शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

५०० शेतकऱ्यांचे आमदाराच्या घरासमोरच ठिय्या आंदोलन; भर उन्हात रस्ता रोखून धरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 10:54 IST

मार्केटिंग अधिकाऱ्यांवर रोष

गोंदिया : तालुक्यातील चुटीया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेने खरीप व रब्बी हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या २८ हजार क्विंटल धानाची अफरातफर करून परस्पर विल्हेवाट लावली. यामुळे या शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणारे ५०० शेतकरी अडचणीत आले आहेत. या शेतकऱ्यांचे ५ कोटी ७२ लक्ष रुपयांचे चुकारे न मिळाल्याने अखेर संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी (दि.२८) रोजी अपक्ष आ. विनोद अग्रवाल यांच्या घरासमोर भरउन्हात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. संतप्त शेतकऱ्यांनी जोपर्यंत पैसे मिळणार नाही तोपर्यंत इथून उठणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

गोंदिया तालुक्यातील चुटीया व परिसरातील शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे मागील तीन महिन्यांपासून थकले आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तीन महिन्यांपासून वारंवार जिल्हा पणन कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात येत आहे. तर, शेतकरी चुकाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडे चकरा मारीत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

अडीच महिन्यांपासून चुटीया येथील श्रीराम अभिनव सहकारी संस्थेवर धान विक्री करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचे ५ कोटी ७२ लाख रुपये पणन कार्यालयाने रोखून ठेवले आहेत. शेतकऱ्यांनी वारंवार पणन अधिकारी, जिल्हाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधींना विनंती करून धानाची रक्कम देण्याची मागणी केली. परंतु, आश्वासनांच्या पलीकडे काहीच मिळत नसल्याने चुटीया येथील ५०० शेतकऱ्यांनी आ. विनोद अग्रवाल यांच्या घरासमोर सोमवारी ठिय्या आंदोलन सुरू केले. पैसे मिळणार नाही तोवर आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, अशी शेतकऱ्यांची भूमिका होती.

संचालकांना अटक का नाही?

फेडरेशनने श्रीराम अभिनव सहकारी संस्थेच्या ११ संचालकांसह ४ कर्मचारी अशा एकूण १५ जणांवर फसवणुकीचा गुन्हा गोंदिया शहर पोलिस ठाण्यात दाखल केला आहे. फेडरेशनने कायदेशीर कारवाई केली असली तरी या संस्थेच्या केंद्रावर धानाची विक्री करणारे ५०० शेतकरी अडचणीत आले आहेत. गुन्हा दाखल तर झाला मात्र त्या संचालकांना अटक का करण्यात आली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

जप्तीच्या कारवाईचे काय झाले?

श्रीराम अभिनव सहकारी संस्थेच्या संचालकांनी २८ हजार क्विंटल धानाची अफरातफर करून ५ कोटी ७६ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. धानाची अफरातफर केलेल्या रकमेची वसुली करण्यासाठी येत्या दोन-तीन दिवसांत संपत्ती जप्तीची कारवाई सुरू केली जाणार आहे, असे जिल्हा मार्केटिंगचे विवेक इंगळे यांनी शेतकऱ्यांना सांगितले होते. पण, त्यांनी कुठलीच कारवाई केली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.

फेडरेशन सोडून माझ्या कार्यालयासमोर आंदोलन का?

माझ्या विधानसभा क्षेत्रातील शेतकरी अडचणीत राहू नये यासाठी मी मार्केटिंग अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, आरोपींना पकडण्याचे काम पोलिसांचे आहे. त्यांनी आरोपींना शोधावे. मी जनतेचा आमदार आहे. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी तत्पर आहे. तुमचे माझ्यावर पैसे नाहीत असतील तर ते मी आताच परत करतो. तुमचे पैसे सरकारवर आहेत, त्यासाठी मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करा मी स्वत: तुमच्यासोबत आहे.

- विनोद अग्रवाल, आमदार

टॅग्स :FarmerशेतकरीagitationआंदोलनMLAआमदारgondiya-acगोंदिया