शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
3
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
4
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
5
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
6
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
7
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
8
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
9
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
10
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
14
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
15
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
16
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
17
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
18
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
19
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
20
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र

जिल्ह्यातील ४२८ हातपंप सौर उर्जेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 23:34 IST

प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे शासन अनेक योजना अंमलात आणत आहे. ग्रामीण भागातील जनताही शुद्ध पाण्यापासून वंचीत राहू नये यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंमलात आणले. ५० टक्के राज्य व ५० टक्के केंद्र शासन निधी देऊन उभारण्यात येणाऱ्या या योजनांतून हातपंप सौर उर्जेवर चालविले जात आहेत.

ठळक मुद्देराष्ट्रीय ग्रामीण पेयजल : मुदत संपलेल्यांच्या दुरुस्तीसाठी करावी उपाययोजना

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे शासन अनेक योजना अंमलात आणत आहे. ग्रामीण भागातील जनताही शुद्ध पाण्यापासून वंचीत राहू नये यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंमलात आणले. ५० टक्के राज्य व ५० टक्के केंद्र शासन निधी देऊन उभारण्यात येणाऱ्या या योजनांतून हातपंप सौर उर्जेवर चालविले जात आहेत. गोंदिया जिल्ह्यातील ४२८ हातपंप सौरउर्जेवर चालत असून नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करीत आहेत.सरकारने गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी सुरू केलेली राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना सौर उर्जेवर चालविण्यात येत आहे. ज्याठिकाणी मुबलक प्रमाणात पाणी आहे असे संकेत भूजल सर्वेक्षण यंत्रणेने दिलेत त्या ठिकाणी सौरउर्जेवर चालणारे हातपंप बसविण्यात येते. अस्तीत्वात असलेल्या हातपंपावर सौरउर्जेची टेस्टींग करून संपूर्ण सीस्टम बसविण्यात येते. या सौर उर्जेच्या माध्यमातून प्रती तास २८ लीटर पाणी उपसा करू शकते अशा क्षमतेचे हे सौरउर्जेचे सेट बसविण्यात येते. या उपक्रमांतर्गत हा सौरउर्जेचा सेट बसविल्यानंतर पाच वर्षात त्यात बिघाड आला किंवा काही नुकसान झाले तर त्याच्या दुरूस्तीची जबाबदारी हा प्रोजेक्ट लावणाऱ्या कंपनीवरच असते.परंतु पाच वर्षाचा कालावधी लोटला तर त्या कंपनीचा कंत्राट संपतो व नंतर त्याच्या देखरेखीसाठी शासनाने कसलीही उपया योजना केली नाही. पाच वर्षानंतर पाईप लिकेज झालेत, सौर उर्जेचे प्लेट फुटले, किंवा लोक आपल्या गायी म्हशी स्टॅण्ड पोस्टला बांधत असल्याने ते स्टॅण्ड उखडले तर त्याच्या दुरूस्तीसाठी शासनाकडे तरतूद नाही. परिणामी एका हातपंपावर पाच लाख रूपये खर्च करून ते वाया जाते. पाच वर्षानंतरची देखभाल दुरूस्तीसाठी शासनाने उपयायोजना करून यांत्रीकी विभागाकडे त्या पद्धतीची सोय करणे अपेक्षीत आहे.विजेची बचत करीत ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी देणे या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून सहज शक्य होते. सन २०११-१२ पासून गोंदिया जिल्ह्यात सौरउर्जेवर चालणारे हातपंप उभारण्यात आले. पहिल्याच वर्षी २०० हातपंप सौरउर्जेवर चालविण्यात आले. सन २०१२-१३ या वर्षात ५० हातपंप, २०१४-१५ मध्ये ३८, २०१५-१६ मध्ये ३०, सन २०१६-१७ मध्ये ८५ व सन २०१७-१८ च्या ११८ पैकी २५ हातपंपांवर सौरउर्जेचे सेट बसविण्यात आले. या हातपंपांतून नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत आहे.सहा कोटींची गरजएका हातपंपाला सौरउर्जेचा सेट बसविण्यासाठी पाच लाख रूपये खर्च येतो. सन २०१७-१८ या वर्षात ११८ हातपंपावर सारउर्जेचे सेट बसवायचे होते. यापैकी २५ हातपंपांवर सेट बसविण्यात आले. उर्वरीत ९३ हातपंपावर सौरउर्जेचे पॅनल बसविण्यासाठी सहा कोटी रूपयांच्या निधीची गरज आहे. शासनाने निधी न दिल्यामुळे हे सेट बसविण्यात आले नाही.नागरिकांनीही घ्यावी काळजीराष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत गावात हातपंपावर सौरउर्जेची सोय झाली तर त्या योजनेतून आपल्याला पाणी मिळते व याची काळजी नागरिकांनीही घ्यायला हवी. जनावरांमुळे पाईप लिकेज होणे, वादळ वाºयामुळे किंवा लहान मुलांच्या दगड मारण्यामुळे सौर उर्जेचे प्लेट फुटणे, लोक आपल्या गायी, म्हशी स्टॅण्ड पोस्टला बांधत असल्याने ते स्टॅण्ड उखडतात ते होऊ नये यासाठी त्याच गावातील लोकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल या उद्देशाने या राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातून हातपंपावर सौरउर्जेची सोय करण्यात येते. एकदा बांधकाम झाले तर पाच वर्ष देखभाल दुरूस्ती कंत्राटदाराकडे असते. त्यानंतर त्या योजनेच्या देखभाल दुरूस्तीसाठी नियोजन व्हावे, यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविला आहे.- नरेंद्र वानखेडे, उपअभियंता यांत्रीकी जि.प. गोंदिया.

टॅग्स :Waterपाणी