शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण गोव्याला दिलासा, साळावली धरणाच्या पाणी पातळीत वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 17:13 IST

पावसाळा लांबल्यामुळे जून महिन्यात गोव्यातील धरणांची पातळी एकदम खाली गेल्याने काहीशी दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाली होती. मात्र मागच्या दहा दिवसांत पडलेल्या धुवांधार पावसाने ही कसर भरुन काढली आहे.

ठळक मुद्दे जून महिन्यात गोव्यातील धरणांची पातळी एकदम खाली गेल्याने काहीशी दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाली होती.गोव्यातील धरणातील पाण्याची पातळी सरासरी 20 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.गोव्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या साळावली धरणाची पातळी 35.9 मीटरपर्यंत वाढली आहे.

मडगाव - पावसाळा लांबल्यामुळे जून महिन्यात गोव्यातील धरणांची पातळी एकदम खाली गेल्याने काहीशी दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाली होती. मात्र मागच्या दहा दिवसांत पडलेल्या धुवांधार पावसाने ही कसर भरुन काढली आहे. मागच्या दहा दिवसांत पडलेल्या पावसामुळे गोव्यातील धरणातील पाण्याची पातळी सरासरी 20 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

गोव्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या साळावली धरणाची पातळी 35.9 मीटरपर्यंत वाढली आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला या धरणातील पाणी 20 टक्क्यांवर पोहोचले होते ते आता 55 टक्क्यांवर पोहोचले आहे. साळावली धरण हे दक्षिण गोव्यासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा मुख्य स्रोत असून या धरणाच्या भोवती असलेल्या निसर्गामुळे ते एक पर्यटन स्थळही आहे.

दक्षिण गोव्यातील पंचवाडी येथील धरणाची पातळी 61 टक्क्यांपर्यंत पोहोचली असून एकूण पाण्याची पातळी 47.4 मीटर एवढी वाढली आहे. काणकोणातील चापोली धरण 53 टक्के भरले असून पाण्याची पातळी 32.8 मीटर एवढी वाढली आहे. पंचवाडी धरणातून फोंड्याला तर चापोली धरणातून काणकोणला पाणी पुरवठा केला जातो.

मागच्या दहा दिवसांत गोव्यात मुसळधार पाऊस पडत असून त्यामुळे प्रत्येक धरणाची पातळी सरासरी 20 टक्क्यांनी वाढली आहे. यंदा पावसाळा उशिरा आल्याने जुन महिन्यात ही पातळी  6 ते 18 टक्क्यांवर पोहोचली होती. बार्देश तालुक्याला पाणी पुरवठा करणारे आमठाणो धरण 65 टक्के भरले असून पाण्याची पातळी 47.4 मीटरवर पोहोचली आहे. सत्तरी, डिचोली व बार्देश या तालुक्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या अंजुणे धरण 28 टक्के भरले असून जुन महिन्यात या धरणाच्या पाण्याची पातळी 6 टक्क्यांवर पोहोचली होती.

झाडे पडण्याच्या 300 घटना

मुसळधार पावसामुळे मागच्या दहा दिवसात राज्यात झाडे पडण्याच्या 300 घटना घडल्या असून यापैकी काही झाडे घरावर व वीजेच्या खांबावर कोसळल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. झाडे उन्मळून पडण्याच्या जास्त घटना काणकोण, सांगे, वाळपई व सत्तरी या भागात घडल्या आहेत.

 

टॅग्स :goaगोवाWaterपाणीRainपाऊसDamधरण