शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

१२३.५० हेक्टर जंगलात वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 23:59 IST

उन्हाळ्यात जंगलात वणव्याच्या घटना वाढतात. एवढेच नव्हे तर जंगलाला लागून असलेल्या भागातही आगीच्या घटनांत वाढ होते. मागील तीन महिन्यांवर नजर घातल्यास वन विकास महामंडळ व वन प्रकल्प विभागांतर्गत येणाऱ्या क्षेत्रात वणव्याच्या घटना घडल्या असून त्यात १२३.५० हेक्टर क्षेत्रात याचे परिणाम जाणवले आहे.

ठळक मुद्देएफडीसीएमचे क्षेत्र : मार्च महिन्यात सर्वाधिक ३५ घटना, देवरी वन प्रकल्पात १६ घटना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाळ्यात जंगलात वणव्याच्या घटना वाढतात. एवढेच नव्हे तर जंगलाला लागून असलेल्या भागातही आगीच्या घटनांत वाढ होते. मागील तीन महिन्यांवर नजर घातल्यास वन विकास महामंडळ व वन प्रकल्प विभागांतर्गत येणाऱ्या क्षेत्रात वणव्याच्या घटना घडल्या असून त्यात १२३.५० हेक्टर क्षेत्रात याचे परिणाम जाणवले आहे.उन्हाची दाहकता वाढल्यास आगीचे प्रकारही वाढतात. उष्णतेमुळे जंगलातील सुकलेला पाला-पाचोळा लवकरच पेट धरतो व पुढे त्याचे आगीच्या भडक्यात रूपांतर होते. या वणव्यात मोठमोठाले जंगल राखेत बदलायला वेळ लागत नाही. या वणव्याच्या घटनेने जंगल जळून खाक होत असतानाच वन्य पशूंनाही याचा फटका सहन करावा लागतो. जिल्ह्यातही वणव्याच्या अशा या घडत आहेत. येथे जानेवारी ते मार्च या कालावधीत वन विकास महामंडळाच्या क्षेत्रात वणव्याच्या एकूण ३६ घटना घडल्याची नोंद आहे.यामध्ये, मार्च महिन्यात ३५ घटना घडल्या असून एप्रिल महिन्यातील घटनांची माहिती नाही. तरिही मार्च महिन्यातील घटनांपेक्षा जास्त घटना घडल्यास आश्चर्य नाही असे म्हटले जात आहे. देहरादून येथील सॅटेलाईट चॅनलकडून मिळालेल्या अहवालाच्या आधारे वणव्याच्या घटनांची तपासणी करण्यात आली व त्यानंतरच ही आकडेवारी देण्यात आली आहे. जंगलातील वणव्याच्या या घटनांत आग पसरू नये यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात आले.विशेष म्हणजे, वाळलेला पालापाचोळा जळल्यानंतर पसरणारी आग नियंत्रीत करण्यासाठी जाड रेषा बनविण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. जंगलातील झाडांवरून पडलेली वाळलेली पाने आगीला दूरवर नेते. यावर जाड रेषा ही आग नियंत्रीत करण्यासाठी अत्यंत उपयोगी सिद्ध होते. वेळीच करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे वणव्यावर नियंत्रण मिळविता आले व त्यामुळे वन संपत्तीही बचावली.२७.५० हेक्टर वन क्षेत्र आगीच्या विळख्यातजिल्ह्यात घडलेल्या या घटनांत सर्वाधिक घटना देवरी वन प्रकल्प विभागात नोंद करण्यात आल्या आहेत. या विभागात एकूण १६ घटनांची नोंद असून २७.५० हेक्टर वन क्षेत्र आगीच्या विळख्यात आले आहे. तर सर्वाधिक वन क्षेत्र जांभळी-२ मध्ये आगीत आले. गोंदिया-डोंगरगाव वन प्रकल्प विभागात ४ घटना घडल्या असून ६४.५० हेक्टर तर अर्जुनी-मोरगाव वन प्रकल्प विभागात ३ घटना घडल्या असून यात ७.५० हेक्टर क्षेत्र आगीच्या हवाली झाले.वणव्याच्या ३६ घटना घडल्या आहेत. मात्र यामुळे रोपवनांचे नुकसान झाले नाही. या घटनांत जमिनीवर पडलेला पालापाचोळा जळाला. पूर्व तयारी व वेळीच पाऊल उचलल्यामुळे त्रास झाला नाही.-पी.जी. नौकरकरविभागीय प्रबंधक, एफडीसीएम लि. वन प्रकल्प गोंदिया

टॅग्स :fireआग