शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांमुळे प्रदूषणाची स्थिती भयावह

By admin | Updated: November 24, 2014 01:41 IST

राज्यातील शहरांमध्ये वाहनांची संख्या वाढत असल्याने प्रदूषण आणि पार्किंग याबाबत भयावह स्थिती निर्माण झाली आहे, असे निरीक्षण वाहतूक खात्याने नोंदवले आहे.

पणजी : राज्यातील शहरांमध्ये वाहनांची संख्या वाढत असल्याने प्रदूषण आणि पार्किंग याबाबत भयावह स्थिती निर्माण झाली आहे, असे निरीक्षण वाहतूक खात्याने नोंदवले आहे. कदंबच्या पास पद्धतीबाबतची अधिसूचना जारी करताना वाहतूक खात्याने राज्यातील शहरांमधील वाहनांच्या स्थितीवर प्रकाशझोत टाकला आहे. अधिकाधिक लोक स्वत:च्या दुचाक्या, कारगाड्या व अन्य वाहने वापरतात. वाहनांच्या प्रचंड वापरामुळे वाहतुकीची कोंडी होतेच, शिवाय दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे अपघात होतात. राज्यातील सर्व शहरी भागांमध्ये प्रदूषणाबाबत आणि पार्किंगबाबत भयावह स्थिती आहे, असे निरीक्षण वाहतूक खात्याने नोंदवले आहे. दरम्यान, एका पणजी शहरात दिवसाला किमान साठ हजार वाहने प्रवेश करतात, असे यापूर्वी तिसऱ्या नियोजित मांडवी पुलाविषयी अभ्यास करताना साधनसुविधा विकास महामंडळाच्या काही अधिकाऱ्यांना आढळून आले आहे. प्रत्येक शहरात सकाळी व सायंकाळी वाहनांची प्रचंड गर्दी दिसून येते. सकाळी वाहने शहरात येण्यासाठी व सायंकाळी शहरातून बाहेर जाण्यासाठी रस्त्यावर संघर्ष करतात व यामुळे राज्यातील बहुतांश प्रमुख मार्गांवर अपघात होत आहेत. पार्किंगची समस्याही प्रत्येक शहरात जटिल बनली आहे. पणजीपेक्षाही म्हापसा शहरात वाहनांच्या पार्किंगची मोठी समस्या आहे. दुचाकीदेखील नीट पार्क करायला जागा मिळत नाही, असा अनुभव राज्यातील सर्वच शहरांमध्ये येऊ लागला आहे. (खास प्रतिनिधी)