शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

गोव्यातील ‘सिरीयल किलर’ महानंद नाईक याच्या जन्मठेपेवर सुप्रीम कोर्टाची मोहर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 6:36 PM

गोव्यात तब्बल १६ युवतींच्या खून प्रकरणांमध्ये गाजलेल्या सिरीयल किलर महानंद नाईक याला फोंडा येथील वासंती गावडे खून प्रकरणात येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या जन्मठेपेची शिक्षा सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी उचलून धरली.

पणजी : गोव्यात तब्बल १६ युवतींच्या खून प्रकरणांमध्ये गाजलेल्या सिरीयल किलर महानंद नाईक याला फोंडा येथील वासंती गावडे खून प्रकरणात येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या जन्मठेपेची शिक्षा सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी उचलून धरली. आतापर्यंत तीन प्रकरणांमध्ये त्याला शिक्षा झालेली आहे तर चार प्रकरणांमध्ये तो निर्दोष सुटला आहे. एका प्रकरणात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.  

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. के. गोयल व न्यायमूर्ती यु. यु. ललित यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने वरील आदेश दिला. १९९५ ते २00९ या काळात तब्बल १६ युवतींचे खून केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. १९ ते २५ वयोगटातील तरुण मुलींना हेरुन मैत्री करुन लग्नाचे आमिष दाखविणे आणि नंतर त्यांचा उपभोग घेऊन खून करुन त्यांच्या अंगावरील दागिने पळविणे अशी त्याची गुन्ह्याची कार्यपद्धती होती. या मुलींचा दुपट्टा वापरुनच गळा आवळून तो खून करीत असे त्यामुळे ‘दुपट्टा कीलर’ म्हणून तो गाजला. १९९५ च्या वासंती गावडे खून प्रकरणात येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने महानंद याला जन्मठेप तसेच १ लाख ३0 हजार रुपये दंड ठोठावली होती. महानंदने केलेला हा पहिला खून होता, असाही पोलिसांचा दावा आहे. सत्र न्यायालयाच्या आदेशास महानंद याने हायकोर्टात आव्हान दिले असता हायकोर्टानेही आदेश उचलून धरला. या आदेशाविरुद्ध तो सर्वोच्च न्यायालयात गेला. वासंती हिचे प्रेत मिळालेच नाही, असा दावा करुन तो आपल्या सुटकेसाठी वेगवेगळे बचाव घेत होता परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्याचा बचाव फेटाळून लावला. 

महानंद याने ११ सप्टेंबर १९९५ रोजी बेतोडा येथे निर्जन स्थळी नेऊन वासंती हिचा तिचाच दुपट्टा वापरुन गळा आवळून खून केला आणि तिचे दागिने पळविले, असा आरोप त्याच्यावर आहे. महानंद हा त्या काळी फोंडा शहरात रिक्षा चालवत होता. वासंती हिच्याबरोबर महानंदला तिच्या मावस भावाने पाहिले होते. वासंती बेपत्ता झाल्यानंतर त्यानेच या प्रकरणाचा पाठपुरावा केला. या खुनाची कबुली तब्बल चौदा वर्षांनी ३ मे २00९ रोजी त्याने दिली. शेवटी पत्नीच्या मैत्रिणीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात तो सापडला आणि त्याचे सर्व कारनामे उघड झाले. अपहरण, बळजबरी चोरी, खून तसेच पुरावे नष्ट करण्याच्या प्रकरणात त्याच्यावर भादंसंचे कलम ३0२, ३६४, ३९२ व २0१ खाली गुन्हे नोंद आहेत. 

या प्रकरणाचे तपासकाम करणारे पोलिस निरीक्षक सी. एल. पाटील खटल्याच्या सुनावणीसाठी दिल्लीत आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, या प्रकरणात किमान २0 साक्षिदारांच्या जबान्या आम्ही घेतल्या. वासंती हिचे प्रेत सापडल्याने आमचा दावा मजबूत झाला होता. गोळा केलेले सर्व पुरावे व्यवस्थितपणे कनिष्ठ न्यायालयाला आम्ही सादर केले होते त्यामुळेच महानंद याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जन्मठेप ठोठावली. आता सर्वोच्च न्यायालयानेही ती उचलून धरल्याने आमचा तपास योग्य दिशेने होता यावर शिक्कामोर्तब झाले.  

या खटल्यात राज्य सरकारतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी, अ‍ॅड. साल्वादोर रिबेलो व अ‍ॅड. मयुरी गोयल यांनी काम पाहिले. तपास अधिकारी म्हणून पाटील यांच्यासह उपनिरीक्षक तुकाराम चव्हाण, उपनिरीक्षक सचिन पन्हाळकर हेही सर्वोच्च न्यायालयात उपस्थित होते. या प्रकरणात पुरेसे पुरावे तसेच घटना प्रत्यक्ष पाहणारा साक्षीदार नाही, असेही महानंद याचे म्हणणे होते. नाडकर्णी यांनी महानंद याचा गुन्हेगारी पूर्वतिहास पहावा, अशी विनंती केली. मावसभावाने महानंद याच्याबरोबर वासंती हिला प्रत्यक्ष पाहिले आहे. तशी त्याची जबानीही आहे याकडे लक्ष वेधले. 

टॅग्स :goaगोवाCrimeगुन्हा