शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

मतभेद बाजूला ठेवून कामाला लागा: भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 08:02 IST

दाबोळी मतदारसंघ भाजप कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन.

लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : आपल्यामध्ये जर कोणते मतभेद असतील तर ते बाजूला ठेवून भारतीय जनता पक्ष अधिकाधिक शक्तिशाली बनवण्यासाठी आम्ही काम करायला पाहिजे. २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे २७उमेदवार निवडून आणण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले असून ते साध्य करण्यासाठी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी आतापासूनच एकत्र राहून काम करायला पाहिजे असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी केले.

चिखली पंचायत सभागृहात शनिवारी रात्री दाबोळी मतदारसंघातील भाजप कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नाईक यांनी दक्षिण गोव्यातील पहिला कार्यकर्ता मेळावा दाबोळी मतदारसंघात घेतला होता. प्रदेशाध्यक्ष नाईक यांच्याबरोबर खासदार सदानंद शेट तानावडे, व्यासपीठावर पंचायतमंत्री तथा दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो, दाबोळी भाजप मंडळाचे अध्यक्ष सचिन चौगुले, प्रभारी जयंत जाधव, जिल्हा पंचायत सदस्या अनिता थोराट, चिखलीच्या उपसरपंच ऐश्वर्या कोरगावकर, बोगमाळोचे सरपंच संकल्प महाले, मुरगावचे नगरसेवक विनोद किनळेकर आदी उपस्थित होते.

विरोधकांनी अनेक षडयंत्रे रचली : माविन गुदिन्हो

मंत्री गुदिन्हो म्हणाले, की मला जे काही यश मिळाले, ते दाबोळी मतदारसंघातील मतदारांच्या पाठिंब्यामुळेच. विरोधकांनी माझ्याविरोधात अनेक षडयंत्रे रचली. नाव बदनाम करण्यासाठी माझ्याविरोधात अफवा पसरविण्यात आल्या. मात्र मी शांत राहिलो. विरोधकांनी रचलेल्या या षडयंत्राची जाणीव झाल्यानंतर लोकांनीच मला पाठिंबा दिला. क्रोधित होऊन प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला असता तर विरोधकांना त्याचा फायदा झाला असता

मंत्री गुदिन्हो म्हणाले की, येणाऱ्या निवडणुकीत मला त्रास व्हावा यासाठी दाबोळीतील उड्डाणपुलाचे काम बंद झाल्याची अफवा काही विरोधकांनी पसरवण्यास सुरुवात केली होती. त्या उड्डाणपुलाचे काम जोरात चालू आहे. मला त्रास व्हावा यासाठी त्या उड्डाणपुलाचे काम बंद पडावे, असे विरोधकांना वाटते. पण उड्डाणपुलाचे काम बंद झाल्यास जनतेला त्याचा त्रास होणार आहे. याची त्या विरोधकांना मुळीच काळजी नाही.

२७ आमदार निवडून आणण्याचे लक्ष्य

यावेळी प्रदेशाध्यक्ष नाईक म्हणाले, की २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या २७उमेदवारांना विजयी करून विधानसभेत पाठवण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित राहून आतापासूनच कामाला सुरुवात केल्यास हे लक्ष्य नक्कीच पूर्ण होईल. राज्यात आणि देशात भाजपला शक्तिशाली बनवण्यात ज्या थोर नेत्यांचा हात आहे, त्यांची आठवण आम्ही सदैव ठेवणे गरजेचे आहे. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण