...तर भारताचे कठोर प्रत्युत्तर असेल: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ सदस्य टिळक देवाशेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 08:09 IST2025-08-26T08:07:17+5:302025-08-26T08:09:05+5:30

काश्मीर प्रश्नावर शांततामय तोडगा शक्य नाही, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आणि लेखक टिळक देवाशेर यांनी स्पष्ट केले.

national security advisory board member tilak devasher said then India will have a strong response | ...तर भारताचे कठोर प्रत्युत्तर असेल: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ सदस्य टिळक देवाशेर

...तर भारताचे कठोर प्रत्युत्तर असेल: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळ सदस्य टिळक देवाशेर

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : काश्मीर प्रश्नावर शांततामय तोडगा शक्य नाही, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आणि लेखक टिळक देवाशेर यांनी स्पष्ट केले. शनिवारी आंतरराष्ट्रीय केंद्र गोवा (आयसीजी) येथे आयोजित 'ऑपरेशन सिंदूरपूर्वी आणि नंतर : भारत, पाकिस्तान आणि महासत्ता' या विषयावर ते बोलत होते.

पाकिस्तानमध्ये लष्करच निर्णायक भूमिका बजावते, हे अधोरेखित करताना देवाशेर यांनी सांगितले की, पाहलगाम दहशतवादी हल्ल्यांमागे त्यांचा लष्करप्रमुख जनरल मुनीर याच्या राजकीय महत्त्वाकांक्षा कारणीभूत आहेत. या संघर्षात भारतावर विजय मिळवल्याचा दावा करून मुनीरने स्वतःला लष्करप्रमुखापासून फील्ड मार्शलपदावर नेले.

देवाशेर यांच्या मते, पाकिस्तानने शस्त्रसंधीची मागणी केली आणि त्यातूनच वैरभावना संपल्या. ऑपरेशन सिंदूर हे क्रांतिकारी पाऊल होते. पाकिस्तानच्या आण्विक शस्त्र साठ्याने त्यांना शत्रुत्वाच्या कारवायांना संरक्षण मिळते हा समज खोटा ठरला.

ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला की, ते प्रत्येक वेळी मर्यादा ओलांडतील, तेव्हा भारत कठोर प्रत्युत्तर देईल. सिंधू जल कराराबाबत भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तान हादरले. पाकिस्तानने जलस्रोतांचे गैरव्यवस्थापन केले आहे.
 

Web Title: national security advisory board member tilak devasher said then India will have a strong response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.