शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांची स्थिती सुधारल्यावरच नवा वाहन कायदा लागू; 'या' राज्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 17:25 IST

कायद्याच्या अंमलबजावणीची घाई नसल्याची वाहतूक मंत्र्यांची माहिती

पणजी : राज्यातील रस्त्यांची स्थिती थोडी तरी सुधारायला हवी. मग आम्ही केंद्रीय मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी करू. सरकारला कायदा अंमलात आणण्याची घाई नाही, असे गोव्याचे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.केंद्रीय मोटर वाहन कायद्यातील नव्या तरतुदींची गोव्यात अजून अंमलबजावणी सुरू झालेली नाही. येत्या सोमवारपासून अंमलबजावणी सुरू होईल असे आधी वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात होते. पण गोवा हे पर्यटन राज्य असल्याने राज्य सरकारने थोडी सावध भूमिका घेतली आहे. मंत्री गुदिन्हो यांनी विषय स्पष्ट करताना सांगितले की, केंद्रातील कायदा आम्हाला अंमलात आणावाच लागेल. त्याविषयी वेगळा विचार नाही. मात्र तो अंमलात कधी आणायचा हे ठरविण्याचा अधिकार तेवढा आमच्याकडे आहे. आम्ही कधीही अंमलबजावणी सुरू करू शकतो. पण तूर्त घाई करायची नाही असे मला वाटते. कारण गोव्यात यावेळी प्रचंड प्रमाणात पाऊस पडला. एवढा पाऊस पडेल असे कुणालाच वाटले नव्हते. या पावसाने जशी शेतीची व वीज यंत्रणोची हानी केली तशीच गोव्याच्या रस्त्यांचीही हानी केली.मंत्री गुदिन्हो म्हणाले की, गोव्यातील रस्त्यांमध्ये थोडी सुधारणा झाल्यानंतर मग आम्ही केंद्रीय मोटर वाहन कायदा अंमलात आणण्यासाठी पाऊले उचलू. रस्त्यावर खड्डे पडलेले असल्याने आम्ही कायदा अंमलात आणण्याची घाई करत नाही. शेवटी कायद्यातील तरतुदींनुसार दंडाची रक्कम मोठी असली तरी, प्रत्येकाने वाहन चालविताना नियम पाळायला हवेत. मद्य पिऊन काहीजण वाहन चालवितात. मद्यपी चालक दुसऱ्यांचे बळी घेतात. याविरुद्ध कारवाई व्हायलाच हवी. त्यामुळे योग्यवेळी आम्ही कायद्याची अंमलबजावणी सुरू करू. 

टॅग्स :goaगोवाTrafficवाहतूक कोंडी