शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

विद्यार्थ्यांना मारहाण ; यामध्ये चुकतो कोण, विद्यार्थी, शिक्षक की पालक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 05:00 IST

गृहपाठ केला नाही, पाठांतर झाले नाही तर शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांवर ओरडतात व शिक्षा करतात; मात्र मारायचे बंद केले आहे. पालकही शिक्षकांना भेटून पाल्याला न मारण्याचे सांगतात.  मुलांना ओरडू नका, काय असेल तर आम्हाला सांगा आम्ही अभ्यास करून घेतो, अशी विनवणी पालकांकडून होत असल्याने  शिक्षकांनीही मुलांना मारणे बंद केले. विशेष म्हणजे, पूर्वी शिक्षकांनी मुलांना मारले तर पालक काहीच म्हणत नव्हते.

नरेश रहिलेलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अभ्यासात विद्यार्थी मागे असेल तर त्याच्याकडून अभ्यास करून घेण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा करतात. अनेकदा त्यांना  ओरडून परिस्थितीनुरूप शिक्षा केली जाते; परंतु आरटीई कायद्यांतर्गत मानसिक, शारीरिक छळ या कायद्याखाली शिक्षकांना शिक्षा होऊ शकते. यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार देणे बंद केले आहे. सध्या शिक्षक व विद्यार्थी यांच्यात मित्रत्वाचे नाते निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना आता शिक्षकांची भीती राहिली नाही. गृहपाठ केला नाही, पाठांतर झाले नाही तर शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांवर ओरडतात व शिक्षा करतात; मात्र मारायचे बंद केले आहे. पालकही शिक्षकांना भेटून पाल्याला न मारण्याचे सांगतात.  मुलांना ओरडू नका, काय असेल तर आम्हाला सांगा आम्ही अभ्यास करून घेतो, अशी विनवणी पालकांकडून होत असल्याने  शिक्षकांनीही मुलांना मारणे बंद केले. विशेष म्हणजे, पूर्वी शिक्षकांनी मुलांना मारले तर पालक काहीच म्हणत नव्हते. मात्र आता पालकच मारण्यासाठी विरोध करतात. 

आधी तक्रारी का होत नसत? -    आरटीई कायद्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक, शारीरिक छळ किंवा क्रूर वागणूक दिल्यास शिक्षकांवर गुन्हा दाखल होऊ शकतो, यामुळे तक्रारीची भीती शिक्षकांना आहे. -    त्यामुळेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार देणे बंद केले आहे; मात्र यापूर्वीच्या पिढीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांबद्दल आदरयुक्त भीती असायची. चुकीसाठी शिक्षेचा पर्याय अवलंबला जात होता.

एकाच मुलाला मारहाण पण प्रकरण शिक्षण विभागाकडेच

१शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्यास त्यांच्यावर आरटीईअंतर्गत कारवाई होऊ शकते. कारवाई टाळण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारणे बंद केले आहे. विद्यार्थी मारहाणप्रकरणी गोंदिया जिल्ह्यात तक्रार नाही. 

२मागील दीड वर्षात जिल्ह्यात एकाच विद्यार्थ्याला मारहाण झाली. त्या प्रकरणाची तक्रार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक  शिक्षण विभागाकडे करण्यात आली. पोलिसात एकही तक्रार गेली नाही.

पालक काय म्हणतात? 

मी माझ्या मुलांना शाळेत पाठविले. त्यांच्यात चांगले गुण यावेत, चांगला अंतर्भाव यावा परंतु गुरुजींनी त्याला मारहाण करू नये हे आम्हाला अपेक्षित आहे. आतापर्यंत मारहाण झाल्याच्या घटना समोर आल्या नाहीत.- रमेश तरोणे, पालक

मुले लेखन, वाचनात मागे पडली आहेत. त्यासाठी शिक्षक मुलांना शिक्षा करतात, हे चुकीचे नाही. आरटीई कायदा असला तरी मुलांच्या प्रगतीसाठी शिक्षक ओरडतात. शिक्षकांनी जरूर रागवावे मारहाण करू नये. - संजय कटरे, पालक

शिक्षक काय म्हणतात?

आरटीई अंतर्गत कारवाईची भीती शिक्षकांना असल्यामुळे मारहाण केलीच जात नाही. मित्रत्वाचे नाते काळानुरुप शिक्षेचे स्वरूपही बदलू लागले आहे. विद्यार्थ्यांना ओरडण्याऐवजी त्यांच्यासोबत मित्रत्वातून संवाद साधून अभ्यास करून घेण्यात येत आहे. - प्रकाश ब्राह्मणकर, शिक्षक

आपल्या मुलांना ओरडू नका, अशी विनवणी पालक करतात. मुलांना मारण्याऐवजी त्याची चूक आम्हाला सांगा, त्याला आम्ही दुरुस्त करतो.  शिक्षकांच्या डोळ्यांचा अचूक अंदाज विद्यार्थी घेतात आणि त्यामुळे त्यांना मारण्याची गरजच पडत नाही. -एस. यू. वंजारी, शिक्षक

 

टॅग्स :Teacherशिक्षकStudentविद्यार्थी