शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

जिल्ह्यातील ४२८ हातपंप सौर उर्जेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 23:34 IST

प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे शासन अनेक योजना अंमलात आणत आहे. ग्रामीण भागातील जनताही शुद्ध पाण्यापासून वंचीत राहू नये यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंमलात आणले. ५० टक्के राज्य व ५० टक्के केंद्र शासन निधी देऊन उभारण्यात येणाऱ्या या योजनांतून हातपंप सौर उर्जेवर चालविले जात आहेत.

ठळक मुद्देराष्ट्रीय ग्रामीण पेयजल : मुदत संपलेल्यांच्या दुरुस्तीसाठी करावी उपाययोजना

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे शासन अनेक योजना अंमलात आणत आहे. ग्रामीण भागातील जनताही शुद्ध पाण्यापासून वंचीत राहू नये यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंमलात आणले. ५० टक्के राज्य व ५० टक्के केंद्र शासन निधी देऊन उभारण्यात येणाऱ्या या योजनांतून हातपंप सौर उर्जेवर चालविले जात आहेत. गोंदिया जिल्ह्यातील ४२८ हातपंप सौरउर्जेवर चालत असून नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करीत आहेत.सरकारने गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी सुरू केलेली राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना सौर उर्जेवर चालविण्यात येत आहे. ज्याठिकाणी मुबलक प्रमाणात पाणी आहे असे संकेत भूजल सर्वेक्षण यंत्रणेने दिलेत त्या ठिकाणी सौरउर्जेवर चालणारे हातपंप बसविण्यात येते. अस्तीत्वात असलेल्या हातपंपावर सौरउर्जेची टेस्टींग करून संपूर्ण सीस्टम बसविण्यात येते. या सौर उर्जेच्या माध्यमातून प्रती तास २८ लीटर पाणी उपसा करू शकते अशा क्षमतेचे हे सौरउर्जेचे सेट बसविण्यात येते. या उपक्रमांतर्गत हा सौरउर्जेचा सेट बसविल्यानंतर पाच वर्षात त्यात बिघाड आला किंवा काही नुकसान झाले तर त्याच्या दुरूस्तीची जबाबदारी हा प्रोजेक्ट लावणाऱ्या कंपनीवरच असते.परंतु पाच वर्षाचा कालावधी लोटला तर त्या कंपनीचा कंत्राट संपतो व नंतर त्याच्या देखरेखीसाठी शासनाने कसलीही उपया योजना केली नाही. पाच वर्षानंतर पाईप लिकेज झालेत, सौर उर्जेचे प्लेट फुटले, किंवा लोक आपल्या गायी म्हशी स्टॅण्ड पोस्टला बांधत असल्याने ते स्टॅण्ड उखडले तर त्याच्या दुरूस्तीसाठी शासनाकडे तरतूद नाही. परिणामी एका हातपंपावर पाच लाख रूपये खर्च करून ते वाया जाते. पाच वर्षानंतरची देखभाल दुरूस्तीसाठी शासनाने उपयायोजना करून यांत्रीकी विभागाकडे त्या पद्धतीची सोय करणे अपेक्षीत आहे.विजेची बचत करीत ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी देणे या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून सहज शक्य होते. सन २०११-१२ पासून गोंदिया जिल्ह्यात सौरउर्जेवर चालणारे हातपंप उभारण्यात आले. पहिल्याच वर्षी २०० हातपंप सौरउर्जेवर चालविण्यात आले. सन २०१२-१३ या वर्षात ५० हातपंप, २०१४-१५ मध्ये ३८, २०१५-१६ मध्ये ३०, सन २०१६-१७ मध्ये ८५ व सन २०१७-१८ च्या ११८ पैकी २५ हातपंपांवर सौरउर्जेचे सेट बसविण्यात आले. या हातपंपांतून नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत आहे.सहा कोटींची गरजएका हातपंपाला सौरउर्जेचा सेट बसविण्यासाठी पाच लाख रूपये खर्च येतो. सन २०१७-१८ या वर्षात ११८ हातपंपावर सारउर्जेचे सेट बसवायचे होते. यापैकी २५ हातपंपांवर सेट बसविण्यात आले. उर्वरीत ९३ हातपंपावर सौरउर्जेचे पॅनल बसविण्यासाठी सहा कोटी रूपयांच्या निधीची गरज आहे. शासनाने निधी न दिल्यामुळे हे सेट बसविण्यात आले नाही.नागरिकांनीही घ्यावी काळजीराष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत गावात हातपंपावर सौरउर्जेची सोय झाली तर त्या योजनेतून आपल्याला पाणी मिळते व याची काळजी नागरिकांनीही घ्यायला हवी. जनावरांमुळे पाईप लिकेज होणे, वादळ वाºयामुळे किंवा लहान मुलांच्या दगड मारण्यामुळे सौर उर्जेचे प्लेट फुटणे, लोक आपल्या गायी, म्हशी स्टॅण्ड पोस्टला बांधत असल्याने ते स्टॅण्ड उखडतात ते होऊ नये यासाठी त्याच गावातील लोकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल या उद्देशाने या राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातून हातपंपावर सौरउर्जेची सोय करण्यात येते. एकदा बांधकाम झाले तर पाच वर्ष देखभाल दुरूस्ती कंत्राटदाराकडे असते. त्यानंतर त्या योजनेच्या देखभाल दुरूस्तीसाठी नियोजन व्हावे, यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविला आहे.- नरेंद्र वानखेडे, उपअभियंता यांत्रीकी जि.प. गोंदिया.

टॅग्स :Waterपाणी