शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
3
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
4
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
5
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
6
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
7
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
8
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
9
Guruvar Ke Upay: गुरुवार विशेष उपाय कराल, तर एका हळदीच्या गाठीने मालामाल व्हाल!
10
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
11
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
12
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
13
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
14
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
17
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
18
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
19
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
20
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

मतभेद बाजूला ठेवून कामाला लागा: भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 08:02 IST

दाबोळी मतदारसंघ भाजप कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन.

लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : आपल्यामध्ये जर कोणते मतभेद असतील तर ते बाजूला ठेवून भारतीय जनता पक्ष अधिकाधिक शक्तिशाली बनवण्यासाठी आम्ही काम करायला पाहिजे. २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे २७उमेदवार निवडून आणण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले असून ते साध्य करण्यासाठी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी आतापासूनच एकत्र राहून काम करायला पाहिजे असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी केले.

चिखली पंचायत सभागृहात शनिवारी रात्री दाबोळी मतदारसंघातील भाजप कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नाईक यांनी दक्षिण गोव्यातील पहिला कार्यकर्ता मेळावा दाबोळी मतदारसंघात घेतला होता. प्रदेशाध्यक्ष नाईक यांच्याबरोबर खासदार सदानंद शेट तानावडे, व्यासपीठावर पंचायतमंत्री तथा दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो, दाबोळी भाजप मंडळाचे अध्यक्ष सचिन चौगुले, प्रभारी जयंत जाधव, जिल्हा पंचायत सदस्या अनिता थोराट, चिखलीच्या उपसरपंच ऐश्वर्या कोरगावकर, बोगमाळोचे सरपंच संकल्प महाले, मुरगावचे नगरसेवक विनोद किनळेकर आदी उपस्थित होते.

विरोधकांनी अनेक षडयंत्रे रचली : माविन गुदिन्हो

मंत्री गुदिन्हो म्हणाले, की मला जे काही यश मिळाले, ते दाबोळी मतदारसंघातील मतदारांच्या पाठिंब्यामुळेच. विरोधकांनी माझ्याविरोधात अनेक षडयंत्रे रचली. नाव बदनाम करण्यासाठी माझ्याविरोधात अफवा पसरविण्यात आल्या. मात्र मी शांत राहिलो. विरोधकांनी रचलेल्या या षडयंत्राची जाणीव झाल्यानंतर लोकांनीच मला पाठिंबा दिला. क्रोधित होऊन प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला असता तर विरोधकांना त्याचा फायदा झाला असता

मंत्री गुदिन्हो म्हणाले की, येणाऱ्या निवडणुकीत मला त्रास व्हावा यासाठी दाबोळीतील उड्डाणपुलाचे काम बंद झाल्याची अफवा काही विरोधकांनी पसरवण्यास सुरुवात केली होती. त्या उड्डाणपुलाचे काम जोरात चालू आहे. मला त्रास व्हावा यासाठी त्या उड्डाणपुलाचे काम बंद पडावे, असे विरोधकांना वाटते. पण उड्डाणपुलाचे काम बंद झाल्यास जनतेला त्याचा त्रास होणार आहे. याची त्या विरोधकांना मुळीच काळजी नाही.

२७ आमदार निवडून आणण्याचे लक्ष्य

यावेळी प्रदेशाध्यक्ष नाईक म्हणाले, की २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या २७उमेदवारांना विजयी करून विधानसभेत पाठवण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित राहून आतापासूनच कामाला सुरुवात केल्यास हे लक्ष्य नक्कीच पूर्ण होईल. राज्यात आणि देशात भाजपला शक्तिशाली बनवण्यात ज्या थोर नेत्यांचा हात आहे, त्यांची आठवण आम्ही सदैव ठेवणे गरजेचे आहे. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण