शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
3
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
4
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
7
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
8
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
9
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
10
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
11
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
12
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
13
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
14
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
15
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
16
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
17
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
18
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
19
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
20
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

जिल्ह्यातील ४२८ हातपंप सौर उर्जेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 23:34 IST

प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे शासन अनेक योजना अंमलात आणत आहे. ग्रामीण भागातील जनताही शुद्ध पाण्यापासून वंचीत राहू नये यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंमलात आणले. ५० टक्के राज्य व ५० टक्के केंद्र शासन निधी देऊन उभारण्यात येणाऱ्या या योजनांतून हातपंप सौर उर्जेवर चालविले जात आहेत.

ठळक मुद्देराष्ट्रीय ग्रामीण पेयजल : मुदत संपलेल्यांच्या दुरुस्तीसाठी करावी उपाययोजना

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे शासन अनेक योजना अंमलात आणत आहे. ग्रामीण भागातील जनताही शुद्ध पाण्यापासून वंचीत राहू नये यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंमलात आणले. ५० टक्के राज्य व ५० टक्के केंद्र शासन निधी देऊन उभारण्यात येणाऱ्या या योजनांतून हातपंप सौर उर्जेवर चालविले जात आहेत. गोंदिया जिल्ह्यातील ४२८ हातपंप सौरउर्जेवर चालत असून नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करीत आहेत.सरकारने गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी सुरू केलेली राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना सौर उर्जेवर चालविण्यात येत आहे. ज्याठिकाणी मुबलक प्रमाणात पाणी आहे असे संकेत भूजल सर्वेक्षण यंत्रणेने दिलेत त्या ठिकाणी सौरउर्जेवर चालणारे हातपंप बसविण्यात येते. अस्तीत्वात असलेल्या हातपंपावर सौरउर्जेची टेस्टींग करून संपूर्ण सीस्टम बसविण्यात येते. या सौर उर्जेच्या माध्यमातून प्रती तास २८ लीटर पाणी उपसा करू शकते अशा क्षमतेचे हे सौरउर्जेचे सेट बसविण्यात येते. या उपक्रमांतर्गत हा सौरउर्जेचा सेट बसविल्यानंतर पाच वर्षात त्यात बिघाड आला किंवा काही नुकसान झाले तर त्याच्या दुरूस्तीची जबाबदारी हा प्रोजेक्ट लावणाऱ्या कंपनीवरच असते.परंतु पाच वर्षाचा कालावधी लोटला तर त्या कंपनीचा कंत्राट संपतो व नंतर त्याच्या देखरेखीसाठी शासनाने कसलीही उपया योजना केली नाही. पाच वर्षानंतर पाईप लिकेज झालेत, सौर उर्जेचे प्लेट फुटले, किंवा लोक आपल्या गायी म्हशी स्टॅण्ड पोस्टला बांधत असल्याने ते स्टॅण्ड उखडले तर त्याच्या दुरूस्तीसाठी शासनाकडे तरतूद नाही. परिणामी एका हातपंपावर पाच लाख रूपये खर्च करून ते वाया जाते. पाच वर्षानंतरची देखभाल दुरूस्तीसाठी शासनाने उपयायोजना करून यांत्रीकी विभागाकडे त्या पद्धतीची सोय करणे अपेक्षीत आहे.विजेची बचत करीत ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी देणे या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून सहज शक्य होते. सन २०११-१२ पासून गोंदिया जिल्ह्यात सौरउर्जेवर चालणारे हातपंप उभारण्यात आले. पहिल्याच वर्षी २०० हातपंप सौरउर्जेवर चालविण्यात आले. सन २०१२-१३ या वर्षात ५० हातपंप, २०१४-१५ मध्ये ३८, २०१५-१६ मध्ये ३०, सन २०१६-१७ मध्ये ८५ व सन २०१७-१८ च्या ११८ पैकी २५ हातपंपांवर सौरउर्जेचे सेट बसविण्यात आले. या हातपंपांतून नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत आहे.सहा कोटींची गरजएका हातपंपाला सौरउर्जेचा सेट बसविण्यासाठी पाच लाख रूपये खर्च येतो. सन २०१७-१८ या वर्षात ११८ हातपंपावर सारउर्जेचे सेट बसवायचे होते. यापैकी २५ हातपंपांवर सेट बसविण्यात आले. उर्वरीत ९३ हातपंपावर सौरउर्जेचे पॅनल बसविण्यासाठी सहा कोटी रूपयांच्या निधीची गरज आहे. शासनाने निधी न दिल्यामुळे हे सेट बसविण्यात आले नाही.नागरिकांनीही घ्यावी काळजीराष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत गावात हातपंपावर सौरउर्जेची सोय झाली तर त्या योजनेतून आपल्याला पाणी मिळते व याची काळजी नागरिकांनीही घ्यायला हवी. जनावरांमुळे पाईप लिकेज होणे, वादळ वाºयामुळे किंवा लहान मुलांच्या दगड मारण्यामुळे सौर उर्जेचे प्लेट फुटणे, लोक आपल्या गायी, म्हशी स्टॅण्ड पोस्टला बांधत असल्याने ते स्टॅण्ड उखडतात ते होऊ नये यासाठी त्याच गावातील लोकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल या उद्देशाने या राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातून हातपंपावर सौरउर्जेची सोय करण्यात येते. एकदा बांधकाम झाले तर पाच वर्ष देखभाल दुरूस्ती कंत्राटदाराकडे असते. त्यानंतर त्या योजनेच्या देखभाल दुरूस्तीसाठी नियोजन व्हावे, यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविला आहे.- नरेंद्र वानखेडे, उपअभियंता यांत्रीकी जि.प. गोंदिया.

टॅग्स :Waterपाणी