शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

खासदार झालो तरी माझे पाय जमिनीवरच : सदानंद तानावडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 15:48 IST

'लोकमत' कार्यालयास सदिच्छा भेट : राजकीय प्रवासावर दिलखुलास गप्पा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यसभा खासदार झालो तरी माझे पाय जमिनीवरच आहेत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल 'लोकमत' कार्यालयात झालेल्या मुलाखत कार्यक्रमावेळी सांगितले.

तानावडे यांनी बुधवारी 'लोकमत' कार्यालयाला भेट दिली. तळागाळातील भाजपच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा तसेच पक्षाने ठेवलेल्या विश्वासामुळे राज्यसभा खासदार पदापर्यंत पोहचलो. अन्यथा मी आमदारदेखील कधी होईन असे मला वाटले नव्हते, असे तानावडे म्हणाले. खासदारपद हे एका दिवसासारखे असते. पण तळागाळातील लोकांशी जोडलेले नाते हे आपल्याला राखून ठेवावे लागते. २०१२ साली मला आमदारकीचे तिकीट नाकारले म्हणून मी बंडखोरी केली नाही. पुढे पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होईन, खासदार होईन हे मला अगोदर मुळीच माहीत नव्हते. पक्षाचे काम एकनिष्ठेने केल्याने या पदापर्यंत मी पोहचलो, असे तानावडे म्हणाले,

येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकेल. राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची एकी झाली तरी गोव्यात भाजपच्या यशावर परिणाम होणार नाही, मी स्वतः उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी कधीच करत नव्हतो, मी गोवाभर फिरत असल्याने काहीजणांचा तसा गैरसमज झाला होता, असे तानावडे म्हणाले.

प्रदेशाध्यक्षपदात बदल नाही

लोकसभा निवडणुकीला अवधे ८ महिने शिल्लक आहेत. तोपर्यंत पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारीही माझ्याकडे असणार आहे. भाजप संघटनेत निवडणुकीपर्यंत काही बदल होणार नाहीत. मंत्रिमंडळातही बदल होण्याची शक्यता मला वाटत नाही, शेवटी तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, असे तानावडे म्हणाले.

आजही मनस्ताप होतोय

तानावडे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना काँग्रेस सरकारच्या काळात आपल्यावर पाच खोट्या तक्रारी दाखल झाल्या होत्या, असे सांगितले. बनावट सहीच्या प्रकरणातही माझ्याविरुद्धच गुन्हा होता. कारण मी अपात्रता याचिका सादर केली होती. एवढाच माझा दोष होता. पोलिस तपासावेळी मला खूप मनस्ताप झाला. माझ्यासोबत माझ्या कुटुंबाला याचा मनस्ताप सहन करावा लागला. याचा परिणाम माझ्या आरोग्यावर झाला, कदाचित त्यावेळीच मला डायबेटीस झाला असावा, असे तानावडे म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाLokmatलोकमत