शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

५०० शेतकऱ्यांचे आमदाराच्या घरासमोरच ठिय्या आंदोलन; भर उन्हात रस्ता रोखून धरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 10:54 IST

मार्केटिंग अधिकाऱ्यांवर रोष

गोंदिया : तालुक्यातील चुटीया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेने खरीप व रब्बी हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या २८ हजार क्विंटल धानाची अफरातफर करून परस्पर विल्हेवाट लावली. यामुळे या शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणारे ५०० शेतकरी अडचणीत आले आहेत. या शेतकऱ्यांचे ५ कोटी ७२ लक्ष रुपयांचे चुकारे न मिळाल्याने अखेर संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.२८) रोजी अपक्ष आ. विनोद अग्रवाल यांच्या घरासमोर भरउन्हात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. संतप्त शेतकऱ्यांनी जोपर्यंत पैसे मिळणार नाही तोपर्यंत इथून उठणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

गोंदिया तालुक्यातील चुटीया व परिसरातील शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे मागील तीन महिन्यांपासून थकले आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तीन महिन्यांपासून वारंवार जिल्हा पणन कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात येत आहे. तर, शेतकरी चुकाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडे चकरा मारीत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

अडीच महिन्यांपासून चुटीया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेवर धान विक्री करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे ५ कोटी ७२ लाख रुपये पणन कार्यालयाने रोखून ठेवले आहेत. शेतकऱ्यांनी वारंवार पणन अधिकारी, जिल्हाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधींना विनंती करून धानाची रक्कम देण्याची मागणी केली. परंतु, आश्वासनांच्या पलीकडे काहीच मिळत नसल्याने चुटीया येथील ५०० शेतकऱ्यांनी आ. विनोद अग्रवाल यांच्या घरासमोर सोमवारी ठिय्या आंदोलन सुरू केले. पैसे मिळणार नाही तोवर आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अशी शेतकऱ्यांची भूमिका होती.

संचालकांना अटक का नाही?

फेडरेशनने श्रीराम अभिनव सहकारी संस्थेच्या ११ संचालकांसह ४ कर्मचारी अशा एकूण १५ जणांवर फसवणुकीचा गुन्हा गोंदिया शहर पोलिस ठाण्यात दाखल केला आहे. फेडरेशनने कायदेशीर कारवाई केली असली तरी या संस्थेच्या केंद्रावर धानाची विक्री करणारे ५०० शेतकरी अडचणीत आले आहेत. गुन्हा दाखल तर झाला मात्र त्या संचालकांना अटक का करण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

जप्तीच्या कारवाईचे काय झाले?

श्रीराम अभिनव सहकारी संस्थेच्या संचालकांनी २८ हजार क्विंटल धानाची अफरातफर करून ५ कोटी ७६ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. धानाची अफरातफर केलेल्या रकमेची वसुली करण्यासाठी येत्या दोन-तीन दिवसांत संपत्ती जप्तीची कारवाई सुरू केली जाणार आहे, असे जिल्हा मार्केटिंगचे विवेक इंगळे यांनी शेतकऱ्यांना सांगितले होते. पण, त्यांनी कुठलीच कारवाई केली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.

फेडरेशन सोडून माझ्या कार्यालयासमोर आंदोलन का?

माझ्या विधानसभा क्षेत्रातील शेतकरी अडचणीत राहू नये यासाठी मी मार्केटिंग अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, आरोपींना पकडण्याचे काम पोलिसांचे आहे. त्यांनी आरोपींना शोधावे. मी जनतेचा आमदार आहे. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी तत्पर आहे. तुमचे माझ्यावर पैसे नाहीत असतील तर ते मी आताच परत करतो. तुमचे पैसे सरकारवर आहेत, त्यासाठी मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करा मी स्वत: तुमच्यासोबत आहे.

- विनोद अग्रवाल, आमदार

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनMLAआमदारgondiya-acगोंदिया