शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

शाळांना वेळेबाबत पर्याय; राज्य सरकारकडून शालान्त मंडळाला सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2024 07:39 IST

नवे शैक्षणिक सत्र 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शाळांच्या वेळेत १५ मिनिटांनी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ सकाळी आठऐवजी ७.४५ वाजता शाळा सुरू करून करण्याचा किंवा संध्याकाळी जादा वर्ग घेऊन करण्याचे पर्याय शाळांना देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, शिकवण्याच्या तासांची संख्या वाढली आहे. त्याची माहितीही विद्यालयांना देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून शालान्त मंडळाला याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सकाळच्या प्रार्थनेची वेळ आणि मधली सुट्टी वगळून ५.३० तासांचे शिक्षण अपेक्षित आहे. त्यासाठी सकाळी शाळा ८ ऐवजी ७.४५ वाजता सुरू करणे हा एक पर्याय देण्यात आला आहे. किंवा संध्याकाळच्या सत्रात वर्ग घेऊन शिकविण्याचे तास वाढविण्याचाही पर्याय देण्यात आला आहे. कारण नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांचे विषय वाढले आहेत आणि तासिकाही वाढल्या आहेत.

अशा असतील तासिका

राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार, प्रत्येक वर्गाचा कालावधी ५० मिनिटांचा असावा, सध्या ३५ मिनिटांच्या तासिका आहेत. नवीन शैक्षणिक वर्षात ४० मिनिटांच्या तासिका करण्यात याव्यात, अशी सूचना शिक्षण धोरण अंमलबजावणी समितीने केली आहे. नवीन शिक्षण धोरणाचा राज्यात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत अंमलबजावणी होत असल्यामुळे यंदा केवळ नववी इयत्तेला ही नियमावली लागू असेल. त्यामुळेच शाळेची १५ मिनिटे वाढविण्यात आली आहेत.

८० शिक्षक प्रशिक्षणासाठी बंगळुरूला

राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीत शिक्षकांची भूमिका ही सर्वात महत्तवाची आहे. त्यामुळे शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. राज्यातील माध्यमिक विद्यालयांतील विज्ञान विषयाचे ४० आणि गणित विषयाचे ४० असे मिळून ८० शिक्षकांना बंगळूरू येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेकडून १० दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जून महिन्यात हे प्रशिक्षण असेल अशी माहिती धोरण अंमलबजावणी समितीचे सदस्य जे. आर. रिबेलो यांनी दिली.

तर शाळा ७.४५ वाजता भरणार

शिकवणीचे तास कोणत्या पद्धतीने वाढवावे हे स्वातंत्र्य विद्यालयांना देण्यात आले आहे. परंतु विद्यालयांनी सविस्तर वेळापत्रक करून गोवा शालान्त मंडळाला सादर करावे लागेल किंवा शाळा सरळ सकाळी ७.४५ वाजता सुरू करून नेहमीच्या वेळेत सोडण्यात सांगाव्यात, अशी सूचना सरकारने शालान्त मंडळाला केली असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली.

वेळ कशी साधणार?

दरम्यान, शाळांना या निर्देशानुसार, दररोजच्या तासिकांच्या वेळांचे नियोजन करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना शाळेत लवकर बोलवायचे असेल तर त्यानुसार बालरथ अथवा विद्यार्थी वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे. किंवा संध्याकाळच्या सत्रात वेळ वाढवून त्यानुसार तासिकांचे समायोजन करावे लागेल. दोन्हीपैकी एक पर्याय निवडावा लागणार असल्याने शैक्षणिक वर्तुळातून कसा निर्णय घेतला जाईल, याविषयी पालक तसेच विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे.

 

टॅग्स :goaगोवाSchoolशाळाEducationशिक्षण