अनोज शहारे, दिवाकर शहारे यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.