शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

गोव्यात निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी तापवली ‘म्हादई’; ‘मोदी की गॅरेंटी’ का नाही? आरजीचा सवाल

By किशोर कुबल | Published: March 21, 2024 4:18 PM

तानावडे म्हणाले की, म्हादईचे प्रकरण सध्या कोर्टात आहे आणि कोणत्याही परिस्थितीत सरकार कर्नाटकला म्हादईचे पाणी वळवू देणार नाही.

पणजी : लोकसभा निवडणूक तोंडावर असताना गोव्यात म्हादईचा विषय विरोधकांनी तापवला आहे. म्हादईबाबत ‘मोदी की गॅरेंटी’ का नाही?, असा सवाल आरजीने केला आहे. गोवा फॉरवर्डनेही या प्रश्नावर सरकारकडे स्पष्टीकरण मागितले आहे. कर्नाटकने म्हादईचे पाणी मलप्रभा नदीत वळवण्यासाठी नव्याने काम सुरु केले आहे त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर हा विषय गाजत आहे.

आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी म्हादईचे रक्षण करण्यासाठी भाजपने ‘मोदी की गॅरेंटी’ का नाही? असा प्रश्न करुन ‘सेव्ह म्हादई’ कुठे आहे? या चळवळीचे नेतृत्त्व करणारे कॉंग्रेसी नेते कुठे आहेत? असा प्रश्न केला असून कणकुंबी येथून जर मोर्चा काढला तर कॉंग्रेससोबत सहभागी होण्याची आमची तयारी आहे?, असे त्यांनी म्हटले आहे.दरम्यान,  कर्नाटकने मलप्रभा खोऱ्यात पाणी वळवण्यासाठी नाल्यावर बांधकाम सुरू केले आहे, अशी माहिती देताना सरदेसाई यांनी तेथे  सुरू असलेल्या कामांची व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. सभागृह समितीची बैठक बोलावण्याची वारंवार विनंती करूनही सरकारने तसे करण्याची तसदी घेतली नाही, अशी त्यांची तक्रार आहे.

हा निवडणूक स्टंट -दरम्यान, विरोधक उपस्थित करीत असलेला म्हादईचा विषय हा निवडणूक स्टंट असल्याचा दावा करीत दरवेळी निवडणुकीआधी विरोधी पक्ष हा विषय उकरुन काढतात, अशी टीक भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केली आहे.

तानावडे म्हणाले की, म्हादईचे प्रकरण सध्या कोर्टात आहे आणि कोणत्याही परिस्थितीत सरकार कर्नाटकला म्हादईचे पाणी वळवू देणार नाही. 

टॅग्स :goaगोवाriverनदी