शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

गोव्यातील साईभक्त पदयात्रेतून शिर्डीकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 2:02 PM

वयाची 75 वर्षे गाठलेल्या जेष्ठ नागरिकांपासून ते 20 वर्षीय युवकापर्यंतचे 70 साईभक्त बुधवारी (6 फेब्रुवारी) शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी गोव्यातून पदयात्रेद्वारे निघाले आहेत.

म्हापसा : वयाची 75 वर्षे गाठलेल्या जेष्ठ नागरिकांपासून ते 20 वर्षीय युवकापर्यंतचे 70 साईभक्त बुधवारी (6 फेब्रुवारी) शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी गोव्यातून पदयात्रेद्वारे निघाले आहेत. साई भक्त परिवारातर्फे सुरू करण्यात आलेल्या या पहिल्या आणि दीर्घ पल्ल्याच्या दुस-या पदयात्रेला म्हापसा शहरातील टॅक्सी स्थानकावर असलेल्या साई मंदिरापासून सुरुवात झाली. ही पदयात्रा शिर्डीपर्यंतचा 550 किलोमीटरचा प्रवास 15 दिवसांत पूर्ण करुन शिर्डीमध्ये पोहोचणार आहे. या पदयात्रेची सांगता 20 फेब्रुवारीला शिर्डीमध्ये दाखल झाल्यानंतर केली जाणार आहे.  

टॅक्सी स्थानकावर साईंच्या आरती आणि जयजयकार केल्यानंतर यात्रेला शुभारंभ म्हापसा पालिकेतील नगरसेवक आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. 15 दिवसांच्या या प्रवासात दरदिवशी सरासरी 40 ते 50 किलोमीटर तर शेवटच्या दिवशी 15 ते 20 किलोमीटर यात्रा केली जाणार असल्याची माहिती संस्थापक प्रशांत वेर्लेकर यांनी दिली. ही पदयात्रा धारगळ मार्गे बांदा, आंबोली, गडहिंग्लज, चिकोडी-तासगाव, विटा, बारामती, दौंड-नगर ते शिर्डी असा प्रवास करणार आहे. शेवटच्या दिवशी पदयात्रा दिंडी तसेच गजराने साई मंदिरात प्रवेश करणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. 

संस्थेने आयोजित केलेली ही यंदाची सहावी पदयात्रा आहे. 2013 साली सुरू झालेल्या या पदयात्रेत त्यावेळी सहभागी साईभक्तांची संख्या ७ होती. आता ही संख्या सत्तरच्या घरात गेली आहे. गेल्या वर्षी सुमारे ३५ भक्त सहभागी झाले होते. काही भक्तगण वाटेत सुद्धा यात्रेत सहभागी होत असतात. त्यात गोव्यातील विविध भागातून आलेल्या साईभक्तांसोबत महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील भक्तांचा सुद्धा समावेश असल्याचे ते म्हणाले. 

पूर्वी ही यात्रा सर्वात जास्त किलोमीटर अंतर पार करुन शिर्डीत जाणारी यात्रा होती; पण आता दिल्लीतून सुद्धा शिर्डीपर्यंत एक पदयात्रा येत असल्याने ही दुसरी लांब पल्ल्याची यात्रा असल्याची माहिती निलेश वेर्णेकर यांनी दिली. मात्र साईभक्त परिवार ही शिर्डीत यात्रा सुरू करणारी पहिली संस्था असल्याचा दावा यावेळी वेर्णेकर यांच्या वतीने करण्यात आला. यात्रेत पढंरीची वारी करणारे वारकरी सुद्धा समावेश होतात असेही यावेळी सांगितले. 

यात्रा दरम्यान प्रत्येक ठिकाणी चांगले स्वागत तसेच केले जाते. ज्या गावात रात्रीचे वास्तव्य केले जाते त्या गावातील लोकांकडून चांगले सहकार्य सुद्धा केले जाते. काही भक्तांकडून महाप्रसाद तसेच इतर कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जातात. काही गावात तर गोव्यात सुद्धा वारकरी असल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त केले जात असल्याचे वेर्णेकर यांनी माहिती देऊन सांगितले. 

टॅग्स :shirdiशिर्डीgoaगोवा